शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमार संस्थांच्या माजी संचालकांच्या बोटी भाड्याने; गद्दारी केल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 08:15 IST

वाढवण बंदराविरोधातील १९९६ पूर्वीपासून सुरू असलेला लढा आता ‘आर या पार’ लढण्याचा निर्णय भूमिपुत्रांनी घेतला आहे.

पालघर : मुंबईच्या फाइन इन्व्हिरॉन इंजिनीअर्स या कंपनीला वाढवणच्या समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाचे मोजमाप घेण्याच्या कामाला दांडी, डहाणू गावातील काही मच्छीमार सहकारी संस्थांच्या माजी संचालकांनी बोटी भाडय़ाने दिल्याने किनारपट्टीच्या भागात संतप्त पडसाद उमटू लागले आहेत. मातृभूमीशी गद्दारी केल्यास परिणामांना तयार राहा, असा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे. बुधवारी संघर्ष समितीने समुद्रात जाऊन त्यांच्याकडे परवानगीची कागदपत्रेही मागितली.

वाढवण बंदराविरोधातील १९९६ पूर्वीपासून सुरू असलेला लढा आता ‘आर या पार’ लढण्याचा निर्णय भूमिपुत्रांनी घेतला आहे. अहिंसक आणि कायदेशीर मार्गाने लढून थोपवून ठेवलेले हे बंदर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार नव्याने लादण्याचा प्रयत्न करत आहे. डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या प्रयत्नामुळे वाढवण बंदर उभारणीचे प्रयत्न फोल ठरत होते. मात्र, आता वाढवण बंदर थोपवून धरण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे प्राधिकरणच रद्द करण्याच्या छुप्या हालचाली सध्या केंद्र सरकारने चालवल्या असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. 

दांडी येथील एका मच्छीमार सहकारी संस्थेच्या एका माजी चेअरमनची आणि डहाणूमधील मच्छीमारांची एक अशा दोन बोटी लाखोंचे प्रलोभन दाखवून भाडय़ाने घेतल्याने दांडी, डहाणू किनारपट्टीवरील गावात या व्यक्तींविरोधात सोशल मीडियावरून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. 

सर्वेक्षणाची कागदपत्रेच नव्हती; स्थानिकांनी केला जाेरदार विराेधसंघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, अशोक आंभिरे,सचिव वैभव वङो, हेमंत तामोरे,अविनाश पाटील आदींनी समुद्रात उभ्या असलेल्या बोटीतील फाइन इंजिनीअर्स कंपनीच्या कर्मचारी आणि पोलिसांना या सर्वेक्षणाच्या परवानगीची कागदपत्रे मागितल्यानंतर ते कुठलीही कागदपत्रे सादर करू शकले नाहीत.केवळ भरती-ओहोटीचे सव्रेक्षण करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तुमच्याकडे कुठलीही कागदपत्रे नसल्याने प्रवाहाचे सर्वेक्षण करण्यास स्थानिकांनी विरोध करत हे काम बंद पाडले.  

आमची एकजूट तोडण्यासाठी दिली जाताहेत प्रलोभने; स्थानिकांचा आरोप    

पालघर : संघर्ष समिती, स्थानिक आणि काही तज्ज्ञ लोकांच्या प्रयत्नाने हे प्राधिकरण रद्द होत नसल्याने केंद्र सरकारने आता साम-दाम-दंड-भेद अशी नीती वापरण्यास सुरु वात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे एक अंग असलेल्या संरक्षण प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वाढवणमध्ये पर्यावरणाला बाधा पोहोचेल, असे कुठलेही काम करायचे नाही, असे स्पष्ट आदेश असताना प्राधिकरणाची कुठलीही परवानगी न घेता फाइन इंजिनीअर्स या कंपनीने बेकायदा काम सुरू केले होते. यासाठी काही मच्छीमारांना पैशांचे प्रलोभन दाखवून बंदरविरोधातील एकजूट तोडण्याचे प्रयत्न कंपनीचे  दलाल करू लागल्याने त्यांच्यावर स्थानिकांनी  नजर ठेवायला सुरु केले आहे. बंदराच्या विरोधातील एकजूट तोडण्यासाठी स्थानिक बेरोजगार तरु ण, कर्जदार अथवा पैशांच्या प्रलोभनांना बळी पडणारे काही मच्छीमार, राजकीय  पदाधिकाऱ्यांना कामाचे ठेके देण्याचे गाजर दाखवत जबाबदाऱ्या दिल्यात.