शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वर्सोवा पुलाची दुरुस्ती पुन्हा रखडली

By admin | Updated: February 1, 2017 02:52 IST

वर्सोवा पूलाला तडे गेल्याने गेल्या सप्टेंबर महिन्यापासून अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलेल्या या पुलाच्या दुरुस्तीच्या अहवालावरील अभिप्राय आयआयटीकडून अद्याप

- शशी करपे,  वसईवर्सोवा पूलाला तडे गेल्याने गेल्या सप्टेंबर महिन्यापासून अवजड वाहनांसाठी बंद ठेवण्यात आलेल्या या पुलाच्या दुरुस्तीच्या अहवालावरील अभिप्राय आयआयटीकडून अद्याप आलेला नाही. त्यामुळे पूल दुरुस्तीचे काम रेंगाळून पडले आहे. दुरुस्तीसाठी किती कालावधी लागेल याची ठोस माहिती संंंबंधित खाते देऊ शकत नसल्याने वाहतूक कोंडीचा जाच पुढील काही महिने सहन करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वसई खाडीवरच्या जुन्या वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीचे काम अद्याप सुरु न होऊ शकल्याने हजारो वाहन चालकांना वाहतूक कोंडीचा त्रास होत आहे. त्याची दखल घेत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी संंबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. चार महिने होऊन गेले तरी काहीही काम झालेले नाही. दुरुस्तीच्या कामाला एवढा विलंब का लागला. त्याचप्रमाणे यापुढील दुरुस्तीचे निश्चित वेळापत्रक काय ते तातडीने सादर करण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारी एका बैठकीत दिले. या पुलाचे काम पूर्ण करण्याबाबत राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या बैठकीत सांगितले होते. त्यादृष्टीने वाहतूक ही नियंत्रित करण्यात आली होती. राम्बोल इंडिया लिमिटेड या सल्लागार कंपनीने दुरुस्तीसंदर्भात आपला अहवाल चार पाच दिवसांपूर्वीच आयआयटीला दिला असून अद्याप आयआयटीने त्यावरील आपला अभिप्राय दिलेला नाही. तो मिळताच दुरुस्तीबाबत पुढील कार्यवाही सुरु होईल. लहान लहान तडे बुजवण्याचे काम झाले असून मोठे काम शिल्लक आहे. मात्र हा पूल वाहतुकीस सुरु होण्यासाठी प्रदीर्घ कालावधी लागू शकतो अशी माहिती आयआरबीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली. जून्या वर्सोवा पूलाला तडे गेल्याने गेल्या चार महिन्यांपासून दुरुस्तीच्या नावाखाली पुलावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. सध्या या पूलावरून हलक्या वाहनांना वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे याठिकाणी तासन तास वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. यासंदर्भात त्वरित सध्याची वाहतूक परिस्थिती आणि दुरुस्तीच्या कामाला लागत असलेला विलंब राष्ट्रीय महामार्गच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कानी घालावा. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांना देखील यासंदर्भात अवगत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी वंदना सूर्यवंशी यांना दिले. पूल दुरुस्तीच्या कामामुळे पोलिसांवर ताण येत असून तातडीने पर्यायी ठोस व्यवस्था झाली पाहिजे, असे ठाणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी सांगितले. प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी देखील वाहतूक नियंत्रण करण्यातील अडचणी सांगितल्या तसेच याबाबत राष्ट्रीय महामार्गाकडून त्वरित पर्यायी व्यवस्था व्हावी अशी मागणी केली. या बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी एस.जी.काटदरे, आयआरबीचे उपाध्यक्ष (डिझाईन) जयंत भिडे उपस्थित होते. महाडमधील दुर्घटनेनंतर मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आठच्या वसई खाडीवरील वरसावेचा जुना पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या महामार्गावर वरसावे येथे दोन पूल आहेत. जुना पूल १९७०च्या आसपास बांधण्यात आला आहे. तो १९७३ मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला. त्याच्या एका गर्डरला डिसेंबर २०१३ मध्ये तडे गेल्यानंतर दुरुस्तीसाठी तो चार महिने बंद ठेवण्यात आला होता. पुन्हा एका गर्डरला तडा गेल्याने आॅगस्टपासून हा पूल अवजड वाहनासाठी बंद ठेवण्यात आला आहे. सध्या अवजड वाहनांची वाहतूक चिंंचोटी आणि पालघर-वाडा-भिवंडी मार्गे वळवण्यात आलेली आहे. मात्र, जुना पूल हलक्या वाहनांसाठी मोकळा असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक वीस-वीस मिनिटे बंद ठेवण्यात येते. त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी होऊन वाहनचालकांना तासनतास अडकून पडावे लागत आहे.