शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाच गावांचे धूपप्रतिबंधक बंधारे नामंजूर!

By admin | Updated: May 11, 2017 01:41 IST

या जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टीवर वसलेल्या सातपाटी, तारापूर सह अन्य पाच गावांलगतच्या किनारपट्टीवर उभारण्यात येणाऱ्या

हितेन नाईक। लोकमत न्यूज नेटवर्कपालघर : या जिल्ह्यातील समुद्रकिनारपट्टीवर वसलेल्या सातपाटी, तारापूर सह अन्य पाच गावांलगतच्या किनारपट्टीवर उभारण्यात येणाऱ्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची मंजुरी (एनओसी) महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने (सीआरझेड) नामंजूर केल्याने हे बंधारे रद्द झाले आहेत. त्यामुळे येत्या पावसाळ्यात समुद्रात निर्माण होणाऱ्या तुफानी लाटांच्या तडाख्याने किनाऱ्यावरील मच्छीमारांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होणार असून त्यांची घरकुलेही भुईसपाट होणार आहेत.महाराष्ट्रातील ७२० किमीच्या प्रदीर्घ समुद्रकिनाऱ्यावर वसलेल्या मच्छीमार व इतर समाजाची घरे, शेती यांची होणारी धूप रोखण्यासाठी विविध संस्था, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींंच्या मागणी वरून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडून धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. रायगड जिल्ह्यातील मांडवा, रेवदंडा, नावेदर-नवेगाव, सासवणे या चार गावसह मुंबई मधील वर्सोवा येथील सागर कुटीर ते हिंदू स्मशानभूमी, हिंदुजा हॉस्पिटल माहीम, हाजी अली दर्गा, प्रियदर्शनी पार्क, मलबार हिल, वाळकेश्वर, गीता नगर कुलाबा, रेडिओ क्लब ते अपोलो बंदर आदींसह पालघर जिल्ह्यातील सातपाटी (४२५ मीटर),आशापुरा मंदिर, एडवण (१२५ मीटर), नवापूर (१५० मीटर), तारापूर मांगेला आळी (१३८ मीटर) आणि घिवली या पाच किनारपट्टीवरील गावासाठी धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांना मंजुरी मिळून सीआरझेड विभागाचा नाहरकत दाखला मिळणे बाकी होते.महाराष्ट्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरण समितीच्या २३ मार्च रोजी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत या धूप प्रतिबंधक बंधाऱ्याचे सर्व प्रस्ताव तपासण्यात आले. हे बंधारे किनाऱ्याजवळ उभारण्यात येणार असल्याने व या जागा पर्यावरणपूरक तिवरांची झाडे, मासे प्रजनन क्षेत्र, वन्यजीव क्षेत्र, समुद्री कासवे, नैसर्गिक सौंदर्य स्थळे,ऐतिहासिक स्थळे ई बाबी बाबत संवेदनशील असल्याने याला ते बाधित होऊ शकत असल्याने त्यांची मान्यता रद्द करण्यात आली. समुद्राचे प्रवाह ऋतूमानाप्रमाणे बदलत असतात त्या प्रवाहा मुळे समुद्रालगत असलेल्या वाळूचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होत असते. अशा वेळी एखाद्या ठिकाणी धूप प्रतिबंधक बंधारा बांधल्यास या वाळूच्या नैसर्गिक वहन प्रक्रि येत बदल होऊन समुद्र, खाडीत मोठमोठे वाळूचे ढीग जमा व्हायला सुरुवात होते आणि दुसऱ्या बाजूने समुद्राची धूप व्हायला सुरुवात होत असल्याचे पर्यावरणाचे अभ्यासक भूषण भोईर यांनी लोकमत ला सांगितले. याच काही कारणा मुळे आणि सीआरझेड १ मधील नियमाचा आधार घेऊन या सर्व बंधाऱ्यांची मंजुरी नाकारण्यात आली आहे. हे बंधारे ज्या ठिकाणी उभारण्यात येणार होते त्याचा सर्व्हे (आकृती बंध) सीआरझेड प्राधिकरण समितीच्या अधिकाऱ्यांनी नैसिर्गक समुद्र किनारे भौगोलिक शास्त्राअंतर्गत केल्यानंतर ते नामंजूर करण्यात आल्याचे सीआरझेडच्या चेअरमन नी घोषित केले आहे.