शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

संभ्रमाची मालिका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 22:57 IST

अंबरनाथ पालिका निवडणूक : आयोगाकडून आरक्षण सोडत झालीच नाही

पंकज पाटील 

अंबरनाथ/बदलापूर : राज्य निवडणूक आयोगाचे एकावर एक येणारे आदेश हे नागरिकांना संभ्रमात टाकणारे आहेत. निवडणूक आयोगाने आगामी नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने १८ फेब्रुवारीला आरक्षण सोडत घेण्याचे निश्चित केले होते. मात्र आयोगाने कोणतेही पत्र न काढता हा कार्यक्रम पुढे ढकलला आहे. नियमानुसार आणि आयोगाच्या आदेशानुसार आज आरक्षण सोडत पार पडणे अपेक्षित होते. मात्र तो कार्यक्रम झालाच नाही आणि त्याची कल्पनाही नागरिकांना दिलीच नाही. निवडणूक आयोग हे अधिकारी आणि स्वत:चे कार्यालय यांच्यापुरतेच काम करत असल्याचे चित्र या निवडणुकीच्या कार्यक्रमातून दिसत आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर या दोन ‘अ’ वर्ग नगरपालिकेच्या निवडणूक आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. या आरक्षण सोडतीच्या आदेशानुसार प्रभाग रचना निश्चित करून त्या प्रभागांची आरक्षण सोडत १८ फेब्रुवारीला घेण्यात येणार होती. मात्र नगरपालिकेने निवडणूक आयोगाकडे सादर केलेली प्रभाग रचनाच अद्याप निश्चित झालेली नाही. त्या प्रभाग रचनेलाच अद्याप मंजुरी मिळालेली नाही.निवडणूक आयोगाकडून विलंब होत असल्याने आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पुढे ढकलला जाणार अपेक्षित होते. मात्र त्या संदर्भात कोणतेही आदेश आयोगाने काढले नाही.निवडणुकीचा कार्यक्रम सर्वच वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्याने याकडे सगळ््यांचे लक्ष लागले होते. आरक्षण सोडत तर दूरच १८ फेब्रुवारीपर्यंत प्रारूप प्रभाग रचनेलाही मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या या विलंबामुळे शहरात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. दुसरीकडे निवडणूक आयोग हे केवळ त्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंतच आदेश देण्याचे काम करत आहेत. नागरिकांपर्यंत निवडणुकीचा कार्यक्रम जावू देत नसल्याचे समोर आले आहे. कोणताही लेखी आदेश नसताना आरक्षण सोडत पुढे गेलीच कशी हा प्रश्न उपस्थित होत आहे.पालिका अधिकारी आयोगाकडे तळ ठोकूनच्निवडणूक आयोगाकडे प्रारुप प्रभाग रचना मंजूर करण्यासाठी अधिकारी तळ ठोकून आहेत. मात्र अद्याप त्यांना मंजुरी मिळालेली नाही.च्प्रारूप आराखड्याला मंजुरी मिळाल्यावर आरक्षण सोडतीची तारीख निश्चित होईल असे मुख्याधिकारी देवीदास पवार यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथVasai Virarवसई विरार