शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
4
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
5
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
8
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
10
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
11
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
12
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
13
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
14
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
15
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
20
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!

बांबूपासून बनवलेल्या राख्यांचे राज्यपालांच्या हस्ते विमोचन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 01:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आवाहनानुसार आपल्या आजूबाजूला असलेल्या संसाधनातून वस्तू तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

वसई : पालघर जिल्ह्यातील आदिवासी (वनवासी) भगिनींनी विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून यंदाही राष्ट्र सेवा समिती प्रकल्प भालिवली येथे प्रशिक्षित होऊन तयार केलेल्या बांबूंच्या राख्यांचे सोमवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत राजभवनात विमोचन करण्यात आले. या वेळी समितीचे व्यवस्थापक लुकेश बंड, प्रगती भोईर, डॉ. अलोक चौबे आदी उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ आवाहनानुसार आपल्या आजूबाजूला असलेल्या संसाधनातून वस्तू तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विवेक रुरल डेव्हलपमेंट सेंटरच्या माध्यमातून वनवासी भगिनींना बांबूपासून निरनिराळे आकर्षक व दर्जेदार उत्पादन करण्याचे प्रशिक्षण मागील पाच वर्षांच्या काळापासून सेंटरच्या भालिवली येथील प्रकल्पावर देण्यात येत आहे. या प्रशिक्षणानंतर आपले घरकाम सांभाळून फावल्या वेळात सदर महिला बांबूपासून हस्तकलेच्या वस्तूही त्या तयार करतात व या माध्यमातून त्यांना चांगला सन्मानजनक रोजगार देखील प्राप्त होतो आहे. त्याचाच एक भाग म्हणजे या भगिनींनी पुढे येऊ घातलेल्या भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा धागा म्हणजेच राखी ही बांबूपासून वेगवेगळ्या रंगात व ढंगात अत्यंत आकर्षक स्वरूपात तयार केल्या आहेत.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीVasai Virarवसई विरार