शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

पावसाने भातपिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:02 IST

शेतकरी हवालदिल । आर्थिक व मानसिक खच्चीकरण, डोंगरी पट्ट्यातही झोडपले

डहाणू/बोर्डी : अरबी समुद्रात दोन चक्र ीवादळ घोंगावत असताना शुक्र वारी रात्री नऊनंतर मुसळधार पावसाने खाचरात कापून ठेवलेल्या भातपिकाची नासाडी झाली आहे. शुक्र वारी रात्री डहाणू तालुक्यातील चिंचणीपासून ते बोर्डीपर्यंतच्या किनारी भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. शिवाय शहरासह डोंगरी पट्ट्यालाही पावसाने झोडपून काढले.

हळव्या भातपिकाचे नुकसान झाले असताना, दोन दिवस ऊन पडल्यामुळे बळीराजाने गरवे आणि निमगरव्या भाताची कापणी सुरू केली होती. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कापलेले भात खाचरातील पाण्यात तरंगू लागले होते. ते चिखलातून काढताना शेतकरी कुटुंबाची दमछाक झाली. आर्थिक नुकसानीपेक्षाही पिकाची नासाडी झाल्याने शेतकरी मानसिकरित्या खचला आहे.पालघर जिल्ह्यातील भातपिक क्षेत्र ७६ हजार ५०० हेक्टर असून त्यातील ९३ टक्के लागवड झाली आहे. म्हणजे ७१ हजार ३०८ हेक्टर क्षेत्र आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. भात कापल्यावर काही दिवस रिमझिम पाऊस होता. त्यामुळे आर्द्रतेचे वातावरण निर्माण झाले आणि भातशेतातील कडपावर रुजलं. थोडा फार हळवे जातीचे भात कापून घरी नेल्यामुळे काहीना आधार आहे. परंतु शेतातील भात दोन, तीन उन्हे दिली तरी मिळालेल्या भातापासून मिळणारा तांदूळ हा खराब प्रतीचा व मोड झालेला असेल. कृषी विभाग आपल्या त्रिस्तरीय समिती (तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक) मार्फत नुकसानीचे पंचनामे करीत आहे. तसेच विमाधारक शेतकऱ्यांचे विमा प्रतिनिधीमार्फत पंचनामे सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मिळणारा पेंढाही गुरे खाणार नाही.दरम्यान, मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकाºयांनी पीक नुकसानीचा पंचनामा सुरू केला आहे. आजही अनेक गावांमध्ये हे कर्मचारी न पोहचल्याने शेतकºयांमधील संताप वाढताना दिसला. या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे शेती आणि पूरक व्यवसाय तसेच स्थानिक व्यवसाय डबघाईला येणार आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार