शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

शाळा डिजिटल, इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 06:35 IST

तालुक्यातील तब्बल ९८ शाळा डीजिटल झाल्या असल्या तरी त्यातील तब्बल २५ शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचा अहवाल खुद्द शिक्षण खात्यानेच दिला आहे. 

ठळक मुद्दे२५ डिजिटल शाळांच्या इमारती धोकादायक ग्रामपंचायतींकडून तक्रारी होऊनही होते दुर्लक्ष 

शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : तालुक्यातील तब्बल ९८ शाळा डीजिटल झाल्या असल्या तरी त्यातील तब्बल २५ शाळांच्या इमारती धोकादायक असल्याचा अहवाल खुद्द शिक्षण खात्यानेच दिला आहे. शिक्षण विभागाने तालुक्यातील ९८ शाळा डीजिटल केल्या आहेत. एक शाळा डीजिटल करण्यासाठी अडीच ते तीन लाखांचा खर्च येतो. एकीकडे शाळा  डीजिटल केल्या जात असताना त्यांच्या इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याने अनेक शाळांच्या इमारतींची पडझड सुरु झाली आहे. आडणे, पाचरुखा, नागले, शिलोत्तर, हेदवडे, खानीवडे, सकवार, केलीचापाडा, शिरसाड, पाणजू (प्राथमिक), चिंचोटी, बोबडपाडा, वाकीपाडा,  टिवरी, कोपरी, गास कोपरी, तुळींज-१, पेल्हार, बरफपाडा, कोलोशी, कुवरपाडा, बेगर्सहोम, हिरा विद्यालय विरार-१, निळेमोरे, आचोळे-२ या शाळा डीजिटल करण्यात आले आहे. डीजिटलमुळे आधुनिक शिक्षण पद्धतीचा वापर सुरु करण्यात आला असून विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होत आहे. या शाळा डीजिटल झाल्या असल्या तरी या शाळांच्या इमारती अत्यंत धोकादायक अवस्थेत आहेत. आडणे शाळाचे छत कोसळून पडले आहे. इतरही शाळांच्या खोल्यांची अवस्था बिकट झाली आहे. तसा अहवाल वसई पंचायत समितीच्या शिक्षण खात्याने पाठवला आहे. डीजिटल झालेल्या तालुक्यातील २५ शाळांच्या ५३ वर्ग खोल्या धोकादायक अवस्थेत असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज  असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या शाळांची मोठी दुरुस्ती अत्यावश्यक असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. शाळा डीजिटल करणे काळाची गरज आहे. मात्र, त्याचबरोबर शाळा इमारतींची देखभाल आणि दुरुस्तीकडे लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना सध्या धोकादायक इमारतींमध्ये जीव मुठीत धरून शिकावे लागत आहे. एक शाळा डीजिटल करण्यासाठी अडीच ते तीन लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे शाळा डीजिटल करण्याआधी धोकादायक इमारतींची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष राम पाटील आणि युवक अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

टॅग्स :Schoolशाळा