शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

वसई-विरारमध्ये सात रुग्णांचा मृत्यू; दिवसभरात २८३ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 23:55 IST

नालासोपारामधील ९७ वर्षीय आजोबांनी कोरोनाला हरवले

वसई/नालासोपारा : वसई-विरार महापालिका परिसरामध्ये गुरुवारी सात रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. त्याच वेळी दिवसभरात २८३ नवीन रुग्ण आढळून आले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या १० हजार ६०६ वर पोहोचली आहे. तर १२९ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळवल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, ९७ वर्षीय आजोबा कोरोनाला हरवून घरी परतल्याने नातेवाइकांनी आनंद व्यक्त केला आहे. वसई-विरार महापालिका हद्दीत गुरुवारी २८३ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले.

धक्कादायक म्हणजे दिवसभरात सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आजवर पालिका हद्दीत एकूण २१९ रुग्ण मयत झाले असल्याने ही बाब चिंतेची ठरली आहे. दरम्यान, शहरात १२९ रुग्ण घरी परतले असून आजवर मुक्त रुग्णांची संख्या ६ हजार ९७२ वर पोहचली आहे. तर शहरात एकूण ३ हजार ४१५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत.

दरम्यान, कोरोनाला न घाबरता त्यावर वेळीच उपचार घेतल्यास या आजारावर मात करता येते हेही सिद्ध झाले आहे. केवळ तरुणांनीच नाही तर अनेक वृद्धांनीदेखील कोरोनावर विजय मिळविला आहे. नालासोपाऱ्यातील एका ९७ वर्षीय आजोबांनी अवघ्या आठ दिवसातच कोरोनाला हरविले आहे. स्टार हॉस्पिटलमधील डॉक्टर व परिचारिका यांनी आजोबांना टाळ्या वाजवून घरी सोडले आहे.

नालासोपारा पूर्वेतील आचोळे गाव येथील माजी नगरसेवक वैभव पाटील यांचे आजोबा रामचंद्र कृष्णा पाटील (९७) यांना कोरोनाची लागण झाली होती. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने व अशक्तपणा आल्याने त्यांना स्टार रुग्णालयात दाखल केले होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्यावर पाटील कुटुंबियांना क्वॉरंटाईन केले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले.

कोरोनासारख्या आजाराला चांगला प्रतिसाद देत रामचंद्र पाटील यांनी इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोनावर मात केली. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. येथील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी टाळ्या वाजवून त्यांच्या जिद्दीला सलाम केला. वसई-विरारमध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, त्यात मृत्यूच्या आकड्यात वाढ होत असताना ९७ वर्षीय आजोबांनी कोरोनावर केलेली मात दिलासा देणारी आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस