शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

पुन्हा २६/११ च्या पुनरावृत्तीचा धोका; समुद्रात नोंदणीविना हजारो बोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 14:16 IST

समुद्रात नोंदणीविना हजारो बोटी, नियंत्रण परप्रांतीयांच्या हाती?

हितेन नाईक

पालघर : वसई तालुक्यातील अर्नाळा बंदर हद्दीतील विनानोंदणी दोन बोटींवर महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून नुकतीच कारवाई केली गेली. त्यात त्या नष्ट करण्यात आल्या. वसई, पालघर तालुक्यात एक ते दीड हजार रेती उत्खनन करणाऱ्या बोटींपैकी अनेक बोटी नाव, नंबर, नोंदणी न करता आजही समुद्रात जात असल्याने याचा देशविघातक कामांसाठी वापर होण्याची शक्यता पाहता सागरी मंडळाने ही मोहीम अधिक तीव्र करून २६/११ सारख्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कडक पावले उचलायला हवीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून केली जात आहे, तर समुद्रातील या विनानोंदणीच्या हजारो बोटींचे नियंत्रण परप्रांतीयांच्या हाती असण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. वसई तालुक्यातील खानिवडे आणि खाडी किनाऱ्यावर बेकायदेशीररीत्या रेती उत्खनन करणाऱ्या २३० बोटींवर तत्कालीन पालघर पोलिस अधीक्षकांनी कारवाई केली होती. यातील एकाही बोटीवर नाव आणि नंबर नसल्याने या बोटींचा देशविरोधी कामासाठी वापर होण्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यावर अशा नाव, नंबर नसलेल्या बोटींवर मरीन ॲक्टनुसार कारवाई करावी, यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालयाने सागरी महामंडळाकडे पत्रव्यवहारही केला होता. 

बोटींची नोंदणी करा, अन्यथा कारवाईयावेळी सर्व बोट मालकांना सागरी मंडळातर्फे आवाहन करताना आपल्या विनानोंदणी बोटी या नोंदणी करण्यात याव्यात, अन्यथा त्या बोटी नष्ट किंवा जप्त करून लिलाव करण्यात येईल, असा इशारा यावेळी कॅप्टन लेपाडे यांनी दिला.

तपासणीसाठी पोहोचले अधिकारी वैतरणा खाडीत कामगारांच्या बोटीला झालेल्या अपघातामुळे शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली.  त्यावेळी कामगारांना घेऊन जाणाऱ्या बोटीची नोंदणी, चालक प्रशिक्षण पुरावे आदी तपासणीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळातर्फे कॅप्टन लेपाडे, बंदर निरीक्षक नवनीत निजाई, सहायक निरीक्षक प्रसाद पारकर यांना पाचारण करण्यात आले होते.  यांनी वसईतून घटनास्थळी येताना अर्नाळा बंदर हद्दीत रेती उत्खनन करणाऱ्या किनाऱ्यावर उभ्या असलेल्या विनानोंदणी दोन बोटी जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे नष्ट केल्या.

 चोरट्या पद्धतीने रेती उत्खनन

वसई तालुक्यातील खानिवडे, नारिंगी तर पालघर तालुक्यातील बहाडोली, चहाडे, मुरबे, वाढीव, तांदूळ वाडी, पारगाव, सोनावे, दहिवाले, नवघर, घाटीम आदी भागांत मोठ्या प्रमाणात चोरट्या पद्धतीने रेती उत्खनन केले जात आहे. यासाठी सुमारे एक ते दीड हजार बोटींचा वापर केला जात असून, या बोटींची नोंद मात्र महाराष्ट्र सागरी महामंडळाकडे केली जात नसल्याचे दिसून आले आहे. 

टॅग्स :Mumbaiमुंबई26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाpalgharपालघर