शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

साहिल बेपत्ताच, लालबागच्या राजाच्या विसर्जनात समुद्रात बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2018 03:46 IST

लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्या दरम्यान गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात बोटीला झालेल्या अपघातात सोमवारी पाण्यात पडलेल्या घिवली गावातील साहिल जयेश मरदे या ५ वर्षीय मुलाचा दोन दिवस झाले तरी अजून थांगपत्ता लागलेला नाही.

पालघर : लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्या दरम्यान गिरगाव चौपाटी समोरील समुद्रात बोटीला झालेल्या अपघातात सोमवारी पाण्यात पडलेल्या घिवली गावातील साहिल जयेश मरदे या ५ वर्षीय मुलाचा दोन दिवस झाले तरी अजून थांगपत्ता लागलेला नाही. त्याचे संपूर्ण कुटुंब, मच्छिमारांसह त्याचा शोध घेत आहेत. त्याचा कुठेही थांगपत्ता लागत नसल्याने त्याच्या शोध घेण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र पथके नेमावित अशी मागणी घिवली ग्रामस्थामधून केली जात आहे.लालबागच्या राजाच्या दर्शनाची आस गणेशभक्तांमध्ये मोठ्या प्रमाणात असते. त्याचे विसर्जन सकाळ पर्यंत सुरू असल्याचे माहीत असल्याने तारापूर जवळील घिवली गावातील जयेश मरदे हे आपली पत्नी नीता, मुलगी त्रिवेणी (१० वर्ष) आणि मुलगा साहिलसह अनंतचतुर्दशीला (रविवारी) कफपरेडला पोचले. सकाळी लवकर उठून साहिल आपले बाबा, आई आणि बहिणीसह आपल्या मामाच्या राजधानी बोटीत जाऊन बसला. ही बोट चौपाटीवर पोचल्यानंतर सुमारे ८.४५ च्या सुमारास लालबागच्या गणपतीचा विसर्जन सोहळा पाहत असताना शेजारच्या बोटीशी टक्कर झाल्याने ही बोट उलटली. त्यामुळे बोटीतील सर्व माणसे पाण्यात बुडाली. याच वेळी नीता हिने प्रसंगावधान राखीत पाण्यात बुडत असलेल्या आपल्या मुलीच्या केसाला पकडून ठेवले. तर आपल्याला बिलगलेल्या साहिल यालाही घट्ट पकडून ठेवल्याचे प्रत्यक्षदर्शींनी लोकमतला सांगितले. ही बोट पाण्यात उलटल्यानंतर एकच आरडाओरड होत अनेकांनी मदतीसाठी पाण्यात उड्या घेतल्या. या दरम्यान आपल्या हातातील मुलाला कुणीतरी घेतल्याचे त्याच्या आईचे म्हणणे आहे. मात्र या घटनेला २४ तासाचा अवधी लोटल्या नंतर ही साहिलचा शोध लागला नसल्याने मरदे कुटुंबीय आणि घिवली गावाला दु:खाने ग्रासले आहे. आपल्या मुलाचा शोध घेण्याबाबत पोलीस आणि प्रशासनाकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे. त्यामुळे साहिलला कोणी चोरून नेले? की त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला? या बाबत काहीही कळत नसल्याने साहिलच्या आईचे अश्रू अविरत झरत आहे.प्रशासन आणि पोलिसांनी साहिलच्या शोधासाठी सीसीटीव्ही फुटेज ची तपासणी करून, समुद्रात त्याचा शोध घेण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तात्काळ उभारायला हवी. आज दोन दिवस झाले तरी त्यांना अजून जाग कशी येत नाही?- नयन तामोरे, ग्रामस्थ, घिवली

टॅग्स :newsबातम्याGanesh Visarjanगणेश विसर्जन