शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हंगामापूर्वीच आंब्याला मोहर, बागायतदारांना आर्थिक फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2020 01:27 IST

सीमा भागातील डहाणू आणि तलासरी या तालुक्यातील समुद्रकिना-यापासून १५ ते २० किमी अंतरावरील विविध गावांमध्ये, नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी काही आंबा कलमे मोहरतात.

अनिरुद्ध पाटील 

बोर्डी : गेल्या चार-पाच वर्षांपासून उत्तर कोकणात हंगामाआधी आंबा कलमे मोहरल्याचे दिसून आले आहे. शिवाय काही झाडांना लगडलेली फळे पक्व झाल्याचे निरीक्षण शेतकरी यांनी नोंदवले आहे. दरम्यान, या अवकाळी झाडांचा मोहर नियमित करण्याच्या दृष्टीने प्रयोग झाल्यास दक्षिण कोकणातील बागायतदारांप्रमाणेच पालघर जिल्ह्यातील आंबा बागायतदार आर्थिक सधन होऊ शकतो.

सीमा भागातील डहाणू आणि तलासरी या तालुक्यातील समुद्रकिना-यापासून १५ ते २० किमी अंतरावरील विविध गावांमध्ये, नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी काही आंबा कलमे मोहरतात. अनेक शेतकरीही सोशल मीडियावर सक्रिय असल्याने मागील चार-पाच वर्षांपासून ही बाब सर्वांसमोर येत आहे. उत्तर कोकणात डिसेंबरअखेर ते जानेवारी या कालावधीत आंबा झाडे मोहरतात. एप्रिल अखेर ते मे महिन्यात फळे पक्व होतात. उशिरा फळे बाजारात येत असल्याने चांगला दर मिळत नाही. परिणामी, बागायतदारांचे आर्थिक नुकसान होते. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा लवकर बाजारात येऊन अधिक दर मिळून बागायतदारांना आर्थिक फायदा होतो. उत्तर कोकणातल्या अवकाळी मोहरणा-या आंबा झाडांवरचा मोहर नियमित करण्याच्या दृष्टीने प्रयोग होणे आवश्यक आहे. कृषी विभागातील तज्ज्ञ आणि कृषी विज्ञान केंद्राच्या शास्त्रज्ञांंनी हे आव्हान संधी म्हणून स्वीकारले पाहिजे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांंनी  याबाबत अधिक संशोधन करणे आवश्यक आहे.

समुद्र किनाऱ्याजवळ असणाऱ्या गावात प्रयोगचिखले, घोलवड, बोर्डी, रामपूर, वेवजी या गावांमध्ये गेल्या चार-पाच वर्षांत हंगामापूर्वी कलमे मोहरली आहेत. हा भाग समुद्रकिनारा आणि सह्याद्रीच्या जवळ असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील भौगोलिक व हवामानविषयक साम्य यात आढळते. त्यामुळे प्रयोग करण्यास वाव असल्याचे बागायतदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :thaneठाणे