शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

‘मोफत’ धान्याची १० रुपये किलोने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 01:08 IST

शिधापत्रिकेवरील तांदूळ, गहू : धान्य न घेणाऱ्यांचा कोटा केला खरेदी

कुमार बडदे।लोकमत न्यूज नेटवर्कमुंब्रा : कोरोना महामारीमध्ये कोणीही उपाशी राहू नये यासाठी मागील सहा महिन्यांपासून सरकार शिधावाटपधारकांना देत असलेल्या मोफत अन्नधान्याचा आता काही कुटुंबांनी चक्क व्यवसाय सुरूकेला आहे. मोफत मिळत असलेला गहू, तांदूळ ते ओळखीच्या कुटुंबांना १० रुपये प्रतिकिलो दराने विकत आहेत. मोफत मिळणारे धान्य विकणाºया आणि विकत घेणाऱ्यांच्या चेहºयावर ते यात काही गैरकरीत असल्याचा लवलेशही दिसत नाही हे विशेष.कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी २२ मार्चच्या मध्यरात्रीपासून देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. नागरिकांची उपासमार होऊ नये यासाठी सरकारने तीन महिन्यांसाठी शिधावाटप दुकानामध्ये माणशी ५ किलो तांदूळ मोफत देण्याची घोषणा केली होती. अनलॉकनंतरही परिस्थिती अद्याप पूर्णपणे पूर्वपदावर आली नसल्याने ही योजना सुरू आहे.सध्या माणशी दोन किलो तांदूळ, तीन किलो गहू विकत आणि मोफतही मिळत आहेत. तसेच प्रति शिधापत्रिकेवर उपलब्धतेनुसार एक किलो चणाडाळ किंवा तूरडाळ मोफत मिळत आहे.मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या या मोफत धान्य योजनेमुळे ज्या कुटुंबांच्या शिधापत्रिकेवर जास्त नावे त्यांच्या तसेच जे रेशन दुकानामधील गहू, तांदुळाचे सेवन करीत नाहीत अशा घरांमध्ये मोफत मिळत असलेल्या गहू, तांदुळाच्या राशी जमा झाल्या आहेत. पावसाळ्यातील दमट हवामानामुळे धान्याला कीड लागण्यास सुरुवात झाल्याने काहींनी आपल्याकडील धान्याचा साठा लवकरात लवकर निकाली काढण्याच्या उद्देशाने, तर काहींनी इतर वस्तू खरेदी करण्यासाठी पैसा उपलब्ध व्हावा यासाठी मोफत मिळत असलेल्या गहू, तादुळांची १० रुपये प्रति किलो दराने विक्री करण्यास सुरुवात केली आहे.काही महिलांनी गेल्या सहा महिन्यांत १०० ते १५० किलो धान्य गोळा केले असून आता त्या विक्री करून कुटुंबाची गुजराण करीत आहेत.काही गैर करीत असल्याचा लवलेशही नाहीच्मोफत मिळणारे धान्य विकणाºया आणि विकत घेणाºयांच्या चेहºयावर ते यात काही गैर करीत असल्याचा लवलेशही दिसत नाही.च्इतर वस्तू खरेदी करण्यासाठी धान्य विकत असल्याचे उत्तर धान्य विकणाºया एका महिलेने दिले, तर किरकोळ बाजारात एवढ्या स्वस्तामध्ये धान्य मिळत नसल्यामुळे खरेदी करीत असल्याचे धान्य विकत घेणाºयाने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.