शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

हंगामी वसतिगृह योजना बंद ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 2:49 AM

पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या अतिदुर्गम तालुक्यातील व रोजगारासाठी स्थलांतरीत होणाºया आदिवासींच्या मुलामुलींसाठी चालविली जाणारी हंगामी वसतीगृहे बंद होण्याची शक्यता आहे.

- हुसेन मेमन

जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा या अतिदुर्गम तालुक्यातील व रोजगारासाठी स्थलांतरीत होणा-या आदिवासींच्या मुलामुलींसाठी चालविली जाणारी हंगामी वसतीगृहे बंद होण्याची शक्यता आहे.या कुटुंबांना पावसाळ्यातील शेतीची कामे आटोपल्यावर रोजगराचे कुठलेच साधन राहत नाही. त्यामुळे त्यांना रोजगारासाठी भिवंडी, ठाणे, पालघर येथे स्थलांतरीत व्हावे लागत असून त्यांची मुलेही त्यांच्याबरोबर शिक्षण सोडून स्थलांतर करतात. त्यामुळे या मुलांनी शिक्षण घ्यायचे कसे? असा प्रश्न निर्माण होतो.आदिवासी कुटुंबातील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शासनाकडून हंगामी निवासी वसतीगृह योजना सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे पालक स्थलांतरीत झाले तरी त्यांची मुले वसतिगृहात राहून शिक्षण घेतात. तिथेच त्यांना नाश्ता, सकाळ, संध्याकाळचे जेवण तसेच शालोपयोगी साहित्य आणि दररोज लागणारे पेस्ट, साबण, तेल असे साहित्यही पुरविले जायचे. या योजनेमुळे रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या पालकांना मोठा दिलासा मिळायचा. मात्र हल्ली प्रशासनाच्या अनेक जाचक अटींमुळे बरेच मुख्याध्यापक हंगामी वस्तीगृहाचे प्रस्ताव तयारच करीत नाहीत. काही अघटित प्रकार घडल्यास मुख्याध्यापकास जबाबदार धरले जात असल्याने बहुतांश मुख्याध्यापक आणि शिक्षक या भानगडीत पडत नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. जि.प. परिषद शाळा मुख्याध्यापक स्थलांतरीत हंगामी मुलांच्या वसतिगृहाचा प्रस्ताव पाठवायला यामुळेच धजावत नसल्याचेही शिक्षकांनी सांगितले. त्याने ही योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे.दोन महिने झाले तरी प्रस्तावांना मंजुरी नाहीजव्हार तालुक्यातून २ महिन्यापूर्वी कायरी आणि रोजपाडा या दोन शाळांनी हंगामी वस्तीगृहांचे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवले होते. परंतु दोन महिने उलटून गेल्यानंतरही त्यांना शिक्षण विभागाने मंजुरी दिलेली नाही. या योजनेचा थेट फायदा स्थलांतरीत आदिवासींच्या मुलांनाच होत असून,यांत अधिकाºयांना कोणताच फायदा मिळत नसल्याने जाणीवपूर्वक या प्रस्तावांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप स्थानिकांनी व मुलांच्या पालकांनी केला आहे. या प्रस्तावास दोन महिने लोटल्यानंतरही मंजुरी न मिळल्याच्या या पार्श्वभूमीवर स्थानिकांच्या या आरोपास पुष्टी मिळत आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार