शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
3
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
4
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
5
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
6
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
7
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
8
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
9
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
10
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
11
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
12
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
13
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
14
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
15
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
16
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
17
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
18
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
19
APAAR: राज्यभरातील १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे ‘अपार’ फेल
20
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?

निचोळे गावातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले; जल प्रदूषणामुळे झाल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:30 IST

श्री कृष्णा डेरी फार्मच्या प्रदूषित पाण्यामुळे गावातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले

वाडा : या तालुक्यातील निचोळे गावात असलेल्या श्री कृष्णा डेरी फार्मच्या प्रदूषित पाण्यामुळे गावातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले असून ते पिण्यायोग्य नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच तहसीलदार यांना पाठविलेल्या निवेदनात केला असून कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. मात्र कंपनी व्यवस्थापनाने या आरोपांचे खंडन केले आहे.या कंपनीत दुग्धजन्य पदार्थ पनीर, चीज व योगर्ट याचे उत्पादन केले जाते. पाच वर्षापासून ही कंपनी येथे कार्यरत आहे. कंपनीत पनीर बनविताना केमिकल वापरले जाते. हे केमिकल मिश्रीत पाणी कंपनीच्या एका बाजूला तलाव काढून त्यात सोडले जाते. हे पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे जल प्रदूषण होत असून गावात सार्वजनिक तसेच खाजगी विहीर आणि कूपनलिकेतील पाणी त्यामुळे दूषित झाले आहे. त्यात क्षारांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. हे पाणी अंगावर घेतल्यास खाज येते ते प्यायल्यास गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची भीती नागरिकांनी निवेदनात व्यक्त केली आहे.कंपनीजवळ हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषदेची शाळा आहे. या कंपनीत वीज गेल्यास जनरेटर लावला जातो. त्यामुळे वायू प्रदूषण होत असून ते विद्यार्थांच्या आरोग्यास धोका उत्पन्न करणारे असल्याचे निवेदनात नमूद केले. एकंदरीत कंपनीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ही कंपनी बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे.कंपनीत गावातील सुमारे ५० ते ६० कामगार काम करीत आहेत. जर पाण्यामुळे प्रदूषण झाले असते तर या कामगारांनाही त्रास झाला असता. मात्र गावातील कामगारांना कुठलाही त्रास होत नाही. गावातील राजकीय वाद कंपनीमध्ये आणला जात आहे. तसेच कंपनीमध्ये एटीपी प्लॅन्ट असून कारखान्यातील पाण्यावर प्रक्रि या करून ते पाणी कंपनीतील झाडांना दिले जाते. गेल्या एप्रिल मे महिन्यात या पाण्यावर भेंडी व वांग्याचं भरघोस उत्पन्न काढण्यात आले.- सुरेश पष्टे, व्यवस्थापक, श्री कृष्णा डेरी फार्म

टॅग्स :Waterपाणी