शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

भंडारी पतपेढीमध्ये घोटाळा; सहा कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल, खातेदारांच्या रकमेचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 05:54 IST

वसई तालुक्यातील भंडारी समाजाच्या प्रख्यात युवक सहकारी पतपेढीत तब्बल साडेआठ कोटी रु पयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस झाल्यामूळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संचालकांनी पतपेढीतील सहा कर्मचार्Þयांविरोधात दिलेल्या तक्र ारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र हे सर्व आरोपी आता फरार आहेत.

पारोळ : वसई तालुक्यातील भंडारी समाजाच्या प्रख्यात युवक सहकारी पतपेढीत तब्बल साडेआठ कोटी रु पयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस झाल्यामूळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संचालकांनी पतपेढीतील सहा कर्मचार्Þयांविरोधात दिलेल्या तक्र ारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मात्र हे सर्व आरोपी आता फरार आहेत.वसईतील पारनाका येथे पतपेढीचे मुख्यालय असून भंडारी समाजातर्फे युवक सहकारी पतपेढी चालविण्यात येते. वसईच्या नालासोपारा येथे एक शाखा आहे. मात्र या पतपेढीत खातेदाराच्या आणि सभासदांच्या रकमेचा अपहार होत असल्याची बाब समोर आली आहे. संचालाकांनी पतपेढीतील सहा कर्मचाºयांना यापूर्वीच बडतर्फ करून त्यांच्याविरोधात निबंधक आणि पोलिसांकडे तक्र ार दाखल केली होती. या तक्र ारीची पडताळणी केल्यानंतर पतपेढीत तब्बल ८ कोटी ५६ लाख रु पयांचा अपहार झाल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पतपेढीच्या सहा कर्मचाºयांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात निवृत्त व्यवस्थापक मगनचंद राठोड, वसई शाखा व्यवस्थापक अविनाश चोरघे, सोपारा येथील शाखा व्यवस्थापक रितेश म्हात्रे, रोखपाल सुरज ठाकूर, लिपिक समीर पाटील, शिपाई संजय चौधरी आदींचा समावेश आहे. त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४६८, ४७१,४७७ (अ) ४२०, ३४ सह एमपीआयडी अ‍ॅक्ट १९९९ चे कलम १४६ (प), १४६ (प), महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौधरी यांनी याप्रकरणी तक्र ार दिली होती. युवक सहकारी पतपेढी ही भंडारी समाजाची पतपेढी असून समाजातील लोकांनी यात आपले पैसे गुंतवले होते. संस्थेचे दोन हजार भागधारक आहेत. संस्थेचे थकीत कर्ज आहे. त्यातून कोट्यावधी रु पयांची येणी बाकी आहे. त्यातून खातेदारांची रक्कम दिली जाईल असे आश्वासन संस्थेचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान उपाध्यक्ष पंकज चोरघे यांनी सांगितले. आम्ही याप्रकरणी गुन्हा दाखल करत असून सर्व आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे वसईचे उपअधीक्षक ताटेवाड यांनी सांगितले.असा केला कर्मचाºयांनी घोटाळागेल्या काही वर्षापासून खातेदारांना त्यांनी भरेलल्या मुदत ठेवींचा परतावा मिळत नव्हता. त्यामुळे सभासदांनी पैशांच्या रकमेसाठी पतपेढीत तगादा लावला होता. संस्थेचे भागधारक एक भागधारक तसेच शिवसेना उपतालुकाप्रमूख अतुल पाटील यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा सुरू केला.अतुल पाटील यांनी संचालक मंडळ व कर्मचा-यांविरोधात ५ एप्रिल रोजी आर्थिक गुन्हे शाखा पालघर येथे तक्र ार दाखल केल्यानंतर आपली कातडी वाचिवण्यासाठी विद्यमान संचालक मंडळांनी कर्मचाºयांना बळीचा बकरा बनवला असल्याचा आरोप केला आहे.परस्पर रकमा काढून व मुदतठेवी आणि बचतठेवीत फेरफारवसई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या कर्मचाºयांनी बचत ठेव, आवर्त ठेव, मुदत ठेव, दैनिक बचत ठेव, दाम दुप्पट योजना, शुभंकरोती योजना तसेच निवृत्ती ठेव योजना, पतसंस्थेच तारण ठेवलेल्या सोने आदी बनावट दस्तावेज तयार करून हडप केले होते.खातेदारांच्या खात्यातून परस्पर रकमा काढून व मुदत ठेवी आणि बचत ठेवीत फेरफार करून तारण कर्जामधील सोन परस्पर विल्वेवाट लावून ८ कोटी ५६ लाख १९ हजार एवढ्या रकमेचा अपहार केला आहे. अपहार करणारे सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापक यांनी संगनमत केले होते.ज्या खातेदाराने १० लाखाची मुदत ठेव जमा केली असेल त्याला १० लाखाची पावती दिली जायची मात्र प्रत्यक्षात ५ लाख रु पयेच जमा केले जायचे. तसेच अनेकदात खातेदारांच्या बोगस सह्या वापरून पैसे काढले जायये. वर्षातून दोनदा सरकारी आणि खाजगी लेखापरिणक्ष व्हायचे तरी देखील हा घोटाळा लक्षात आला नाही हे विशेष.

टॅग्स :Goldसोनं