शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

सेक्शन ३५ च्या जाचातून शेतकऱ्यांची होणार सुटका

By admin | Updated: March 20, 2016 00:47 IST

कोकणातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीवर वनखात्याने ३५ सेक्शन लावले आहे. त्यामुळे या जमिनीवर शेतकऱ्यांना काही करता येत नाही. या विरोधात ' खाजगी वने बाधित शेतकरी

वाडा : कोकणातील हजारो शेतकऱ्यांच्या जमिनीवर वनखात्याने ३५ सेक्शन लावले आहे. त्यामुळे या जमिनीवर शेतकऱ्यांना काही करता येत नाही. या विरोधात ' खाजगी वने बाधित शेतकरी संघर्ष समिती' ने आंदोलन छेडली होती. या आंदोलनाची दखल घेत सरकारने राज्याचे अ‍ॅड. जनरल श्रीहरी आणे यांच्याकडून अहवाल मागविला होता. या अहवालात आणे यांनी जमिनीबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी जे कोणी बाधित असतील त्यांची सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा असे सुचवले असल्याने या जाचक कायद्यातून शेतकऱ्यांची आता सुटका होणार आहे. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड येथील बाधित शेतकऱ्यांनी खाजगी वने बाधित शेतकरी संघर्ष समिती स्थापन केली होती. या समितीत आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा, खासदार कपिल पाटील, खासदार चिंतामण वनगा, माजी आमदार दिगंबर विशे, बाळकृष्ण पाटील, भगवान दुबेले, जगन पाटील, दिगंबर घुडे यांचा समावेश आहे. कोकणातील ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ८७ हजार हेक्टर खासगी खासगी जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर अन्यायाने वने अशी नोंद झाल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. वनखात्याच्या परवानगीशिवाय त्यांच्या जमिनीवर काहीही करता येत नाही. कोकणातील सुमारे ४५ हजार शेतकरी सेक्शन ३५ व अन्य जाचक कायद्यामुळे बाधित झाले आहेत. या संदर्भात महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्राचे अ‍ॅड जनरल आणि यांचा सल्ला मागविला होता. या संदर्भात आणे यांनी आपल्या उत्तरात असे सुचवले आहे की, जिल्हाधिकाऱ्यांनी जे कोणी बाधित असतील त्यांची सुनावणी घेऊन निर्णय घ्यावा, अशी माहिती समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश शर्मा यांनी दिली. (वार्ताहर)