शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील युवक पतसंस्थेत साडेआठ कोटींचा गैरव्यवहार; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:47 IST

वसईतील भंडारी समाजाच्या युवक सहकारी पतसंस्थेतील तीन अधिकाऱ्यांनी कर्मचा-यांच्या संगनमताने तब्बल आठ कोटी ५६ लाख १९ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे उजेडात आले असून याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई : वसईतील भंडारी समाजाच्या युवक सहकारी पतसंस्थेतील तीन अधिकाऱ्यांनी कर्मचा-यांच्या संगनमताने तब्बल आठ कोटी ५६ लाख १९ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे उजेडात आले असून याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मागील बारा वर्षांपासून तत्कालीन व्यवस्थापकासह दोन व्यवस्थापक, दोन कर्मचारी आणि एक शिपाई यांनी हा घोटाळा केल्याचे उजेडात आले होते. व्यवस्थापनाने सहाही जणांना सात महिन्यांपूर्वी बडतर्फ करून चौकशी सुुरु केली होती. चौकशीत तथ्य आढळल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौधरी यांनी तक्रार दिल्यानंतर निवृत्त व्यवस्थापक मगनचंद राठोड, वसई शाखा व्यवस्थापक अविनाश चोरघे, सोपारा शाखा व्यवस्थापक रितेश म्हात्रे, रोखपाल सूरज ठाकूर, लिपीक समीर पाटील, शिपाई संजय चौधरी यांच्याविरोधात वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला.आरोपींनी गेल्या बारा वर्षांपासून पतसंस्थेच्या आवर्त ठेव, मुदत ठेव, दैनिक बचत ठेव, दाम दुप्पट योजना, शुभंकरोती योजना, निवृत्ती ठेव योजना व तारण सोने कर्जात घोटाळा केल्याचे उजेडात आले आहे. आरोपींनी बनावट व खोटे दस्ताऐवज तयार करून खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कमा काढून विविध ठेवींमध्ये फेरफार करून पैसे हडपले.इतकेच नाही तर तारण कर्जामधील सोने परस्पर विल्हेवाट लावून त्याच्या रकमाही हडप केल्या. तसेच लेखा पुस्तक व दस्तऐवजांमध्ये खोट्या नोंदी घेऊन खोटे हिशोब सादर करून तब्बल ८ कोटी ५६ हजार १९हजार ७३२ रुपये हडप केल्याचे निष्पन्न झाले आहे. संस्थेचे भागधारक प्रफुल्ल ठाकूर आणि अतुल पाटील यांनी हा घोटाळा चव्हाट्यावर आणून तक्रारी केल्या होत्या.

टॅग्स :Crimeगुन्हाVasai Virarवसई विरार