शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

पालघरमध्ये रेस्क्यू आॅपरेशन

By admin | Updated: July 23, 2015 04:11 IST

तालुक्यातील गोठणपूर, वीरेंद्रनगर, डुंगीपाड्याच्या पाठीमागे विवा विष्णुपुरमसह काही विकासकांनी रहिवासी संकुले उभारताना नैसर्गिक

हितेन नाईक. पालघरतालुक्यातील गोठणपूर, वीरेंद्रनगर, डुंगीपाड्याच्या पाठीमागे विवा विष्णुपुरमसह काही विकासकांनी रहिवासी संकुले उभारताना नैसर्गिक नाल्यांचे स्रोत बुजवून भरावही टाकल्याने काल रात्री २ वाजेच्या सुमारास मुसळधार पावसाचे पाणी अनेकांच्या झोपड्यांत शिरले. या वेळी गाढ झोपेत असलेल्या शेकडो कुटुंबांनी मदतीसाठी केलेल्या आवाहनाला गोठणपूरमधील तरुणांनी प्रतिसाद देत रेस्क्यू आॅपरेशन करीत अनेक कुटुंबांतील महिला, लहान मुलांना सुरक्षित स्थळी पोहोचविले. हे काम पहाटे पर्यंत सुरु होते.एका महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने काल रात्री अचानक आक्रमक पवित्रा घेत पूर्ण पालघर तालुक्याला झोडपून काढले. या वेळी गोठणपूर, डुंगीपाडा, वीरेंद्रनगर, भडवाडपाडा आदी गरीब आदिवासी समाजाचे वास्तव्य असलेल्या झोपडपट्टीत सर्व झोपेत असताना घरात पाणी शिरू लागल्याने आपला संसार वाचविण्यासाठी मुलाबाळांसह ते बाहेर पडले. आपल्या वस्तीच्या पाठीमागील भागात विवा विष्णूपुरम या जवळपास ४० ते ५० एकर जागेवर प्रशस्त रहिवासी संकुले उभारण्याचे काम सुरू असून या भागात मोठ्या प्रमाणात भराव टाकून नैसर्गिक नाल्यांचे स्रोत बदलल्याने प्रथमच आमच्या वस्तीत पाणी शिरल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे व या रहिवासी संकुलांवर कारवाईची मागणी आपण जिल्हाधिकारी व पालघर नगरपरिषदेकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.गोठणपूरमधील जवळपास ६० ते ७० घरांमध्ये मध्यरात्री हळूहळू पाणी शिरू लागल्याने झोपडपट्टीतील शेकडो रहिवाशांनी मदतीसाठी हाक दिली. या वेळी नगरसेवक रईस खान, सुरेश दुबळा, पिंटू धोत्रे, संजू धोत्रे, बबलू खान व इतर स्थानिकांनी एकत्र येत टीम तयार करून दोरखंडांच्या साहाय्याने ज्येष्ठ महिला, लहान मुले यांना छातीभर पाण्यातून सुरक्षित स्थळी पोहोचविले. या आपत्तीमध्ये रोहित मोहनकर (इयत्ता आठवी) व त्याची अकरावी व बारावीत शिकणारी दोन भावंडे, अतुल काटेला आणि त्याची पाचवी व सातवीमध्ये शिकणारी मुले यांच्यासह अनेक विद्यार्थ्यांची सर्व पुस्तके भिजून खराब झाली, तर घरातील फ्रीज, टीव्ही, पंखे, मिक्सर आदी वस्तू खराब होऊन कपडे व भांडी वाहून गेल्याचे वर्षा काटेला यांनी सांगितले.संजना काटेला या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या गरीब महिलेच्या झोपडीतील अन्नधान्याच्या साठ्यासह लाकूडफाटा, चूलही भिजल्याने रेशनकार्डवर अन्नधान्य मिळत नसताना आता खायचे काय, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला. तिच्या घरात चिखल भरून गेल्याने झोपायचे कुठे, शिजवायचे कुठे, खायचे काय असा प्रश्नही त्यांनी डोळ्यांत पाणी आणून विचारला. या वेळी माजी नगरसेवक बाबा कदम यांनी कुटुंबाचे सांत्वन केले.