शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर ८-९ मेची रात्र! भारताने एवढे बॉम्ब फोडले की, पाकिस्तानी चौकीवर सकाळी पांढरे निशाण फडकले
2
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के; पाकिस्तान सीमेजवळही धक्के जाणवले
3
"मी उपलब्ध नाही...", पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यास युसूफ पठाण जाणार नाही, संसदीय शिष्टमंडळाला नकार
4
गुंतवणूकदारांसाठी लॉटरी! ५ वर्षात 'या' शेअरने दिला ४.९९ कोटी रुपये परतावा; अजूनही गुंतवणुकीची संधी?
5
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल! स्वस्त झाले की महागले? जाणून घ्या आजचे दर
6
Amit Thackeray: "युद्धाचा निकाल स्पष्ट नसताना विजयाचा जल्लोष टाळावा"; अमित ठाकरेंचं थेट पंतप्रधान मोदींना पत्र
7
पाकचा नापाक इरादा भारताला आधीच लक्षात आला, सुवर्ण मंदिरावरील हल्ला 'अशा' प्रकारे उधळून लावला!
8
EPFO चा धमाका! तुमच्या PF आणि पेन्शनमध्ये मोठे बदल, जाणून घ्या ५ महत्त्वाचे अपडेट्स
9
स्वतंत्र झाल्यावर कसा असेल बलुचिस्तान देश? जाणून घ्या
10
पाकिस्तानचा मंत्री अध्यक्ष असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ खेळणार नाही; नाव माघारी घेतले... 
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या ज्योती मल्होत्रावर भडकली टीव्ही अभिनेत्री, म्हणाली- "अशा लोकांना..."
12
'ठरलं तर मग' मालिकेत पुन्हा येतेय 'ही' अभिनेत्री, लेकीच्या जन्मानंतर दोन महिन्यात कमबॅक
13
Jyoti Mlhotra : "माझ्या मुलीला फसवलं जातंय, ती पाकिस्तानला..."; ज्योती मल्होत्राच्या वडिलांचा खळबळजनक दावा
14
"माझ्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं अन् मी देव्हाऱ्यातील मूर्ती काढल्या", अभिनेत्याचा मोठा खुलासा
15
जगबुडी नदी पुन्हा काळ बनली! अंत्ययात्रेला जाणाऱ्या मुंबईकरांची कार नदीत कोसळली; ५ जणांचा मृत्यू
16
'सितारे जमीन पर' थिएटरमधून थेट युट्यूबवर होणार प्रदर्शित, आमिर खान आणणार PPV मॉडेल
17
बाजारात संमिश्र कल! 'हे' दिग्गज आयटी शेअर घसरले, बँकिंगमध्ये तेजी; एफपीआयचा विश्वास कायम
18
सख्खे शेजारी बनले पक्के वैरी! दारूच्या नशेत वाद विकोपाला गेला; हाणामारीत ३ जणांचा मृत्यू
19
हैदराबादमध्ये मोठा कट उधळला, ISIS शी संबंधित दोघांना अटक; बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त
20
कैलास मानसरोवर यात्रेसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार! चीनशी आहे थेट संबंध

सेक्शन ३५ च्या जाचातून शेतकऱ्यांची होणार सुटका

By admin | Updated: March 20, 2016 00:47 IST

कोकणातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीवर वनखात्याने ३५ सेक्शन लावले आहे. त्यामुळे या जमिनीवर शेतकऱ्यांना काही करता येत नाही. या विरोधात ' खाजगी वने बाधित शेतकरी

वाडा : कोकणातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीवर वनखात्याने ३५ सेक्शन लावले आहे. त्यामुळे या जमिनीवर शेतकऱ्यांना काही करता येत नाही. या विरोधात ' खाजगी वने बाधित शेतकरी संघर्ष समिती' ने आंदोलन छेडली होती. या आंदोलनाची दखल घेत सरकारने राज्याचे अ‍ॅड. जनरल श्रीहरी आणे यांच्याकडून अहवाल मागविला होता. या अहवालात आणे यांनी जमिनीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जे कोणी बाधित असतील त्यांची सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा असे सुचवले असल्याने या जाचक कायद्यातून शेतकऱ्यांची आता सुटका होणार आहे. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड येथील बाधित शेतकऱ्यांनी खाजगी वने बाधित शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली होती. या समितीत आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार कपिल पाटील, खासदार चिंतामण वनगा, माजी आमदार दिगंबर विशे, बाळकृष्ण पाटील, भगवान दुबेले, जगन पाटील, दिगंबर घुडे यांचा समावेश आहे. कोकणातील ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ८७ हजार हेक्टर खासगी खासगी जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर अन्यायाने वने अशी नोंद झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वनखात्याच्या परवानगीशिवाय त्यांच्या जमिनीवर काहीही करता येत नाही. कोकणातील सुमारे ४५ हजार शेतकरी सेक्शन ३५ व अन्य जाचक कायद्यामुळे बाधित झाले आहेत. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे अ‍ॅड जनरल आणि यांचा सल्ला मागविला होता. या संदर्भात आणे यांनी आपल्या उत्तरात असे सुचवले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांनी जे कोणी बाधित असतील त्यांची सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, अशी माहिती समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी दिली. (वार्ताहर)