शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

पुढाऱ्यांच्या शिफारशी वेट अ‍ॅण्ड वॉचवर

By admin | Updated: September 29, 2016 03:25 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहाची क्षमता कमी आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने शाळा, महाविद्यालय

- शौकत शेख, डहाणूआदिवासी विद्यार्थ्यांना निवासी वसतिगृहात राहून शिक्षण घेण्यासाठी वसतिगृहाची क्षमता कमी आणि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने शाळा, महाविद्यालय सुरू होऊन चार महिने होऊनही दस्तूर खुद्द आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा तसेच आमदार, खासदारांनी वसतिगृहापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना खास बाब म्हणून प्रवेश देण्यासाठी तीनशे शिफारसपत्रांना डहाणू आदिवासी विकास विभागाने विचाराधीन ठेवले आहे.डहाणू, तलासरी, पालघर, वसई भागात राहणारे विद्यार्थी वसतिगृहात राहून शिक्षण घेत असतात. या वर्षी शाळा सुरू होऊन चार महिने झाले तरी ही हजारो विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे कासा, दापचरी, भापोली, विक्रमगड, काचोई, वेढे इत्यादी भागातील हजारो विद्यार्थ्यांना दररोज शंभर ते दीडशे रुपये मोजून प्रवास करावा लागत आहे. अशा दुर्गम भागांतील येणाऱ्या विद्यार्थ्यांना खास बाब म्हणून आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, पालघरचे खासदार चिंतामण वनगा, डहाणू मतदारसंघाचे आमदार पास्कल धनारे, पालघरचे आमदार अमित घोडा, आमदार आनंदभाई ठाकूर, आमदार विलास तरे यांनी सुमारे तीनशे शिफारसपत्रे आदिवासी विकास विभागाला गेल्या एक महिन्यापासून दिले आहेत. परंतु विद्यार्थ्यांचा वाढीव तुकडीची परवानगी शासनाकडून मिळत नसल्याने हजारो विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही. लालफितीचा फटकाआदिवासी विकास विभगाने वरील पुढाऱ्यांचे पत्र अप्पर आयुक्त ठाणे यांना खास बाब म्हणून प्रस्ताव पाठवण्यात आले आहे. तिथून आदिवासी आयुक्त नाशिक यांच्याकडे मंजुरी मिळाल्यानंतर सदर प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येईल. एकंदरच शिफारसपत्र घेणाऱ्या आदिवासी पालकांच्या पदरी निराशाच आली आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू प्रकल्पांतर्गत एकूण १७६ निवासी वसतिगृहांची संख्या व क्षमता वाढत नसल्याने दरवर्षी हजारो आदिवासी विद्यार्थी अर्धवट शिक्षण सोडून आपल्या कुटुंबाबरोबर मजुरी करण्यासाठी स्थलांतर करीत असतात.