शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
4
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
5
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
6
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
7
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
8
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
9
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
10
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
11
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
12
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
13
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
14
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
15
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
16
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
17
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
18
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
19
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
20
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
Daily Top 2Weekly Top 5

दुबारचे संकट टळले !

By admin | Updated: July 21, 2015 05:01 IST

ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात सुमारे एक लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करणे बाकी आहे. परंतु पावसाने विलंब केल्यामुळे अद्याप

सुरेश लोखंडे, ठाणेठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात सुमारे एक लाख २६ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करणे बाकी आहे. परंतु पावसाने विलंब केल्यामुळे अद्याप लागवड होऊ शकली नाही. परंतु मागील दोन दिवसांपासून या दोन्ही जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यामुळे संभाव्य दुबार पेरणी व रिक्त क्षेत्रातील भात लागवड न होण्याचे संकट टळल्याचे कृषी विभागाकडून सांगितले जात आहे. रविवारच्या मध्यरात्रीपासून ठाणेसह पालघर जिल्ह्यात पावसाने संततधार धरली आहे. ठाणे जिल्ह्यात आतापर्यंत ४३१४.७४ मिमी पाऊस पडला आहे. ठाणेशहर परिसरात दुपारनंतर सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंतही जोरदारपणे पडला. याशिवाय कल्याण, मुरबाड, शहापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथ, भिवंडी तालुक्यातही या पावसाने जोरदार सुरूवात केली आहे. सायंकाळपर्यंत ठाणे जिल्ह्यात सरासरी ६१६ मिमी या पावसाची नोंद झाली आहे.पालघर जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ११३९ मिमी पाऊस पडला असून सरासरी १४२ मिमी नोंद झाली आहे. सोमवारीही पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा, विक्रमगड आदी आदिवासी भागात जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे या जिल्ह्यातील दुबार पेरणीचे संकट काही अंशी टळल्याचे शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सांगितले. ठाणे व पालघर या दोन्ही जिल्ह्यात एक लाख ३२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाचे पीक घेतले जाणार आहे. यापैकी एक लाख २६ हजार हेक्टर क्षेत्र भात लागवडी खाली असून उर्वरित नागली, १५ हजार ९०५ हेक्टरवर तर वरी सुमारे ११ हजार ३२० हेक्टवर आहेत. यापैकी ठाणे जिल्ह्यात सुमारे ६० हजार हेक्टरवर भात लागवड होते. या वर्षी हेक्टरी २५०० क्ंिवटल भात उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांसह दोन्ही जिल्हह्यातील कृषी विभागाने कंबर कसली आहे. ३४ हजार मेट्रीक टन खताचा वापर करण्याचे नियोजन जिल्ह्यात करण्यात आलेले आहे. याशिवाय बियाणे जया, रत्ना, विजेता, रूपाली, सह्याद्री आदी भाताचे सुमारे २३ हजार ५२९ क्विंटल बियाणे वापरण्यात आले आहे. त्यापैकी ठाणे जिल्ह्यात ११ हजार ६३७ पैकी १० हजार ९८६ क्विंटल बियाण्याचा वापर शेतकऱ्यांनी केला आहे. तर चार हजार ७०० मेट्रीक टन खताचा पुरवठा झाल्याचे ठाणे जिपचे कृषी विकास अधिकारी डॉ. प्रफुल्ल बनसोडे यांनी सांगितले.