शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
2
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
3
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
4
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
5
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
7
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
8
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
9
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
10
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
11
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
12
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
13
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
14
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
15
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
16
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
18
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
19
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
20
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

वसईतील युवक पतसंस्थेत साडेआठ कोटींचा गैरव्यवहार; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:47 IST

वसईतील भंडारी समाजाच्या युवक सहकारी पतसंस्थेतील तीन अधिकाऱ्यांनी कर्मचा-यांच्या संगनमताने तब्बल आठ कोटी ५६ लाख १९ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे उजेडात आले असून याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई : वसईतील भंडारी समाजाच्या युवक सहकारी पतसंस्थेतील तीन अधिकाऱ्यांनी कर्मचा-यांच्या संगनमताने तब्बल आठ कोटी ५६ लाख १९ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे उजेडात आले असून याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मागील बारा वर्षांपासून तत्कालीन व्यवस्थापकासह दोन व्यवस्थापक, दोन कर्मचारी आणि एक शिपाई यांनी हा घोटाळा केल्याचे उजेडात आले होते. व्यवस्थापनाने सहाही जणांना सात महिन्यांपूर्वी बडतर्फ करून चौकशी सुुरु केली होती. चौकशीत तथ्य आढळल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौधरी यांनी तक्रार दिल्यानंतर निवृत्त व्यवस्थापक मगनचंद राठोड, वसई शाखा व्यवस्थापक अविनाश चोरघे, सोपारा शाखा व्यवस्थापक रितेश म्हात्रे, रोखपाल सूरज ठाकूर, लिपीक समीर पाटील, शिपाई संजय चौधरी यांच्याविरोधात वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला.आरोपींनी गेल्या बारा वर्षांपासून पतसंस्थेच्या आवर्त ठेव, मुदत ठेव, दैनिक बचत ठेव, दाम दुप्पट योजना, शुभंकरोती योजना, निवृत्ती ठेव योजना व तारण सोने कर्जात घोटाळा केल्याचे उजेडात आले आहे. आरोपींनी बनावट व खोटे दस्ताऐवज तयार करून खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कमा काढून विविध ठेवींमध्ये फेरफार करून पैसे हडपले.इतकेच नाही तर तारण कर्जामधील सोने परस्पर विल्हेवाट लावून त्याच्या रकमाही हडप केल्या. तसेच लेखा पुस्तक व दस्तऐवजांमध्ये खोट्या नोंदी घेऊन खोटे हिशोब सादर करून तब्बल ८ कोटी ५६ हजार १९हजार ७३२ रुपये हडप केल्याचे निष्पन्न झाले आहे. संस्थेचे भागधारक प्रफुल्ल ठाकूर आणि अतुल पाटील यांनी हा घोटाळा चव्हाट्यावर आणून तक्रारी केल्या होत्या.

टॅग्स :Crimeगुन्हाVasai Virarवसई विरार