शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
3
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
4
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
5
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
6
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
7
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
8
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
9
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
10
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
11
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
12
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
13
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
15
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
16
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
17
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
18
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
19
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
20
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
Daily Top 2Weekly Top 5

‘आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख सेवा द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:43 IST

संडे अँकर । दक्षता जनजागृती सप्ताह ; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन, जिल्हा परिषदेत झाला कार्यक्रम

ठाणे : जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख कामांचे कर्तव्य पार पाडावे. आपण जनतेचे सेवक असल्याची भावना कायम मनात दृढ करून सर्व प्रकारच्या प्रलोभनापासून दूर राहण्याचे मार्गदर्शनपर धडे अ‍ॅण्टीकरप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाºयांना शुक्रवारी दिले.

तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून, कामामध्ये पारदर्शकता ठेवून, अधिकारी-कर्मचाºयांनी नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ जलद गतीने व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व त्याचे महत्त्व डॉ. पाटील यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनात आणून दिले. ‘इमानदारी एक जीवनशैली’ ही संकल्पना घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) यंदा ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ हाती घेण्यात आला आहे. यास अनुसरून नियोजन भवन येथे अधिकारी व कर्मचाºयांसाठी शुक्रवारी उशिरापर्यंत कार्यशाळा घेऊन सखोल मार्गदर्शन पाटील यांनी केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद हातोटे म्हणाले की, शासकीय अधिकारी-कर्मचाºयांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक नागरिकाचे काम कोणत्याही अडवणुकीविना, तत्परतेने आणि पारदर्शीपणे कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. लाच घेणे आणि देणे हा गुन्हा आहे. आपण शासकीय सेवक आहोत, याचे भान ठेवून आपली सेवा बजावायला हवी’ असे हातोटे यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, संगीता भागवत, लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता इंदुरकर आदी उपस्थित होते.जनजागृतीसाठी कार्यक्रमयावेळी शिवाजी पाटील आणि अशोक पाटील यांनी समयोचित भाषण केले. तर, ‘भ्रष्टाचार निर्मूलनासंदर्भात तयार केलेल्या विविध लघुचित्रफिती, प्रसिद्ध मान्यवरांचे दृकश्राव्य माध्यमातील प्रतिक्रि या पोलीस उपअधीक्षक मदन बल्लाळ यांनी उपस्थितांना ऐकवल्या. या ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’निमित्ताने लाचलुचपत विभागाद्वारे विविध उपक्र म हाती घेण्यात आले आहेत.शासकीय कार्यालयांत बॅनर, पोस्टरद्वारे जागरराज्यभरात २८ आॅक्टोबरपासून दक्षता सप्ताह सुरू झाला आहे. या अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लाच घेऊ नये, याबाबत वरिष्ठ अधिकाºयांकडून मार्गदर्शन तसेच शपथ दिली जाणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धांसारखे विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तसेच बॅनर, पोस्टरद्वारे जनजागृती केली जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारvasai-acवसईthaneठाणे