शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

आगरी भवनाच्या बांधकामाला सातबाराचे ‘ग्रहण’

By admin | Updated: April 12, 2017 03:55 IST

वसई व पालघर तालुक्यात विखुरलेल्या आगरी समाज बांधवांच्या संकिल्पत आगरी भवनांचे काम सातबाऱ्यामुळे रखडले असून २००७ साली शासनाच्या नियमांना अधीन राहून

- सुनिल घरत,  पारोळ

वसई व पालघर तालुक्यात विखुरलेल्या आगरी समाज बांधवांच्या संकिल्पत आगरी भवनांचे काम सातबाऱ्यामुळे रखडले असून २००७ साली शासनाच्या नियमांना अधीन राहून १,८०,००० हजार रु पये मूल्यांकन भरले असले तरी अजूनही आगरी समाज उन्नती मंडळाच्या बांधकाम समितीला शासनाकडून सातबारा मिळाला नाही.या बाबीचा पाठपुरावा उन्नती मंडळाद्वारे सुरूच असून मागील दहा वर्षांच्या शासन दिरंगाईमुळे वाढलेल्या बांधकाम मूल्याची भरपाई देण्याची मागणीही मंडळामार्फत करण्यात आली आहे. याशिवाय गेल्या काही वर्षात मंडळाद्वारे अनेक सामाजिक हिताच्या कामांची मागणी करण्यात आली असून काही कामे मंजूर झाली आहेत परंतु त्यांचा पुढील प्रवास लालफितीमध्ये आडकला आहे. या प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणीही मंडळाकडून करण्यात आली आह. पाठपुराव करुनही शासनाकडून कोणत्याच कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने मंडळाचे ६० वर्षांवरील सदस्य (यामध्ये नारायण घरत यांचे वय ९५ वर्षे आहे) मंत्रालयासमोर उपोषण करण्याच्या तयारीत असून महिन्याभरात शासनाला जाग आली नाही तर येत्या ५ मे रोजी आम्ही मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचे उन्नती मंडळाचे सरचिटणीस नरिसंह पाटील यांनी सांगितले आहे.कामातील भ्रष्टाचार अन वेळकाढूपणापारगांव चेकपोस्ट ते दुर्गम आदिवासी बोरीचा पाडा रस्त्याचे काम २०११ या वर्षी तीन भागात करायचे होते. मात्र, ते एकाच भागाचे झाले असून उर्विरत काम न करता ठेकेदाराला सार्वजनिक बांधकामकडून तिन्ही भागांची सर्व रक्कम अदा केल्याची माहिती समोर आली आहे. पारगाव पुलाचे काम आदिवासी उपयोजनेतून झाले असतानाही यामार्गे केलेली टोल वसुली उपयोजनेत किती जमा झाली आहे. याची माहिती मिळावी. पारगाव, सोनावे, दारशेत ते महामार्गावरील पाचरखे, दारशेत ते उंबरपाडा रस्त्याला निधी मिळावा म्हणून पाठपूरावर सुरु आहे.दरवर्षी पावसाळ्यात उसगाव ते भाताणे हा रस्ता हमखास पाण्याखाली जातो व पलीकडील ३५ ते ४० गाव पाड्यांचा संपर्क तुटतो. हा रस्ता होत नसल्याने शिवनसई ते नवसई रस्ता व्हावा ही पर्यायी मागणी आहे. त्याचे सर्वेक्षण होऊनही योजना मात्र प्रलंबित आहे.घाटीम, नवघर, मासवण, बहाडोली या मार्गाची पुलासकट मागणी केली आहे. तसेच खानिवडे टोल नाक्यावरून पालघर व वसई तालुक्यातील हलक्या वाहनांना टोल माफी मिळावी अशी मागणी आहे.