शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये रेस्क्यू आॅपरेशन

By admin | Updated: July 23, 2015 04:11 IST

तालुक्यातील गोठणपूर, वीरेंद्रनगर, डुंगीपाड्याच्या पाठीमागे विवा विष्णुपुरमसह काही विकासकांनी रहिवासी संकुले उभारताना नैसर्गिक

हितेन नाईक. पालघरतालुक्यातील गोठणपूर, वीरेंद्रनगर, डुंगीपाड्याच्या पाठीमागे विवा विष्णुपुरमसह काही विकासकांनी रहिवासी संकुले उभारताना नैसर्गिक नाल्यांचे स्रोत बुजवून भरावही टाकल्याने काल रात्री २ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाचे पाणी अनेकांच्या झोपड्यांत शिरले. या वेळी गाढ झोपेत असलेल्या शेकडो कुटुंबांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनाला गोठणपूरमधील तरुणांनी प्रतिसाद देत रेस्क्यू आॅपरेशन करीत अनेक कुटुंबांतील महिला, लहान मुलांना सुरक्षित स्थळी पोहोचविले. हे काम पहाटे पर्यंत सुरु होते.एका महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने काल रात्री अचानक आक्रमक पवित्रा घेत पूर्ण पालघर तालुक्याला झोडपून काढले. या वेळी गोठणपूर, डुंगीपाडा, वीरेंद्रनगर, भडवाडपाडा आदी गरीब आदिवासी समाजाचे वास्तव्य असलेल्या झोपडपट्टीत सर्व झोपेत असताना घरात पाणी शिरू लागल्याने आपला संसार वाचविण्यासाठी मुलाबाळांसह ते बाहेर पडले. आपल्या वस्तीच्या पाठीमागील भागात विवा विष्णूपुरम या जवळपास ४० ते ५० एकर जागेवर प्रशस्त रहिवासी संकुले उभारण्याचे काम सुरू असून या भागात मोठ्या प्रमाणात भराव टाकून नैसर्गिक नाल्यांचे स्रोत बदलल्याने प्रथमच आमच्या वस्तीत पाणी शिरल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे व या रहिवासी संकुलांवर कारवाईची मागणी आपण जिल्हाधिकारी व पालघर नगरपरिषदेकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गोठणपूरमधील जवळपास ६० ते ७० घरांमध्ये मध्यरात्री हळूहळू पाणी शिरू लागल्याने झोपडपट्टीतील शेकडो रहिवाशांनी मदतीसाठी हाक दिली. या वेळी नगरसेवक रईस खान, सुरेश दुबळा, पिंटू धोत्रे, संजू धोत्रे, बबलू खान व इतर स्थानिकांनी एकत्र येत टीम तयार करून दोरखंडांच्या साहाय्याने ज्येष्ठ महिला, लहान मुले यांना छातीभर पाण्यातून सुरक्षित स्थळी पोहोचविले. या आपत्तीमध्ये रोहित मोहनकर (इयत्ता आठवी) व त्याची अकरावी व बारावीत शिकणारी दोन भावंडे, अतुल काटेला आणि त्याची पाचवी व सातवीमध्ये शिकणारी मुले यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांची सर्व पुस्तके भिजून खराब झाली, तर घरातील फ्रीज, टीव्ही, पंखे, मिक्सर आदी वस्तू खराब होऊन कपडे व भांडी वाहून गेल्याचे वर्षा काटेला यांनी सांगितले.संजना काटेला या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या गरीब महिलेच्या झोपडीतील अन्नधान्याच्या साठ्यासह लाकूडफाटा, चूलही भिजल्याने रेशनकार्डवर अन्नधान्य मिळत नसताना आता खायचे काय, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला. तिच्या घरात चिखल भरून गेल्याने झोपायचे कुठे, शिजवायचे कुठे, खायचे काय असा प्रश्नही त्यांनी डोळ्यांत पाणी आणून विचारला. या वेळी माजी नगरसेवक बाबा कदम यांनी कुटुंबाचे सांत्वन केले.