शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
3
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
4
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
5
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
6
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
7
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
8
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
10
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
11
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
12
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
13
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
15
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
16
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
17
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
18
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
19
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
20
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

कूपनलिकेच्या पाण्यावर टोमॅटोचे विक्रमी पीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 00:35 IST

मुसारणे पाड्याच्या बळीराजाची किमया

वसंत भोईर लोकमत न्यूज नेटवर्कवाडा : सिंचनाचे कोणतेही साधन उपलब्ध नसताना वाडा तालुक्यातील मुसारणे पाडा येथील शेतकऱ्यांनी स्वतः कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर टाेमॅटोचे विक्रमी पीक घेतले आहे. यंदा आतापर्यंत भावही चांगला असल्याने शेतकरी आनंदात आहेत. या वर्षी टोमॅटो शेती  लाभदायक ठरत असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मुसारणे पाडा हे एक छोटेसे खेडेगाव असून गावाच्या आजूबाजूला कोणतीही नदी अथवा मोठा तलाव अथवा कालवा नाही, मात्र येथील शेतकऱ्यांनी कूपनलिका खोदून तिच्या पाण्यावर ते विविध प्रकारची पिके घेत आहेत. भात पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई टाेमॅटाे शेतीने भरून काढण्याचा प्रयत्न येथील शेतकऱ्यांनी केला आहे.

टाेमॅटोच्या अलंकार, अभिनव या वाणाचे बियाणे आणून ते स्वतःच रोप तयार करतात व त्याची  लागवड करतात. सर्वप्रथम भात पीक काढल्यानंतर शेताची नांगरणी करून वाफे तयार केले जातात. त्यानंतर नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात त्याची लागवड केली जाते.  साधारणपणे ५० ते ६० दिवसांनी फळधारणा होते. त्यानंतर चार दिवसांनी फळे काढणीला येतात. योग्य वेळी फळतोडणी झाली तरच पुढचे फळ व्यवस्थित होते. 

एका एकराला १५०० कॅरेट टाेमॅटाे निघतात. त्याचे वजन ५० ते ५५ टन भरते. एका एकराला अंदाजे दीड लाख रुपये खर्च येतो, मात्र जसा बाजारभाव असेल त्याप्रमाणे नफा-तोटा होतो.  या वर्षी आतापर्यंत टोमॅटोला चढता-उतरता भाव असला तरी ठीक आहे, नफा होईल अशी आशा निश्चितच आहे. येथील जमीन टोमॅटोसाठी  अत्यंत उपयुक्त आहे. तसेच ठिंबक सिंचनामुळे मजूरही कमी लागतात, अशी माहिती परशुराम पाटील यांनी दिली. 

तरुणांनी आधुनिक शेतीकडे वळावे - पाटीलदैनंदिन आहारात टाेमॅटाे हा महत्त्वाचा घटक आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून येथील शेतकऱ्यांनी टाेमॅटाे उत्पादनात गेल्या अनेक वर्षांपासून आपला लौकिक कायम राखला आहे. तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समिती नसल्याने  हा माल भिवंडी येथे स्वतः शेतकऱ्यांना घेऊन जावा लागतो. नाहीतर दलालांमार्फत विकावा लागतो, अशी माहिती युवा शेतकरी प्रफुल्ल पाटील यांनी दिली. तरुणांनी शेतीकडे वळून आधुनिक शेती करण्याचा सल्ला त्यांनी दिला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार