शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
5
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
6
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
7
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
8
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
9
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
10
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
11
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
12
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
13
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
14
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
15
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
16
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
17
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
18
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
19
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
20
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?

पालघरमध्ये रेस्क्यू आॅपरेशन

By admin | Updated: July 23, 2015 04:11 IST

तालुक्यातील गोठणपूर, वीरेंद्रनगर, डुंगीपाड्याच्या पाठीमागे विवा विष्णुपुरमसह काही विकासकांनी रहिवासी संकुले उभारताना नैसर्गिक

हितेन नाईक. पालघरतालुक्यातील गोठणपूर, वीरेंद्रनगर, डुंगीपाड्याच्या पाठीमागे विवा विष्णुपुरमसह काही विकासकांनी रहिवासी संकुले उभारताना नैसर्गिक नाल्यांचे स्रोत बुजवून भरावही टाकल्याने काल रात्री २ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाचे पाणी अनेकांच्या झोपड्यांत शिरले. या वेळी गाढ झोपेत असलेल्या शेकडो कुटुंबांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनाला गोठणपूरमधील तरुणांनी प्रतिसाद देत रेस्क्यू आॅपरेशन करीत अनेक कुटुंबांतील महिला, लहान मुलांना सुरक्षित स्थळी पोहोचविले. हे काम पहाटे पर्यंत सुरु होते.एका महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने काल रात्री अचानक आक्रमक पवित्रा घेत पूर्ण पालघर तालुक्याला झोडपून काढले. या वेळी गोठणपूर, डुंगीपाडा, वीरेंद्रनगर, भडवाडपाडा आदी गरीब आदिवासी समाजाचे वास्तव्य असलेल्या झोपडपट्टीत सर्व झोपेत असताना घरात पाणी शिरू लागल्याने आपला संसार वाचविण्यासाठी मुलाबाळांसह ते बाहेर पडले. आपल्या वस्तीच्या पाठीमागील भागात विवा विष्णूपुरम या जवळपास ४० ते ५० एकर जागेवर प्रशस्त रहिवासी संकुले उभारण्याचे काम सुरू असून या भागात मोठ्या प्रमाणात भराव टाकून नैसर्गिक नाल्यांचे स्रोत बदलल्याने प्रथमच आमच्या वस्तीत पाणी शिरल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे व या रहिवासी संकुलांवर कारवाईची मागणी आपण जिल्हाधिकारी व पालघर नगरपरिषदेकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गोठणपूरमधील जवळपास ६० ते ७० घरांमध्ये मध्यरात्री हळूहळू पाणी शिरू लागल्याने झोपडपट्टीतील शेकडो रहिवाशांनी मदतीसाठी हाक दिली. या वेळी नगरसेवक रईस खान, सुरेश दुबळा, पिंटू धोत्रे, संजू धोत्रे, बबलू खान व इतर स्थानिकांनी एकत्र येत टीम तयार करून दोरखंडांच्या साहाय्याने ज्येष्ठ महिला, लहान मुले यांना छातीभर पाण्यातून सुरक्षित स्थळी पोहोचविले. या आपत्तीमध्ये रोहित मोहनकर (इयत्ता आठवी) व त्याची अकरावी व बारावीत शिकणारी दोन भावंडे, अतुल काटेला आणि त्याची पाचवी व सातवीमध्ये शिकणारी मुले यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांची सर्व पुस्तके भिजून खराब झाली, तर घरातील फ्रीज, टीव्ही, पंखे, मिक्सर आदी वस्तू खराब होऊन कपडे व भांडी वाहून गेल्याचे वर्षा काटेला यांनी सांगितले.संजना काटेला या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या गरीब महिलेच्या झोपडीतील अन्नधान्याच्या साठ्यासह लाकूडफाटा, चूलही भिजल्याने रेशनकार्डवर अन्नधान्य मिळत नसताना आता खायचे काय, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला. तिच्या घरात चिखल भरून गेल्याने झोपायचे कुठे, शिजवायचे कुठे, खायचे काय असा प्रश्नही त्यांनी डोळ्यांत पाणी आणून विचारला. या वेळी माजी नगरसेवक बाबा कदम यांनी कुटुंबाचे सांत्वन केले.