शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने भातपिकाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 23:02 IST

शेतकरी हवालदिल । आर्थिक व मानसिक खच्चीकरण, डोंगरी पट्ट्यातही झोडपले

डहाणू/बोर्डी : अरबी समुद्रात दोन चक्र ीवादळ घोंगावत असताना शुक्र वारी रात्री नऊनंतर मुसळधार पावसाने खाचरात कापून ठेवलेल्या भातपिकाची नासाडी झाली आहे. शुक्र वारी रात्री डहाणू तालुक्यातील चिंचणीपासून ते बोर्डीपर्यंतच्या किनारी भागात मेघगर्जनेसह पाऊस झाला. शिवाय शहरासह डोंगरी पट्ट्यालाही पावसाने झोडपून काढले.

हळव्या भातपिकाचे नुकसान झाले असताना, दोन दिवस ऊन पडल्यामुळे बळीराजाने गरवे आणि निमगरव्या भाताची कापणी सुरू केली होती. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने कापलेले भात खाचरातील पाण्यात तरंगू लागले होते. ते चिखलातून काढताना शेतकरी कुटुंबाची दमछाक झाली. आर्थिक नुकसानीपेक्षाही पिकाची नासाडी झाल्याने शेतकरी मानसिकरित्या खचला आहे.पालघर जिल्ह्यातील भातपिक क्षेत्र ७६ हजार ५०० हेक्टर असून त्यातील ९३ टक्के लागवड झाली आहे. म्हणजे ७१ हजार ३०८ हेक्टर क्षेत्र आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झालेले आहे. भात कापल्यावर काही दिवस रिमझिम पाऊस होता. त्यामुळे आर्द्रतेचे वातावरण निर्माण झाले आणि भातशेतातील कडपावर रुजलं. थोडा फार हळवे जातीचे भात कापून घरी नेल्यामुळे काहीना आधार आहे. परंतु शेतातील भात दोन, तीन उन्हे दिली तरी मिळालेल्या भातापासून मिळणारा तांदूळ हा खराब प्रतीचा व मोड झालेला असेल. कृषी विभाग आपल्या त्रिस्तरीय समिती (तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक) मार्फत नुकसानीचे पंचनामे करीत आहे. तसेच विमाधारक शेतकऱ्यांचे विमा प्रतिनिधीमार्फत पंचनामे सुरू आहेत. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मिळणारा पेंढाही गुरे खाणार नाही.दरम्यान, मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकाºयांनी पीक नुकसानीचा पंचनामा सुरू केला आहे. आजही अनेक गावांमध्ये हे कर्मचारी न पोहचल्याने शेतकºयांमधील संताप वाढताना दिसला. या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळामुळे शेती आणि पूरक व्यवसाय तसेच स्थानिक व्यवसाय डबघाईला येणार आहेत.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार