शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

‘आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख सेवा द्या’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:43 IST

संडे अँकर । दक्षता जनजागृती सप्ताह ; वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन, जिल्हा परिषदेत झाला कार्यक्रम

ठाणे : जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता लोकाभिमुख कामांचे कर्तव्य पार पाडावे. आपण जनतेचे सेवक असल्याची भावना कायम मनात दृढ करून सर्व प्रकारच्या प्रलोभनापासून दूर राहण्याचे मार्गदर्शनपर धडे अ‍ॅण्टीकरप्शन ब्युरोचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी ठाणे जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या अधिकारी-कर्मचाºयांना शुक्रवारी दिले.

तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करून, कामामध्ये पारदर्शकता ठेवून, अधिकारी-कर्मचाºयांनी नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ जलद गतीने व लोकाभिमुख सेवा देण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व त्याचे महत्त्व डॉ. पाटील यांनी यावेळी अधिकारी व कर्मचाºयांच्या निदर्शनात आणून दिले. ‘इमानदारी एक जीवनशैली’ ही संकल्पना घेऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) यंदा ‘दक्षता जनजागृती सप्ताह’ हाती घेण्यात आला आहे. यास अनुसरून नियोजन भवन येथे अधिकारी व कर्मचाºयांसाठी शुक्रवारी उशिरापर्यंत कार्यशाळा घेऊन सखोल मार्गदर्शन पाटील यांनी केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद हातोटे म्हणाले की, शासकीय अधिकारी-कर्मचाºयांनी त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक नागरिकाचे काम कोणत्याही अडवणुकीविना, तत्परतेने आणि पारदर्शीपणे कसे होईल, यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. लाच घेणे आणि देणे हा गुन्हा आहे. आपण शासकीय सेवक आहोत, याचे भान ठेवून आपली सेवा बजावायला हवी’ असे हातोटे यांनी स्पष्ट केले. यावेळी व्यासपीठावर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, तहसीलदार राजेंद्र चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, शिक्षणाधिकारी शेषराव बढे, संगीता भागवत, लघुपाटबंधारे कार्यकारी अभियंता इंदुरकर आदी उपस्थित होते.जनजागृतीसाठी कार्यक्रमयावेळी शिवाजी पाटील आणि अशोक पाटील यांनी समयोचित भाषण केले. तर, ‘भ्रष्टाचार निर्मूलनासंदर्भात तयार केलेल्या विविध लघुचित्रफिती, प्रसिद्ध मान्यवरांचे दृकश्राव्य माध्यमातील प्रतिक्रि या पोलीस उपअधीक्षक मदन बल्लाळ यांनी उपस्थितांना ऐकवल्या. या ‘दक्षता जनजागृती सप्ताहा’निमित्ताने लाचलुचपत विभागाद्वारे विविध उपक्र म हाती घेण्यात आले आहेत.शासकीय कार्यालयांत बॅनर, पोस्टरद्वारे जागरराज्यभरात २८ आॅक्टोबरपासून दक्षता सप्ताह सुरू झाला आहे. या अंतर्गत लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये लाच घेऊ नये, याबाबत वरिष्ठ अधिकाºयांकडून मार्गदर्शन तसेच शपथ दिली जाणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धांसारखे विविध कार्यक्रम घेतले जाणार आहेत. तसेच बॅनर, पोस्टरद्वारे जनजागृती केली जात आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारvasai-acवसईthaneठाणे