शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

निचोळे गावातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले; जल प्रदूषणामुळे झाल्याचा ग्रामस्थांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2019 00:30 IST

श्री कृष्णा डेरी फार्मच्या प्रदूषित पाण्यामुळे गावातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले

वाडा : या तालुक्यातील निचोळे गावात असलेल्या श्री कृष्णा डेरी फार्मच्या प्रदूषित पाण्यामुळे गावातील पाण्यात क्षारांचे प्रमाण वाढले असून ते पिण्यायोग्य नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच तहसीलदार यांना पाठविलेल्या निवेदनात केला असून कंपनी बंद करण्याची मागणी केली आहे. मात्र कंपनी व्यवस्थापनाने या आरोपांचे खंडन केले आहे.या कंपनीत दुग्धजन्य पदार्थ पनीर, चीज व योगर्ट याचे उत्पादन केले जाते. पाच वर्षापासून ही कंपनी येथे कार्यरत आहे. कंपनीत पनीर बनविताना केमिकल वापरले जाते. हे केमिकल मिश्रीत पाणी कंपनीच्या एका बाजूला तलाव काढून त्यात सोडले जाते. हे पाणी जमिनीत मुरते. त्यामुळे जल प्रदूषण होत असून गावात सार्वजनिक तसेच खाजगी विहीर आणि कूपनलिकेतील पाणी त्यामुळे दूषित झाले आहे. त्यात क्षारांचे प्रमाण वाढले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी निवेदनात केला आहे. हे पाणी अंगावर घेतल्यास खाज येते ते प्यायल्यास गंभीर स्वरूपाचे आजार होण्याची भीती नागरिकांनी निवेदनात व्यक्त केली आहे.कंपनीजवळ हाकेच्या अंतरावर जिल्हा परिषदेची शाळा आहे. या कंपनीत वीज गेल्यास जनरेटर लावला जातो. त्यामुळे वायू प्रदूषण होत असून ते विद्यार्थांच्या आरोग्यास धोका उत्पन्न करणारे असल्याचे निवेदनात नमूद केले. एकंदरीत कंपनीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून ही कंपनी बंद करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी निवेदनात केली आहे.कंपनीत गावातील सुमारे ५० ते ६० कामगार काम करीत आहेत. जर पाण्यामुळे प्रदूषण झाले असते तर या कामगारांनाही त्रास झाला असता. मात्र गावातील कामगारांना कुठलाही त्रास होत नाही. गावातील राजकीय वाद कंपनीमध्ये आणला जात आहे. तसेच कंपनीमध्ये एटीपी प्लॅन्ट असून कारखान्यातील पाण्यावर प्रक्रि या करून ते पाणी कंपनीतील झाडांना दिले जाते. गेल्या एप्रिल मे महिन्यात या पाण्यावर भेंडी व वांग्याचं भरघोस उत्पन्न काढण्यात आले.- सुरेश पष्टे, व्यवस्थापक, श्री कृष्णा डेरी फार्म

टॅग्स :Waterपाणी