शहरं
Join us  
Trending Stories
1
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
2
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
3
गौतम गंभीरचे प्रयोग टीम इंडियाला झेपेना; दीड वर्षात नंबर ३ वर खेळवले तब्बल सात फलंदाज
4
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
5
आई आमदार बनली, पण मंत्रिपद मुलाला मिळालं; नितीश कुमारांच्या नव्या सरकारमध्ये संधी, सगळेच हैराण
6
Cyber Crime: दिवसा भारतीय, रात्री अमेरिकन नागरिकांवर सायबर हल्ला; नवी मुंबईतून २० जणांना अटक!
7
दरवर्षी जमा करा १.५ लाख, मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; मुलीच्या भविष्यासाठी सुरक्षित आहे सरकारी स्कीम
8
Uddhav Thackeray: "बाबा, मला मारले म्हणत दिल्लीला गेले" अमित शाह- एकनाथ शिंदे यांच्या भेटीवरून ठाकरेंचा टोला
9
Mumbai: मुंबईकरांसाठी खुशखबर...! नव्या इमारतीतील घरांसाठी नोंदणी शुल्क माफ
10
BJP vs Shinde Sena: मुद्रांक शुल्क सवलतीच्या निर्णयावरून शिंदेसेना-भाजपमध्ये क्रेडिट वॉर सुरू!, कोण काय बोलतंय? वाचा
11
आजचे राशीभविष्य - २१ नोव्हेंबर २०२५, कार्यपूर्ती, यश आणि कीर्ती मिळविण्याच्या दृष्टीने अनुकूल दिवस
12
Elections: मुंबईत ११.८० लाख तर, ठाण्यात ४.२१ लाख मतदार वाढले; महिला मतदारांची संख्या अधिक!
13
SC: राज्यपाल, राष्ट्रपतींना विधेयकांच्या मंजुरीसाठी डेडलाइन देता येणार नाही, न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
14
India- Israel: भारत-इस्रायल समृद्धीचे नवे पर्व सुरू, मुक्त व्यापारासाठी उभयतांत सहमती
15
काँग्रेस सिद्धारामय्यांना हटवणार? कर्नाटकात CM पदावरून पुन्हा वाद पेटला, डीके गटातील आमदारांनी दिल्लीत तळ ठोकला
16
चीन-जपान तणावात भारताची 'बल्ले-बल्ले'! झाला बंपर फायदा, बाजार 11% नं वधारला; आता ट्रम्प टॅरिफचं 'नो-टेंशन'!
17
पाकिस्तानचे डोळे उघडले! चक्क चक्क चिनी कंपन्यांना ठणकावले; म्हणाले, 'आमची लूट थांबवा, अन्यथा काम बंद करा'
18
"बौद्ध धर्माचे पालन करतो, पण..., आज जो काही आहे तो..."; निवृत्तीपूर्वी CJI बीआर गवई यांचं मोठं विधान!
19
विशेष लेख: मिस्टर/मिसेस 'पसेंटेज' आणि बंगल्यावरचे 'ठेके'
20
लेख: बिन भिंतींच्या उघड्या शाळेत तुमचे स्वागत आहे...
Daily Top 2Weekly Top 5

कासवाची सुटका, मच्छीमारास बक्षीस, राज्यातील पहिलीच घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:25 IST

वडराई येथील हेमा हेमंत वैद्य या मच्छीमार महिलेच्या साईदत्त कृपा या बोटीच्या डोलनेट जाळ्यात दुर्मीळ कासव सापडल्यानंतर मच्छीमारांनी आपले जाळे फाडून त्याची सुखरूप सुटका करीत पुन्हा समुद्रात सोडून दिले.

- हितेन नाईकपालघर : वडराई येथील हेमा हेमंत वैद्य या मच्छीमार महिलेच्या साईदत्त कृपा या बोटीच्या डोलनेट जाळ्यात दुर्मीळ कासव सापडल्यानंतर मच्छीमारांनी आपले जाळे फाडून त्याची सुखरूप सुटका करीत पुन्हा समुद्रात सोडून दिले. शासनाच्या दुर्मीळ प्रजाती संरक्षण अधिनियमान्वये या बोट आणि मालक २५ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईस पात्र ठरले आहेत. बहुदा राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.वडराई येथील ही बोट २३ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता मासेमारीसाठी रवाना झाली. समुद्रात १० नॉटिकल समुद्री क्षेत्रात त्यांनी आपल्या बोटीतील १२ डोल नेट जाळे कवींच्या खुंटाला लावले आणि मासे आपल्या जाळ्यात अडकण्याची ते वाट पाहू लागले. काही तासांच्या विश्रांती नंतर त्यांनी एक- एक डोल जाळे आपल्या बोटीत खेचायला सुरुवात केली. सातवे डोल जाळे आपल्या बोटीत घेतल्यावर जाळ्यात पाय अडकलेल्या कासवाची सुटकेसाठी धडपड सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले.या धडपडीत त्या कासवाच्या पायाला इजा पोहोचू नये, म्हणून गणेश मेहेर या मच्छीमाराने आपले डोल जाळे मधोमध फाडून १५ किलो वजनाच्या कासवाची सुखरूप सुटका करून त्याला समुद्रात सोडले. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला. आपल्या जाळ्याचे नुकसान करून कासवाची सुटका केल्याने शासनाकडून दिले जाणारे २५ हजाराचे बक्षीस तुला मिळू शकते, याची माहिती त्याला दिली.>डॉल्फिन, शार्क, कासवांना संरक्षणबेसुमार व अनियंत्रित मासेमारीमुळे डॉल्फिन, शार्क, कासव सारख्या अनेक दुर्मीळ प्रजाती समुद्रातून नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्यांच्या संरक्षणासाठी शासनाने पारंपरिक मच्छीमारांची मदत घेण्याचे ठरविले आहे. हे दुर्मीळ मासे जाळ्यात सापडल्यानंतर त्याची सुटका करतेवेळी मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान झाल्यास नुकसानीपोटी त्यांना २५ हजार रुपयांची भरपाई मिळणार असल्याचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने २१ डिसेंबर २०१८ रोजी काढले होते.>आम्ही मच्छीमार कासव, देवमासा यांना देवस्वरूप मानून नेहमीच त्यांची नारळ, तांदूळ वाहत सुखरूप सुटका करतो. आता पर्यंत ५ ते ७ मोठे कासव आम्ही समुद्रात सोडले आहेत.- गणेश मेहेर, मच्छीमार