शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रिक्षावाल्यांनी केली प्रवाशांची लूट

By admin | Updated: March 9, 2017 02:10 IST

मंगळवारी संध्याकाळी मालगाडी घसरल्याने बंद पडलेली पश्चिम रेल्वेची वाहतूक कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने तब्बल १५ तासा नंतर पूर्ववत सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले

पालघर : मंगळवारी संध्याकाळी मालगाडी घसरल्याने बंद पडलेली पश्चिम रेल्वेची वाहतूक कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नाने तब्बल १५ तासा नंतर पूर्ववत सुरु करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. या घटनेत प्रवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असताना खाजगी वाहतूकदारांनी अनेक प्रवाशांची लूट केली.काल संध्याकाळी ५ वाजून ५८ मिनिटांनी मुंबईकडे जाणारी मालगाडी घसरल्या नंतर अप व डाऊन ट्रॅक बंद पडले होते, मात्र स्थानिक प्रशासनाने तीन तासा नंतर डाऊन लाईन सुरु करु न मुंबईहुन गुजरात व दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानीसह एक्स्प्रेस गाड्याना प्राधान्य दिल्याने दैनंदिन प्रवासी संतप्त झाले होते. वलसाड पॅसेंजर सह अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या.सफाळे येथील रेल्वे ट्रॅकच्या दुरुस्तीसाठी वापी येथून काल ८ वाजता पहिली क्रेन आली. आणि युद्धपातळीवर काम सुरु ठेऊन रेल्वे प्रशासनाने ९ वाजेपर्यंत काम सुरु केले व पहिली जम्मूतावी बांद्रा गाडी सफाळे स्थानकातून ९:१५ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना झाली. ट्रेन्स अनिश्चित धावत असल्याने स्थानकात अडकून पडलेल्या प्रवाशांना माणुसकीच्या भावनेने मदत करण्याचे काम सर्वच स्थानकात चालू असतांना पालघर-बोईसर मधील रिक्षाधारकांनी मात्र दुप्पट-तिप्पट भाडेवाढ करून प्रवाशाना लुटण्याचे काम केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. दोन्ही बाजू कडील रेल्वे सेवा ठप्प पडल्या नंतर डहाणू आणि विरारकडे जाणारा हजारो प्रवाशांचा लोंढा विविध स्थानकावर अडकून पडला होता. जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी तात्काळ विविध विभागांना आपल्या सेवा पुरविण्याच्या सूचना केल्या. एसटी महामंडळाच्या पालघर विभागाने डहाणू, विरार, सफाळे, बोईसर इ. भागातील प्रवाश्यांसाठी ५० बसेसची व्यवस्था करून प्रवाशांना दिलासा दिला.पालघर विभाग नियंत्रक अजित गायकवाड, डेपो मॅनजर व्ही एस भंडारे यांनी योग्य नियंत्रण केले. तर दुसरीकडे पालघर ते बोईसर दरम्यानच्या सहाआसनी रिक्षाचे भाडे दर माणसी १५ रुपये असताना ५० रुपये घेऊन लूट केली. स्थानकांवर संघटनांनी प्रवाशाना पाणी, जेवण, नाश्ता इ. सेवा पुरविल्या.