शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

२६ तासांनंतर खलाशाची सुखरूप सुटका; वसईच्या 'त्या' संशयित बोटीची अखेर ओळख पटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2021 19:21 IST

स्टील लाँच बोट दोरखंड तुटल्याने नायगावच्या उत्तन समुद्रातून भरकटून वसईच्या भुईगाव समुद्रातील खडकाळ भागात येऊन अडकली होती.

ठळक मुद्देशुक्रवारी सकाळपासून वसई पोलीस व कोस्टल गार्डच्या मदतीने बोटीचे सर्च ऑपरेशन सुरू केले होते.उत्तनच्या समुद्रकिनारी ही बोट असताना चालक जेवण आणण्यासाठी गेला होता व बोटीत खलाशी एकटाच होता. हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू करत किनाऱ्यावर आणण्यात आले. रफिक शेख असे सुटका केलेल्या खलाशाचे नाव आहे.

नालासोपारा : भुईगाव समुद्रकिनारी गुरुवारपासून अडकून पडलेल्या संशयित बोटीची अखेर २६ तासांनी ओळख पटविण्यात वसई पोलिसांना यश आले आहे. ही बोट स्टील लाँच बोट आहे.

स्टील लाँच बोट दोरखंड तुटल्याने नायगावच्या उत्तन समुद्रातून भरकटून वसईच्या भुईगाव समुद्रातील खडकाळ भागात येऊन अडकली होती. ही अज्ञात बोट संशयित वाटत असल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यासाठी शुक्रवारी सकाळपासून वसई पोलीस व कोस्टल गार्डच्या मदतीने बोटीचे सर्च ऑपरेशन सुरू केले होते. मात्र ती खडकाळ भागात असल्याने कोस्टल गार्डच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने सर्च ऑपरेशन सुरू ठेवले होते. या बोटीत एक खलाशी अडकला होता. त्याला हेलिकॉप्टरच्या मदतीने रेस्क्यू करत किनाऱ्यावर आणण्यात आले. रफिक शेख असे सुटका केलेल्या खलाशाचे नाव आहे. उत्तनच्या समुद्रकिनारी ही बोट असताना चालक जेवण आणण्यासाठी गेला होता व बोटीत खलाशी एकटाच होता. बोट बांधून ठेवलेली रश्शी अचानक तुटल्याने बोट या ठिकाणी येऊन फसल्याचे बोट मालक राफ्टर कालुके यांनी लोकमतला सांगितले. खलाशाला बोटचे इंजिन चालू करता आले नाही. त्यामुळे तो फसला होता. त्याचा मोबाईल सुरू होता व त्याच्यासोबत मी सतत संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.

बोटीवर अडकलेल्या या खलाशाची तब्बल २६ तासांनी सुटका करण्यात आल्याचे पोलिसांनी ‘लोकमत’ला सांगितले. या बोटीचा गुरुवारीपासून काही पत्ता लागत नसल्याने पोलिसांची झोप उडाली होती. अखेर बोट व बोटमालकाची ओळख पटल्याने पोलिसांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.

बुधवारी रात्री ११ च्या दरम्यान रफिक शेख बोटीत झोपलेला असताना रश्शी तुटली व बोट भरकटली. तो गुरुवारी पहाटे साडेसहाला उठला तेव्हा बोट कुठे तरी आल्याचे त्याला कळले. त्याच्याकडे मोबाईल होता, पण त्यात बॅलन्स नसल्याने त्याला कॉल करता आला नाही. गुरुवारी दुपारी दीड वाजता त्याला सहकाऱ्याने कॉल केल्यावर बोट व त्याची माहिती मिळाली. बोट मालकाने कुठेही बोटची तक्रार दिली नसल्यामुळे त्रास झाला. त्याने मिसिंग तक्रार दिली असती तर शोध लावण्यात वेळ लागला नसता. शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास कोस्ट गार्डच्या हेलिकॉप्टरच्या साहायाने त्याची सुटका केली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. - कल्याणराव कर्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वसई पोलीस ठाणे.