शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

गावांना हाेणार समदाबाने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 23:38 IST

सफाळे येथे आयआयटी मुंबईचा प्रकल्प : देशातील पहिलाच प्रयाेग

हितेन नाईकलोकमत न्यूज नेटवर्क पालघर/सफाळे : अनेक वर्षांपासून अडचणीत असलेली उंबरपाडा नंदाडे १७ गावे पाणीपुरवठा योजनेला पुनरुज्जीवित करून शेवटच्या गावापर्यंत समान दाबाने पाणी पोहाेचण्यासाठी सफाळे ग्रामपंचायतीने आयआयटी, मुंबईच्या सहकार्याने पुढाकार घेतला होता. कमी खर्चात संपूर्ण गावाला समान दबाने पाणीपुरवठा करण्याचे तसेच अत्यंत कमी जागेत उभी राहणारी ही संकल्पना प्रत्यक्षात उतरत आहे. देशात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प ठरणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर पाणी पुरवठा करणाऱ्या संस्थांनी विविध ग्रामपंचायतीमध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शिफारस केंद्रीय स्वच्छता व पाणीपुरवठा विभागाने केली आहे.सफाळे येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने करवाळे धरणातून उंबरपाडा नंदाळे १७ गावे नळ पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेतल्यानंतर २००३ मध्येे ही योजना सुरू करण्यात आली होती. त्या योजनेत उंबरपाडा, सफाळे, कर्दळ, माकणे, मांडे, विराथन बुद्रुक, जलसार, करवाळे, नवघर, वाढीव आदी गावांचा समावेश करण्यात आला होता. अनेक गावांत पाणीच पोहोचत नसल्याची ओरड होत असल्याने आयटीचे प्रोफेसर डॉ. प्रदीप काळबर यांना सफाळे ग्रामपंचायतीने पाचारण केले होते.त्यांनी या योजनेचा अभ्यास करून ५० हजार ते एक लाख लीटर क्षमतेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील पाण्याच्या टाकीला १० ते २० लाखांचा येणाऱ्या खर्चात बचत करून पाणी पुरवठा करण्यासाठी 'शाफ्ट' ही दोन पाइपमधली व्यवस्था निर्माण केली आहे. यासाठी पूर्वीच्या काळामध्ये वापरल्या जाणाऱ्या 'खांब' या तंत्रज्ञानाचा वापर डॉ. काळभोर यांनी केला. अवघ्या सुमारे दोन लाख रुपये खर्चून उभारलेल्या या पहिल्या शाफ्टमुळे सफाळे डोंगरी भागातील पाच हजारांहून अधिक नागरिकांना याचा लाभ होणार आहे. या गावांमध्ये असलेल्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील तीन जलवाहिन्यांना शाफ्ट, मनिफॉल्ड व मास्टरपीस अशी उपकरणे बसवण्याचे काम सुरू आहे. गावात निर्माण होणारी सांडपाण्यावर प्रक्रिया करून पाण्याचा पुनर्वापर करण्याची प्रकल्प सफाळे ग्रामपंचायतीने हाती घेतला असून पाण्याचा समग्र व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने सफाळे उंबरपाडा ही ग्रामपंचायत संपूर्ण जिल्ह्यात वेगळा आदर्श निर्माण केला आहे. या कमी खर्चातील प्रभावी तंत्रज्ञानाचा जिल्ह्यात अधिकाधिक प्रसार व्हावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे आयआयटीचे प्रा. प्रदीप काळबर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

केंद्रीय पाणीपुरवठा विभागाच्या संचालकांची शिफारसखांबाच्या आकाराचा शाफ्ट कमी खर्चात उभारून सर्व वाहिन्यांवर समदाब निर्माण करण्याची क्षमता असलेले तंत्रज्ञान देशात पूर्वापार जायचे. त्याचे अनुकरण व प्रात्यक्षिक सफाळे येथे करण्यात आले. या तंत्रज्ञानाचा सर्व ग्रामीण नळपणी योजनांमध्ये वापर करावा, असे केंद्रीय पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या संचालकाने राज्याच्या प्रधान सचिवांना पत्राद्वारे कळवले आहे.