शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

वाडा तालुक्यातील गातेसमध्ये झेंडूचे विक्रमी पीक

By admin | Updated: March 5, 2017 02:26 IST

तालुक्यातील फूलशेतीचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र, येथील ग्रामस्थ गेल्या काही वर्षापासून झेंडूचे विक्रमी उत्पादन घेऊन त्याची शेती यशस्वी केली आहे. भातशेतीची कापण

- वसंत भोईर,  वाडातालुक्यातील फूलशेतीचे उत्पादन जास्त होत नाही. मात्र, येथील ग्रामस्थ गेल्या काही वर्षापासून झेंडूचे विक्रमी उत्पादन घेऊन त्याची शेती यशस्वी केली आहे. भातशेतीची कापण झाल्यानंतर येथील शेतकरी आता फूलशेती, भाजीपाला व कडधान्य शेतीकडे वळत आहेत. या शेतीत कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळत असल्याने ही शेती शेतकऱ्यांना लाभदायी ठरत आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे भातशेती दरवर्षी तोट्यात जात असल्याने शेतकरी आता फूलशेती, भाजीपाला शेतीकडे वळला आहे. हे वैतरणा नदीच्या काठावर वसलेले छोटेसे खेडे गाव आहे. नदीवर गातेस व कोनसई येथे बंधारे बांधल्याने येथे बारमाही मुबलक पाणी आहे. त्यामुळे येथील शेतकरी भातशेती नंतर इतर शेती करत आहेत. या गावात रब्बी हरभऱ्याची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. येथील शेतकरी फुलझाडांची लागवड करतांना दिसत आहेत. या गावात ही शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. झेंडूच्या विविध जातींच्या झाडांची लागवड केली जाते. यामध्ये जम्मू, कोलकता, अ‍ॅरोगोल्ड, मारीगोल्ड, कोलकाता व्हरायटी अशा जातींच्या झाडांचा समावेश आहे. या फुलांच्या रोपांना कळ््या लागल्यानंतर पहिल्या वेळेस त्या पोळ््यासह काढून टाकल्या जातात तर दुसऱ्या वेळी लागलेल्या कळ््या ठेवून नंतर फुले तोडली जातात. पहिल्या वेळेस कळ््या काढल्याने पुढील उत्पादन वाढते. असे येथील शेतकरी लक्ष्मण पाटील यांनी सांगितले. प्रत्येक सणावारास तसेच शुभ कार्याला अन्य फुलांप्रमाणे किंबहुणा या फुलांची मागणी जास्त असते. त्यामुळे अल्पशा खर्चात मोठे उत्पन्न देणाऱ्या झेंडूची लागवड करणे हा शेतकऱ्यांना चांगला पर्याय आहे.दादर आणि कल्याणातून मागणीयेथील हवामन आणि जमीन या फूलशेतीसाठी योग्य असल्याने या पिकाचे मोठे उत्पन्न येते. हे झाड दोन ते तीन महिन्यात फूल देते. एका एकराला ३० ते ३५ हजारांचा खर्च येतो. मात्र, दोन महिन्यांत एका एकरातून एक ते सव्वा लाखांचे उत्पन्न मिळते. आजमितीस ५० ते ६० रुपयांचा प्रति किलो भाव आहे. हा माल दादर येथील फूलबजारात व कल्याण येथे विकला जातो. व्यापारी माल घेण्यासाठी जागेवर येतात. अशी माहिती येथील शेकऱ्यांनी दिली. बाजाराच्या चढत्या-उतरत्या भावावर दर अवलंबून असतात. त्यामुळे कोणत्या हंगामात हे फूल लावले पाहिजे हे ओळखल्यास जास्त उत्पन्न मिळते. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये लागवड झाल्यास चांगला भाव मिळतो.