शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

वसई तालुक्यात रिमझिम पावसाच्या सरी; ऐन हिवाळ्यात पावसाचा अनुभव !

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2020 14:25 IST

समुद्रात कमी दाबाचा पट्टा; तीन दिवसांपासून वातावरण ढगाळ

आशिष राणे  

वसाई - निसर्गाचे ऋतुचक्र कधी व कसे फिरेल याचा काहिही नेम नाही याउलट हवामान खात्याने आधीच निर्देश दिल्यानुसार  मागील दोन दिवसांत अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्याने सर्वत्र राज्यातील वातावरणावर याचा विपरीत परिणाम आता दिसू लागला आहे. अर्थातच मुंबईसह कोकणातील विविध जिल्ह्यांमध्ये दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण सोबत रिमझिम  पावसाला देखील सुरुवात झाली आहे. पालघर जिल्हाचा डहाणू, पालघर व  वसई तालुक्याचा पश्चिम भाग हा समुद्र किनाऱ्यावर आहे त्यानुसार येथील सर्व भागात काल मध्यरात्रीपासून रिमझिम पाऊस पडत आहे. दरम्यान आधीच हिवाळा व त्यात रिमझिम पाऊस व सोबत हुडहुडी भरणारी थंडी असा दुहेरी सुखद अनुभव सध्या वसईकर घेत आहेत.

परिणामी एकीकडे पाऊस व थंडी यामुळे थंडीत घातल्या जाणाऱ्या स्वेटरऐवजी आता नागरिकांना घराबाहेर पडताना छत्रीचा देखील आधार घ्यावा लागत आहे.तर दुसरीकडे शेती,वाडी करणारे नागरिक यांच्या चिंतेत भर पडली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामान खात्याने पुढचे चार दिवस पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार गेल्या दोन दिवसांपासून वसई-विरार शहरात पावसाच्या सरी बरसत आहेत. आकाशात ढगाळ वातावरणासह हवेत गारवा वाढला आहे. सोबत शहरी व ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सतत सुरू झाला आहे.

समुद्रात मासेमारीला फटका ; सुक्या मच्छीवर संक्रात !

रिमझिम पावसाचा फटका आता वसईतील कोळी बांधव व त्यांच्या समुद्रातील मासेमारीवर देखील बसू लागला आहे. विशेष म्हणजे मासे सुकवण्याच्या प्रक्रियेवर पावसाचा परिणाम होऊ लागला आहे. वसई नायगाव, किल्लाबंदर ,पाचूबंदर अर्नाळा समुद्रकिनारी सुकण्यासाठी टाकलेल्या बोंबील, जवळा सारख्या सुक्या मासळीवर पावसाचे पाणी पडत असल्याने आता मासळी खराब होऊ लागली आहे.

विटभट्टी व्यावसायिकांना फटका -

किनारपट्टी आणि ग्रामीण भागात अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने  व अचानक आलेल्या पावसामुळे पश्चिम व  पूर्व भागातील शेती ,वाडी आणि विटभट्टी व्यवसायिकांचे नुकसान झाले आहे. तर पावसाने असेच रडगाणे सुरू ठेवले तर  रब्बी हंगामातील पिकांना फटका बसण्याची मोठी शक्यता आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारRainपाऊस