शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रविवारी सातवी महापौर मॅरेथॉन, १८ हजारांहून अधिक स्पर्धकांचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:17 IST

पूर्ण मॅरेथॉनमध्ये तब्बल ६४० धावपटू, अर्ध मॅरेथॉनमध्ये सुमारे चार हजार धावपटूंसह तब्बल १८ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग असलेली वसई विरार महापौर मॅरेथॉन येत्या रविवारी रंगणार आहे.

वसई : पूर्ण मॅरेथॉनमध्ये तब्बल ६४० धावपटू, अर्ध मॅरेथॉनमध्ये सुमारे चार हजार धावपटूंसह तब्बल १८ हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग असलेली वसई विरार महापौर मॅरेथॉन येत्या रविवारी रंगणार आहे. राहूल बोस आणि मंदिरा बेदी स्पर्धेचे ब्रँड अ‍ॅम्बेसडर आहेत.यंदाच्या शर्यतीत पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ६४० धावपटू सहभागी होणार असून त्यात भारतातील सर्वोत्तम धावपटू असलेले रशपाल सिंग, पंकज धाका, सनातन सिंग, भरत प्रकाश, अनु सथ्यादास, जी. बी. पाटले, कालिदास हिरवेवर, प्रदीप सिंग, मानसिंग, गोविंद सिंग, चंद्रकांत मानवडकर, सावहीन पाटील यांचा समावेश आहे. तर महिलांच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये भारतातील आघाडीच्या स्वाती गाढवे, मोनिका आथरे, मोनिका राऊत, मिनाक्षी पाटील, मनीषा साळुंखे या धावपटू धावणार आहेत.पुरुषांच्या पूर्ण मॅरेथॉन विजेत्याला अडीच लाखाचे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. पुरुष व महिला अर्ध मॅरेथॉन विजेत्याला सव्वा लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाणार आहे.स्पर्धेत अनेक अधिकारीही धावणार आहेत. यामध्ये अनुप कुमार सिंग, मंजुनाथ सिंगे, जयंत बजबळे आदी पोलीस अधिकाºयांचा समावेश आहे. तर उपजिल्हाधिकारी माया पाटोळे, जिल्हा उपनिबंधक सतीश देवकाते हेही धावणार आहेत.अर्ध मॅरेथॉनमध्ये चार हजारांहून अधिक हौशी धावपटू धावणार आहेत. ११ किलोमीटरच्या स्पर्धेत दोन हजारांहून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. त्याचबरोबर ज्युनियर शालेय वयोगट शर्यतीत चार हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत.बॅटल रन स्पर्धा मॅरेथॉनचे मुख्य आकर्षण असून यंदा यात ३१ संघ अर्धमॅरेथॉन आणि पाच किलोमीटर डॅशमध्ये सहभागी झाले आहेत. संघातील सदस्यांच्या एकत्रित वेळेवरून विजेता संघ निवडण्यात येणार आहे. अर्ध मॅरेथॉन बॅटल रनमधील सर्वोत्तम रनिंग क्लबला दीड लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार आहे. तर उपविजेत्या संघाला ९० हजार रुपये आणि तृतीय संघाला ६० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत.विशेष मॅरेथॉन ट्रेन : मॅरेथॉनसाठी परेकडून विशेष ट्रेन सोडण्यात येणार आहे. चर्चगेट स्थानकातून ही ट्रेन पहाटे ३ वाजता सुटेल. ही ट्रेन वसईला पहाटे ४.२३ आणि विरारला पहाटे ४.३१ वाजता पोचेल. स्पर्धेच्या ठिकाणी पोचण्यासाठी वसई स्टेशन व विरार स्टेशन येथून वाहतूकीची व्यवस्था आहे.