शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

वसईतील युवक पतसंस्थेत साडेआठ कोटींचा गैरव्यवहार; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 01:47 IST

वसईतील भंडारी समाजाच्या युवक सहकारी पतसंस्थेतील तीन अधिकाऱ्यांनी कर्मचा-यांच्या संगनमताने तब्बल आठ कोटी ५६ लाख १९ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे उजेडात आले असून याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसई : वसईतील भंडारी समाजाच्या युवक सहकारी पतसंस्थेतील तीन अधिकाऱ्यांनी कर्मचा-यांच्या संगनमताने तब्बल आठ कोटी ५६ लाख १९ हजार रुपयांचा घोटाळा केल्याचे उजेडात आले असून याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मागील बारा वर्षांपासून तत्कालीन व्यवस्थापकासह दोन व्यवस्थापक, दोन कर्मचारी आणि एक शिपाई यांनी हा घोटाळा केल्याचे उजेडात आले होते. व्यवस्थापनाने सहाही जणांना सात महिन्यांपूर्वी बडतर्फ करून चौकशी सुुरु केली होती. चौकशीत तथ्य आढळल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष प्रकाश चौधरी यांनी तक्रार दिल्यानंतर निवृत्त व्यवस्थापक मगनचंद राठोड, वसई शाखा व्यवस्थापक अविनाश चोरघे, सोपारा शाखा व्यवस्थापक रितेश म्हात्रे, रोखपाल सूरज ठाकूर, लिपीक समीर पाटील, शिपाई संजय चौधरी यांच्याविरोधात वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केला.आरोपींनी गेल्या बारा वर्षांपासून पतसंस्थेच्या आवर्त ठेव, मुदत ठेव, दैनिक बचत ठेव, दाम दुप्पट योजना, शुभंकरोती योजना, निवृत्ती ठेव योजना व तारण सोने कर्जात घोटाळा केल्याचे उजेडात आले आहे. आरोपींनी बनावट व खोटे दस्ताऐवज तयार करून खातेदारांच्या खात्यातून परस्पर रक्कमा काढून विविध ठेवींमध्ये फेरफार करून पैसे हडपले.इतकेच नाही तर तारण कर्जामधील सोने परस्पर विल्हेवाट लावून त्याच्या रकमाही हडप केल्या. तसेच लेखा पुस्तक व दस्तऐवजांमध्ये खोट्या नोंदी घेऊन खोटे हिशोब सादर करून तब्बल ८ कोटी ५६ हजार १९हजार ७३२ रुपये हडप केल्याचे निष्पन्न झाले आहे. संस्थेचे भागधारक प्रफुल्ल ठाकूर आणि अतुल पाटील यांनी हा घोटाळा चव्हाट्यावर आणून तक्रारी केल्या होत्या.

टॅग्स :Crimeगुन्हाVasai Virarवसई विरार