शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मिठागर वस्तीची व्यथा सुरेश प्रभूंच्या दालनात, नवघरवासीयांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 02:25 IST

वसई नवघर पूर्वेला मिठागर वस्तीत पाणी साचते व त्यामुळे येथील कुटूंबांचा संपर्क तुटतो. दरवर्षी पावसाळ्यात महापालिका प्रशासन त्यांना मदत करत असते.

वसई - वसई नवघर पूर्वेला मिठागर वस्तीत पाणी साचते व त्यामुळे येथील कुटूंबांचा संपर्क तुटतो. दरवर्षी पावसाळ्यात महापालिका प्रशासन त्यांना मदत करत असते. मात्र, ही सॉल्ट विभागाची जागा असल्याने या ठिकाणी रस्ते व इतर कामे करण्याच्या अडचणी निर्माण होतात. यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी महापौर रुपेश जाधव व माजी महापौर नारायण मानकर यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतली.या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचल्याने वसई विरार महानगरपालिकेच्या आपत्कालिन यंत्रणेला रेस्क्यू करु न कुटूंबाना अन्यत्र स्थलांतरीत करण्याची वेळ येत असते. तसेच मालमत्तेच नुकसान होते. गरोदर महिला, लहान मुले, अपंग , जेष्ठ नागरिक आदींना त्यामुळे त्रास सहन करावा लागतो. पूरजन्य परिस्थीती नंतरही संसाराची घडी बसविण्यासाठी वेळ लागतो. ही वस्ती सुविधांपासून वंचीत आहे. यासाठी महापौर रु पेश जाधव व व माजी महापौर नारायण मानकर यांनी अवजड उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांची दिल्ली येथे भेट घेतली व त्यांना वसई नवघर पूर्वेकडिल मिठागर वस्ती विकासात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी विनंती केली. तर पाणजू व भार्इंदर हा १३२५ कोटींचा ब्रिज होणार असला तरी सॉल्ट विभागाच्या जमिनी बाधीत होणार आहेत. याबाबत विभागाने विचार करावा असे निवेदन देण्यात आले.केंद्रीय मंत्र्यांचे आश्वासनवरील सॉल्टच्या जमिनीचा प्रस्ताव मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाने सॉल्ट विभागाला दिल्ली येथे पाठविला आहे.त्याचा अभ्यास करु न त्वरीत परवानगी द्यावी असे संबंधीत अधिकाºयांना आदेशीत केले व यापुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी दिले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार