शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

नालासोपाऱ्यात रिक्षावाल्यांची दादागिरी; पाच प्रवाशांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 02:34 IST

वाहतूक पोलिसांचेही या गोष्टीकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे.

- मंगेश कराळेनालासोपारा : शहरातील रिक्षावाले मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन करत असून रिक्षातून ३ प्रवासी नेण्याचा नियम असतानाही ४ ते ५ प्रवासी नेतात. वाहतूक पोलिसांचेही या गोष्टीकडे दुर्लक्ष होताना दिसते आहे. त्यामुळे नियमापेक्षा जास्त प्रवासी नेणाºया रिक्षाचालकांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. याबाबत तातडीने काही ना काही कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.नालासोपारा पश्चिमेकडील तसेच पूर्वेकडील पुलाखाली मोठ्या प्रमाणात रिक्षा उभ्या असल्याने नागरिकांना तसेच वाहतुकीला मोठा त्रास होतो. वास्तविक, येथे वाहतूक पोलिसाची गरज असतानाही कोणीही पोलीस नसतो. त्यामुळेच रात्रीच्या वेळी बॅच, परमिट नसलेल्या अनिधकृत रिक्षांचा मोठ्या प्रमाणात वावर येथे दिसतो.नालासोपारा पूर्वेकडे पुलाखाली अनधिकृत रिक्षाचालकांचा सुळसुळाट असून रिक्षा बिनधास्त रस्त्यावर आडव्या, उभ्या करून कोंडी करत असतात. यामुळे नागरिकांना चालण्यास त्रास होत आहे. तर नालासोपारा पश्चिमेकडील एसटी डेपो, हनुमान नगर, छेडा नगर, शांती पार्क, श्री प्रस्था येथे जाणाºया प्रवाशांना हे रिक्षावाले रात्रीच्या वेळी मजबुरीचा गैरफायदा घेत अक्षरश: लुटतात. पूर्वेकडील रिक्षावालेही प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा पैसे घेतात. या रिक्षावाल्यांवर वाहतूक पोलिसांचा वचक नसल्याने त्यांचे फावते आहे. काही रिक्षावाले अनधिकृत आहेत. त्यांच्याकडे परवाना, परमिट, आदी पूरक कागदपत्रे नसूनही ते शहरात रिक्षा चालवतात.रात्रीच्या वेळी वाहतूक पोलीस नसल्याचा गैरफायदा घेऊन महिला प्रवाशांकडून हे रिक्षाचालक अव्वाच्या सव्वा पैसे घेतात.मनीषा वाडकर, महिला प्रवासीअनधिकृत आणि बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली असून ती दररोज सुरू आहे. लवकरच मोठी मोहीम हाती घेऊन या रिक्षांवर कारवाई करून त्या जप्त करण्यात येतील- विलास सुपे, पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा, वसई

टॅग्स :Vasai Virarवसई विरार