शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विरार, पालघर, जव्हार पोस्टांतील भरतीत घोटाळा? १०५ पोस्टमन आणि शाखा डाकपालांची कंत्राटी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 03:10 IST

पोस्ट खात्याच्या विरार, पालघर आणि जव्हार उपविभागामध्ये १०५ पोस्टमन आणि डाकपालांची भरती करताना बिंदुनामावलीचा भंग करण्यासोबतच स्थानिकांना डावलून जिल्हयाबाहेरील उमेदवारांची भरती केली

- शशी करपे।वसई : पोस्ट खात्याच्या विरार, पालघर आणि जव्हार उपविभागामध्ये १०५ पोस्टमन आणि डाकपालांची भरती करताना बिंदुनामावलीचा भंग करण्यासोबतच स्थानिकांना डावलून जिल्हयाबाहेरील उमेदवारांची भरती केली गेली असून तीत लाखो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याची माहिती लोकमतला प्राप्त झाली आहे.ब्रिटीशकालापासून गाव तेथे पोस्टमन ही संकल्पना आजही आहे. त्यानुसार पोस्ट खात्यात भरती करताना स्थानिक रहिवासी असलेल्या उमेदवारांचीच भरती केली जाते. पाच वर्षे कंत्राटी पद्धतीने काम केल्यानंतर अंतर्गत परिक्षा उत्तीर्ण झालेल्यांना कायम केले जाते. पोस्ट खात्याच्या ठाणे पश्चिम विभाग, मीरा रोडच्या अखत्यारीत असलेल्या विरार, पालघर आणि जव्हार उपविभागात पालघर जिल्हयाची निर्मिती झाल्यानंतर १०५ पोस्टमन आणि डाकपालांची कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली. मात्र, ही भरती करताना वरिष्ठ आणि स्थानिक उपविभागातील अधिकाºयांनी अनेक नियम पायदळी तुडवल्याची माहिती हाती आली आहे.पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर राज्य सरकारने १९ जानेवारी २०१६ च्या आदेशानुसार सरळसेवा भरतीत २२ टक्के आरक्षण अनुसूचित जमातींच्या उमेदवारांसाठी लागू केले आहे. त्यासाठी राज्याच्या प्रशासकीय विभागाने बिंदुनामावली तयार केली आहे. पण, १०५ उमेदवारांची सरळसेवा पद्धतीने भरती करतांना बिंदुनामावलीचा भंग करून आरक्षण असतांनाही अनुसूचीत जमातीच्या उमेदवारांना डावलले गेले आहे. विशेष म्हणजे १०५ जागांसाठी आरक्षण निश्चित करणाºया आदेशाची प्रत देण्यासही पोस्ट खात्याने नकार देण्यात दिला आला आहे.भरती केलेले बहुसंख्य उमेदवार स्थानिक, तालुक्यातील अथवा जिल्हयातील नसून बाहेरील असल्याचे माहितीची अधिकारात मिळालेल्या माहितीवरुन उजेडात आले आहे. औरंगाबाद, लातूर, परभणी, उस्मानाबाद यासह बाहेरील जिल्ह्यातील उमेदवारांचीच भरती करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे निवडलेल्या उमेदवारांकडून अवघ्या शंभर रुपयांच्या मुद्रांक पेपरवर अकरा महिन्यांच्या भाडे करारावर ते कायमस्वरुपी रहिवासी असल्याचे दाखवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. यातही उमेदवाराचा मूळ पत्ता टाकण्याऐवजी लिहून देणाºयाचाच पत्ता टाकण्यात आला आहे. वर भाडे कराराची नोटरी अथवा दुय्यम निबंधकांकडे नोंदणीदेखील करण्यात आली नसल्याचे कागदपत्रांवरून दिसून आले आहे.तर कार्यालयातील अधिकाºयांनी ही निवड उपविभागीय कार्यालयातून केली गेल्याचे सांगून माहिती देण्यास नकार दिला. तर उपविभागीय कार्यालयातील अधिकारी संप असल्याने आले नाहीत असे उत्तर देऊन टाळाटाळ करण्यात आली.सगळ्याच बाबतीत केला गेला आहे गोलमाल, डाक अधिक्षक झाले मौनीविशेष म्हणजे बहुतेक उमेदवारांंचे भाडे करार संपुष्टात आले असून त्यांनी नेमणूक झालेल्या गावात कायमस्वरुपी वास्तव्य केलेले नसून त्याबाबतचे कायदेशीर पुरावे अर्थात तहसिलदार, तलाठी, ग्रामपंचायत, महापालिका, पोलीस पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यामार्फत मिळणारे रहिवास पुरावा, घरपट्टी, वीज बिल, सातबारा यापैकी कोणतीही कागदपत्रे सादर केलेली नाहीत. तसेच नोकरी मिळाल्यानंतर तीस दिवसाच्या आत कायमस्वरुपी वास्तव्य करण्याचे बंधनकारक असताना एकाही उमेदवाराने त्याची पूर्तता केली नसल्याचेही उजेडात आले आहे.या भरती प्रक्रियेत अनुसूचित जमातीस आणि स्थानिक उमेदवारांना डावलून पोस्टात कार्यरत असलेले लिपीक, पोस्टमन यांच्यामार्फत आर्थिक फायद्यासाठी उमेदवारांच्या स्थानिक रहिवास कागदपत्रांची योग्यरित्या पडताळणी केली गेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी माहिती घेण्यासाठी मीरा रोड येथील कार्यालयात डाक अधिक्षक विलास इंगळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते कार्यालयात आले नसल्याचे सांगण्यात आले.