शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

श्रेय लाटण्याचा सवरांचा प्रयत्न फसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 02:49 IST

पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालघर जिल्ह्यात २६२ कोटीच्या खर्चाच्या १४२ पेयजल योजना मंजूर करण्यात आल्याचे भासवून स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा पालकमंत्र्यांच्या प्रयत्न फसला आहे.

- हितेंन नाईकपालघर : पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे पालघर जिल्ह्यात २६२ कोटीच्या खर्चाच्या १४२ पेयजल योजना मंजूर करण्यात आल्याचे भासवून स्वत:ची पाठ थोपटवून घेण्याचा पालकमंत्र्यांच्या प्रयत्न फसला आहे. या योजनांना २०१७-१८ सालात मंजुरी मिळूनही त्यातील ९३ ची कामेच सुरू होऊ शकली नसल्याने नाईलाजाने ही कामे या आर्थिक वर्षात ढकलण्याची पाळी सरकारवर आली आहे. त्याचेच श्रेय सवरांनी लाटले.राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि पालघरचे पालकमंत्री ह्यांच्या वतीने १ सप्टेंबर रोजी देण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात जिल्ह्यातील १४२ पाणीपुरवठा योजनांसाठी २६२ कोटी रुपये आपण केलेल्या सततच्या पाठपुराव्या मुळे मंजूर झाल्याचा दावा करून त्याचे फुकटचे श्रेय उपटण्याचा प्रयत्न केला गेला होता. पाणीपुरवठा मंत्री बबन लोणीकर यांनी पत्र पाठवून आपल्याला ही माहिती दिल्याचे पालकमंत्र्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले होते. या पालकमंत्र्यांच्या घोषणेमुळे पाण्याच्या योजनांच्या प्रतिक्षेत असलेल्या जिल्ह्यातील अनेक गाव पाड्यातील रहिवाशांना दिलासा मिळाला होता.पाणीपुरवठा मंत्र्यांच्या पत्रांचा हवाला देत पालकमंत्र्यांनी ज्या १४२ योजनांसाठी २६२ कोटीचा निधी आपण सतत पाठपुरावा करून मंजूर करून आणल्याचे सांगत आहेत, त्या योजना सन २०१७ मध्येच मंजूर करण्यात आल्या असून ह्या योजने अंतर्गत मंजूर झालेल्या काही योजनांच्या पाईपलाईन टाकणे, टाक्या उभारणे आदी कामे जवळपास पूर्णत्वास आली आहेत. ह्या १४२ योजना पैकी ३ योजना ह्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या तर १३९ योजना जिल्हापरिषद विभागाच्या आहेत. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील ह्यांनी २०१७ मध्ये या संदर्भात पत्रकारांना माहिती देतांना सातपाटी, पास्थळ, कुडण, शिरगाव, दांडी, धनसार आदी योजनांच्या मंजुरी आणि निधीची माहिती दिली होती. त्यामुळे मतदारांना बनविण्याचा हा प्रयत्न पालकमंत्री करीत तर नाहीत ना?जिल्हा परिषदेच्या योजनांसाठी २०१७-१८ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्र मांतर्गत ८ कोटी २२ लाख ७८ हजार अनुदान प्राप्त झाले असून, महाराष्ट्र ग्रामीण पेयजल अंतर्गत ९७ लाख ३५ हजार निधी, विशेष योजनेंतर्गत १२ कोटी ७० लाख, जिल्हा नियोजन बिगर आदिवासीसाठी ८ कोटी ४७ लाख अशा विविध हेड खाली ३० कोटी ३७ लाख १३ हजार निधी उपलब्ध झाला असून त्यापैकी १२ कोटी ९२ लाख ७४ हजार ४१९ इतका निधी २०१८ अखेर खर्चही करण्यात आला आहे. सन २०१७-१८ मधील प्रस्तावित १४२ पेयजल योजने पैकी ३ कामे मजीप्रा.ची सोडल्यास उर्वरीत १३९ कामासंबंधातील प्रक्रिया पूर्ण न झाल्याने यातील ९३ योजना सन २०१८-१९ च्या वर्षात पुन्हा आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे फक्त ४६ योजनांची कामे सध्या सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. आणि १४२ कामे सुरू असल्याचे फुकटचे श्रेय उपटण्याचा प्रयत्न पालकमंत्र्या कडून केला जात असल्याची टीका विरोधका कडून केली जात आहे.त्यामुळे नवीन सन २०१८-१९ या वर्षात ११ नवीन योजनांची भर पडली असून मागच्या वर्षातील ९३ योजना अश्या १०४ योजना सध्या प्रस्तावित असून ह्या योजनांच्या खर्चासाठी सुमारे १०० कोटी ९० लाखाचा निधीची गरज भासणार असल्याची माहिती संबंधित विभागाने दिली.फुकटचे श्रेय उपटण्यापेक्षा पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या समस्यां सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत.त्यांचा दावा हास्यास्पद असून ह्या वर्षातील सर्व कामे पूर्णत्वास कशी जातील यासाठी प्रयत्न करावेत. - सुनील भुसारा, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी पक्ष. 

टॅग्स :vishnu savaraविष्णू सावराpalgharपालघर