शहरं
Join us  
Trending Stories
1
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
2
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
3
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
4
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
5
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
6
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
7
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
8
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
9
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
10
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
11
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
12
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
13
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
14
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
15
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
16
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
17
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
18
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
19
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
20
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

हंगामापूर्वीच आंब्याला मोहर, बागायतदारांना आर्थिक फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:27 IST

सीमा भागातील डहाणू आणि तलासरी या तालुक्यातील समुद्रकिना-यापासून १५ ते २० किमी अंतरावरील विविध गावांमध्ये, नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी काही आंबा कलमे मोहरतात.

अनिरुद्ध पाटील 

बोर्डी : गेल्या चार-पाच वर्षांपासून उत्तर कोकणात हंगामाआधी आंबा कलमे मोहरल्याचे दिसून आले आहे. शिवाय काही झाडांना लगडलेली फळे पक्व झाल्याचे निरीक्षण शेतकरी यांनी नोंदवले आहे. दरम्यान, या अवकाळी झाडांचा मोहर नियमित करण्याच्या दृष्टीने प्रयोग झाल्यास दक्षिण कोकणातील बागायतदारांप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील आंबा बागायतदार आर्थिक सधन होऊ शकतो.

सीमा भागातील डहाणू आणि तलासरी या तालुक्यातील समुद्रकिना-यापासून १५ ते २० किमी अंतरावरील विविध गावांमध्ये, नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी काही आंबा कलमे मोहरतात. अनेक शेतकरीही सोशल मीडियावर सक्रिय असल्याने मागील चार-पाच वर्षांपासून ही बाब सर्वांसमोर येत आहे. उत्तर कोकणात डिसेंबरअखेर ते जानेवारी या कालावधीत आंबा झाडे मोहरतात. एप्रिल अखेर ते मे महिन्यात फळे पक्व होतात. उशिरा फळे बाजारात येत असल्याने चांगला दर मिळत नाही. परिणामी, बागायतदारांचे आर्थिक नुकसान होते. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लवकर बाजारात येऊन अधिक दर मिळून बागायतदारांना आर्थिक फायदा होतो. उत्तर कोकणातल्या अवकाळी मोहरणा-या आंबा झाडांवरचा मोहर नियमित करण्याच्या दृष्टीने प्रयोग होणे आवश्यक आहे. कृषी विभागातील तज्ज्ञ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांंनी हे आव्हान संधी म्हणून स्वीकारले पाहिजे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांंनी  याबाबत अधिक संशोधन करणे आवश्यक आहे.

समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या गावात प्रयोगचिखले, घोलवड, बोर्डी, रामपूर, वेवजी या गावांमध्ये गेल्या चार-पाच वर्षांत हंगामापूर्वी कलमे मोहरली आहेत. हा भाग समुद्रकिनारा आणि सह्याद्रीच्या जवळ असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील भौगोलिक व हवामानविषयक साम्य यात आढळते. त्यामुळे प्रयोग करण्यास वाव असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणे