शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

साहिल बेपत्ताच, लालबागच्या राजाच्या विसर्जनात समुद्रात बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 03:46 IST

लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्या दरम्यान गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात बोटीला झालेल्या अपघातात सोमवारी पाण्यात पडलेल्या घिवली गावातील साहिल जयेश मरदे या ५ वर्षीय मुलाचा दोन दिवस झाले तरी अजून थांगपत्ता लागलेला नाही.

पालघर : लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्या दरम्यान गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात बोटीला झालेल्या अपघातात सोमवारी पाण्यात पडलेल्या घिवली गावातील साहिल जयेश मरदे या ५ वर्षीय मुलाचा दोन दिवस झाले तरी अजून थांगपत्ता लागलेला नाही. त्याचे संपूर्ण कुटुंब, मच्छिमारांसह त्याचा शोध घेत आहेत. त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या शोध घेण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पथके नेमावित अशी मागणी घिवली ग्रामस्थामधून केली जात आहे.लालबागच्या राजाच्या दर्शनाची आस गणेशभक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्याचे विसर्जन सकाळ पर्यंत सुरू असल्याचे माहीत असल्याने तारापूर जवळील घिवली गावातील जयेश मरदे हे आपली पत्नी नीता, मुलगी त्रिवेणी (१० वर्ष) आणि मुलगा साहिलसह अनंतचतुर्दशीला (रविवारी) कफपरेडला पोचले. सकाळी लवकर उठून साहिल आपले बाबा, आई आणि बहिणीसह आपल्या मामाच्या राजधानी बोटीत जाऊन बसला. ही बोट चौपाटीवर पोचल्यानंतर सुमारे ८.४५ च्या सुमारास लालबागच्या गणपतीचा विसर्जन सोहळा पाहत असताना शेजारच्या बोटीशी टक्कर झाल्याने ही बोट उलटली. त्यामुळे बोटीतील सर्व माणसे पाण्यात बुडाली. याच वेळी नीता हिने प्रसंगावधान राखीत पाण्यात बुडत असलेल्या आपल्या मुलीच्या केसाला पकडून ठेवले. तर आपल्याला बिलगलेल्या साहिल यालाही घट्ट पकडून ठेवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी लोकमतला सांगितले. ही बोट पाण्यात उलटल्यानंतर एकच आरडाओरड होत अनेकांनी मदतीसाठी पाण्यात उड्या घेतल्या. या दरम्यान आपल्या हातातील मुलाला कुणीतरी घेतल्याचे त्याच्या आईचे म्हणणे आहे. मात्र या घटनेला २४ तासाचा अवधी लोटल्या नंतर ही साहिलचा शोध लागला नसल्याने मरदे कुटुंबीय आणि घिवली गावाला दु:खाने ग्रासले आहे. आपल्या मुलाचा शोध घेण्याबाबत पोलीस आणि प्रशासनाकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे साहिलला कोणी चोरून नेले? की त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला? या बाबत काहीही कळत नसल्याने साहिलच्या आईचे अश्रू अविरत झरत आहे.प्रशासन आणि पोलिसांनी साहिलच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करून, समुद्रात त्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तात्काळ उभारायला हवी. आज दोन दिवस झाले तरी त्यांना अजून जाग कशी येत नाही?- नयन तामोरे, ग्रामस्थ, घिवली

टॅग्स :newsबातम्याGanesh Visarjanगणेश विसर्जन