शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

हंगामापूर्वीच आंब्याला मोहर, बागायतदारांना आर्थिक फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:27 IST

सीमा भागातील डहाणू आणि तलासरी या तालुक्यातील समुद्रकिना-यापासून १५ ते २० किमी अंतरावरील विविध गावांमध्ये, नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी काही आंबा कलमे मोहरतात.

अनिरुद्ध पाटील 

बोर्डी : गेल्या चार-पाच वर्षांपासून उत्तर कोकणात हंगामाआधी आंबा कलमे मोहरल्याचे दिसून आले आहे. शिवाय काही झाडांना लगडलेली फळे पक्व झाल्याचे निरीक्षण शेतकरी यांनी नोंदवले आहे. दरम्यान, या अवकाळी झाडांचा मोहर नियमित करण्याच्या दृष्टीने प्रयोग झाल्यास दक्षिण कोकणातील बागायतदारांप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील आंबा बागायतदार आर्थिक सधन होऊ शकतो.

सीमा भागातील डहाणू आणि तलासरी या तालुक्यातील समुद्रकिना-यापासून १५ ते २० किमी अंतरावरील विविध गावांमध्ये, नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी काही आंबा कलमे मोहरतात. अनेक शेतकरीही सोशल मीडियावर सक्रिय असल्याने मागील चार-पाच वर्षांपासून ही बाब सर्वांसमोर येत आहे. उत्तर कोकणात डिसेंबरअखेर ते जानेवारी या कालावधीत आंबा झाडे मोहरतात. एप्रिल अखेर ते मे महिन्यात फळे पक्व होतात. उशिरा फळे बाजारात येत असल्याने चांगला दर मिळत नाही. परिणामी, बागायतदारांचे आर्थिक नुकसान होते. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लवकर बाजारात येऊन अधिक दर मिळून बागायतदारांना आर्थिक फायदा होतो. उत्तर कोकणातल्या अवकाळी मोहरणा-या आंबा झाडांवरचा मोहर नियमित करण्याच्या दृष्टीने प्रयोग होणे आवश्यक आहे. कृषी विभागातील तज्ज्ञ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांंनी हे आव्हान संधी म्हणून स्वीकारले पाहिजे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांंनी  याबाबत अधिक संशोधन करणे आवश्यक आहे.

समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या गावात प्रयोगचिखले, घोलवड, बोर्डी, रामपूर, वेवजी या गावांमध्ये गेल्या चार-पाच वर्षांत हंगामापूर्वी कलमे मोहरली आहेत. हा भाग समुद्रकिनारा आणि सह्याद्रीच्या जवळ असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील भौगोलिक व हवामानविषयक साम्य यात आढळते. त्यामुळे प्रयोग करण्यास वाव असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणे