शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

आठ वर्षांपासून जलसेतू नादुरुस्त

By admin | Updated: October 13, 2015 01:44 IST

डहाणू तालुक्यातील सूर्या कालव्याची दुरुस्तीच होत नसल्याने कालव्यांतर्गत होणाऱ्या शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

कासा : डहाणू तालुक्यातील सूर्या कालव्याची दुरुस्तीच होत नसल्याने कालव्यांतर्गत होणाऱ्या शेतीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. भराडजवळील जलसेतू आठ वर्षांपासून नादुरुस्त आहे. मात्र, एकीकडे लाखोंची कामे केल्याचे दाखवित असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.डहाणू, पालघर तालुक्यांतील सूर्यानगर, वेती, वरोती, कासा, चारोटी, घोळ, भराड, तवा, पेठ, नानिवली, आंबेदा, सोमटा, बोरोती, चिंचारे, आकेगव्हाण या गावांना सूर्या कालव्यांतर्गत उन्हाळ्यातही भातशेती, भाजीपाला आदी पिके घेतली जातात. परंतु, वेळोवेळी कालव्यांची दुरुस्ती होत नसल्याने शेतीला योग्य पाणीपुरवठा होत नसल्याने भातशेतीचे नुकसान होते.डहाणू तालुक्यातील सूर्या उजवा कालव्यांतर्गत लघू कालव्यातून भराड व पुढील गावांना पाणीपुरवठा करणारा सेतू आठ वर्षांपूर्वी कोसळला होता. त्यामुळे पुढील गावांना पाणीपुरवठा बंद झाला. जलसंपदा विभागाने तत्काळ पाइप टाकून तात्पुरती व्यवस्था करून दिली होती. मात्र, दरवर्षी लाखो रु.ची कालव्याची व दुरुस्तीची कामे कागदोपत्री दाखवत असताना आठ वर्षांपूर्वी कोसळलेल्या जलसेतूची दुरुस्ती मात्र अद्याप झालेली नाही. पाइपांना लोखंडी सळईचा आधार दिला आहे. तर, जलसेतूच्या तुटलेल्या बांधकामालाही लोखंडी खांबाचे टेकू देऊन ठेवले आहेत. आता याची दुरूस्ती कधी होते, याकडे सर्वांचे लक्ष आहे. (वार्ताहर)