शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कासवाची सुटका, मच्छीमारास बक्षीस, राज्यातील पहिलीच घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:25 IST

वडराई येथील हेमा हेमंत वैद्य या मच्छीमार महिलेच्या साईदत्त कृपा या बोटीच्या डोलनेट जाळ्यात दुर्मीळ कासव सापडल्यानंतर मच्छीमारांनी आपले जाळे फाडून त्याची सुखरूप सुटका करीत पुन्हा समुद्रात सोडून दिले.

- हितेन नाईकपालघर : वडराई येथील हेमा हेमंत वैद्य या मच्छीमार महिलेच्या साईदत्त कृपा या बोटीच्या डोलनेट जाळ्यात दुर्मीळ कासव सापडल्यानंतर मच्छीमारांनी आपले जाळे फाडून त्याची सुखरूप सुटका करीत पुन्हा समुद्रात सोडून दिले. शासनाच्या दुर्मीळ प्रजाती संरक्षण अधिनियमान्वये या बोट आणि मालक २५ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईस पात्र ठरले आहेत. बहुदा राज्यातील ही पहिलीच घटना असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.वडराई येथील ही बोट २३ जानेवारी रोजी पहाटे ४ वाजता मासेमारीसाठी रवाना झाली. समुद्रात १० नॉटिकल समुद्री क्षेत्रात त्यांनी आपल्या बोटीतील १२ डोल नेट जाळे कवींच्या खुंटाला लावले आणि मासे आपल्या जाळ्यात अडकण्याची ते वाट पाहू लागले. काही तासांच्या विश्रांती नंतर त्यांनी एक- एक डोल जाळे आपल्या बोटीत खेचायला सुरुवात केली. सातवे डोल जाळे आपल्या बोटीत घेतल्यावर जाळ्यात पाय अडकलेल्या कासवाची सुटकेसाठी धडपड सुरू असल्याचे त्यांच्या लक्षात आले.या धडपडीत त्या कासवाच्या पायाला इजा पोहोचू नये, म्हणून गणेश मेहेर या मच्छीमाराने आपले डोल जाळे मधोमध फाडून १५ किलो वजनाच्या कासवाची सुखरूप सुटका करून त्याला समुद्रात सोडले. याचा व्हिडीओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ‘लोकमत’ने त्यांच्याशी संपर्क साधला. आपल्या जाळ्याचे नुकसान करून कासवाची सुटका केल्याने शासनाकडून दिले जाणारे २५ हजाराचे बक्षीस तुला मिळू शकते, याची माहिती त्याला दिली.>डॉल्फिन, शार्क, कासवांना संरक्षणबेसुमार व अनियंत्रित मासेमारीमुळे डॉल्फिन, शार्क, कासव सारख्या अनेक दुर्मीळ प्रजाती समुद्रातून नष्ट होण्याच्या मार्गावर असून त्यांच्या संरक्षणासाठी शासनाने पारंपरिक मच्छीमारांची मदत घेण्याचे ठरविले आहे. हे दुर्मीळ मासे जाळ्यात सापडल्यानंतर त्याची सुटका करतेवेळी मच्छीमारांच्या जाळ्यांचे नुकसान झाल्यास नुकसानीपोटी त्यांना २५ हजार रुपयांची भरपाई मिळणार असल्याचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने २१ डिसेंबर २०१८ रोजी काढले होते.>आम्ही मच्छीमार कासव, देवमासा यांना देवस्वरूप मानून नेहमीच त्यांची नारळ, तांदूळ वाहत सुखरूप सुटका करतो. आता पर्यंत ५ ते ७ मोठे कासव आम्ही समुद्रात सोडले आहेत.- गणेश मेहेर, मच्छीमार