शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

मच्छीमार संस्थांच्या माजी संचालकांच्या बोटी भाड्याने; गद्दारी केल्यास परिणामांना तयार राहण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2020 08:15 IST

वाढवण बंदराविरोधातील १९९६ पूर्वीपासून सुरू असलेला लढा आता ‘आर या पार’ लढण्याचा निर्णय भूमिपुत्रांनी घेतला आहे.

पालघर : मुंबईच्या फाइन इन्व्हिरॉन इंजिनीअर्स या कंपनीला वाढवणच्या समुद्रातील पाण्याच्या प्रवाहाचे मोजमाप घेण्याच्या कामाला दांडी, डहाणू गावातील काही मच्छीमार सहकारी संस्थांच्या माजी संचालकांनी बोटी भाडय़ाने दिल्याने किनारपट्टीच्या भागात संतप्त पडसाद उमटू लागले आहेत. मातृभूमीशी गद्दारी केल्यास परिणामांना तयार राहा, असा इशारा भूमिपुत्रांनी दिला आहे. बुधवारी संघर्ष समितीने समुद्रात जाऊन त्यांच्याकडे परवानगीची कागदपत्रेही मागितली.

वाढवण बंदराविरोधातील १९९६ पूर्वीपासून सुरू असलेला लढा आता ‘आर या पार’ लढण्याचा निर्णय भूमिपुत्रांनी घेतला आहे. अहिंसक आणि कायदेशीर मार्गाने लढून थोपवून ठेवलेले हे बंदर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार नव्याने लादण्याचा प्रयत्न करत आहे. डहाणू तालुका पर्यावरण संरक्षण प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या प्रयत्नामुळे वाढवण बंदर उभारणीचे प्रयत्न फोल ठरत होते. मात्र, आता वाढवण बंदर थोपवून धरण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे प्राधिकरणच रद्द करण्याच्या छुप्या हालचाली सध्या केंद्र सरकारने चालवल्या असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. 

दांडी येथील एका मच्छीमार सहकारी संस्थेच्या एका माजी चेअरमनची आणि डहाणूमधील मच्छीमारांची एक अशा दोन बोटी लाखोंचे प्रलोभन दाखवून भाडय़ाने घेतल्याने दांडी, डहाणू किनारपट्टीवरील गावात या व्यक्तींविरोधात सोशल मीडियावरून संतप्त भावना व्यक्त होत आहेत. 

सर्वेक्षणाची कागदपत्रेच नव्हती; स्थानिकांनी केला जाेरदार विराेधसंघर्ष समितीचे अध्यक्ष नारायण पाटील, अशोक आंभिरे,सचिव वैभव वङो, हेमंत तामोरे,अविनाश पाटील आदींनी समुद्रात उभ्या असलेल्या बोटीतील फाइन इंजिनीअर्स कंपनीच्या कर्मचारी आणि पोलिसांना या सर्वेक्षणाच्या परवानगीची कागदपत्रे मागितल्यानंतर ते कुठलीही कागदपत्रे सादर करू शकले नाहीत.केवळ भरती-ओहोटीचे सव्रेक्षण करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तुमच्याकडे कुठलीही कागदपत्रे नसल्याने प्रवाहाचे सर्वेक्षण करण्यास स्थानिकांनी विरोध करत हे काम बंद पाडले.  

आमची एकजूट तोडण्यासाठी दिली जाताहेत प्रलोभने; स्थानिकांचा आरोप    

पालघर : संघर्ष समिती, स्थानिक आणि काही तज्ज्ञ लोकांच्या प्रयत्नाने हे प्राधिकरण रद्द होत नसल्याने केंद्र सरकारने आता साम-दाम-दंड-भेद अशी नीती वापरण्यास सुरु वात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे एक अंग असलेल्या संरक्षण प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय वाढवणमध्ये पर्यावरणाला बाधा पोहोचेल, असे कुठलेही काम करायचे नाही, असे स्पष्ट आदेश असताना प्राधिकरणाची कुठलीही परवानगी न घेता फाइन इंजिनीअर्स या कंपनीने बेकायदा काम सुरू केले होते. यासाठी काही मच्छीमारांना पैशांचे प्रलोभन दाखवून बंदरविरोधातील एकजूट तोडण्याचे प्रयत्न कंपनीचे  दलाल करू लागल्याने त्यांच्यावर स्थानिकांनी  नजर ठेवायला सुरु केले आहे. बंदराच्या विरोधातील एकजूट तोडण्यासाठी स्थानिक बेरोजगार तरु ण, कर्जदार अथवा पैशांच्या प्रलोभनांना बळी पडणारे काही मच्छीमार, राजकीय  पदाधिकाऱ्यांना कामाचे ठेके देण्याचे गाजर दाखवत जबाबदाऱ्या दिल्यात.