शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

साहिल बेपत्ताच, लालबागच्या राजाच्या विसर्जनात समुद्रात बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 03:46 IST

लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्या दरम्यान गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात बोटीला झालेल्या अपघातात सोमवारी पाण्यात पडलेल्या घिवली गावातील साहिल जयेश मरदे या ५ वर्षीय मुलाचा दोन दिवस झाले तरी अजून थांगपत्ता लागलेला नाही.

पालघर : लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्या दरम्यान गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात बोटीला झालेल्या अपघातात सोमवारी पाण्यात पडलेल्या घिवली गावातील साहिल जयेश मरदे या ५ वर्षीय मुलाचा दोन दिवस झाले तरी अजून थांगपत्ता लागलेला नाही. त्याचे संपूर्ण कुटुंब, मच्छिमारांसह त्याचा शोध घेत आहेत. त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या शोध घेण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पथके नेमावित अशी मागणी घिवली ग्रामस्थामधून केली जात आहे.लालबागच्या राजाच्या दर्शनाची आस गणेशभक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्याचे विसर्जन सकाळ पर्यंत सुरू असल्याचे माहीत असल्याने तारापूर जवळील घिवली गावातील जयेश मरदे हे आपली पत्नी नीता, मुलगी त्रिवेणी (१० वर्ष) आणि मुलगा साहिलसह अनंतचतुर्दशीला (रविवारी) कफपरेडला पोचले. सकाळी लवकर उठून साहिल आपले बाबा, आई आणि बहिणीसह आपल्या मामाच्या राजधानी बोटीत जाऊन बसला. ही बोट चौपाटीवर पोचल्यानंतर सुमारे ८.४५ च्या सुमारास लालबागच्या गणपतीचा विसर्जन सोहळा पाहत असताना शेजारच्या बोटीशी टक्कर झाल्याने ही बोट उलटली. त्यामुळे बोटीतील सर्व माणसे पाण्यात बुडाली. याच वेळी नीता हिने प्रसंगावधान राखीत पाण्यात बुडत असलेल्या आपल्या मुलीच्या केसाला पकडून ठेवले. तर आपल्याला बिलगलेल्या साहिल यालाही घट्ट पकडून ठेवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी लोकमतला सांगितले. ही बोट पाण्यात उलटल्यानंतर एकच आरडाओरड होत अनेकांनी मदतीसाठी पाण्यात उड्या घेतल्या. या दरम्यान आपल्या हातातील मुलाला कुणीतरी घेतल्याचे त्याच्या आईचे म्हणणे आहे. मात्र या घटनेला २४ तासाचा अवधी लोटल्या नंतर ही साहिलचा शोध लागला नसल्याने मरदे कुटुंबीय आणि घिवली गावाला दु:खाने ग्रासले आहे. आपल्या मुलाचा शोध घेण्याबाबत पोलीस आणि प्रशासनाकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे साहिलला कोणी चोरून नेले? की त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला? या बाबत काहीही कळत नसल्याने साहिलच्या आईचे अश्रू अविरत झरत आहे.प्रशासन आणि पोलिसांनी साहिलच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करून, समुद्रात त्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तात्काळ उभारायला हवी. आज दोन दिवस झाले तरी त्यांना अजून जाग कशी येत नाही?- नयन तामोरे, ग्रामस्थ, घिवली

टॅग्स :newsबातम्याGanesh Visarjanगणेश विसर्जन