शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

वसईत रेशनकार्डांचे संगणीकरण करण्याची मोहिमेमुळे रेशनिंगचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 01:35 IST

महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाकडून रेशनकार्डांचे संगणीकरण करण्याची मोहिम राबविली जात आहे.

वसई : महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाकडून रेशनकार्डांचे संगणीकरण करण्याची मोहिम राबविली जात आहे. त्या अनुषंगाने वसई तालुक्यातील रेशनकार्ड धारकांच्या शिधा पत्रिकांची (रेशनकार्ड) संगणीकृत नोंदणी केली जात आहे. मात्र वसई तालुक्यातील कित्येक ग्राहकांनी अर्ज भरुनही अद्याप त्यांची आॅनलाईन रेशनकार्डे कार्यान्वित झालेली नसल्याने त्यांना मागील तीन ते चार महिन्यांपासून धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर रुपेश जाधव यांनी नुकतीच तहसिलदारांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली. यावेळी जवळपास चारशे महिला उपस्थित होत्या. त्यांनी गोंधळाबाबत रोष व्यक्त केला.कार्डांचे संगणकीकरण करु न ती आॅनलाईन करण्याची प्रक्रीया अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने कित्येक रेशनकार्ड धारकांची नावे अद्याप संगणकात अपडेट झालेली नाहीत. दुसरीकडे संगणक यंत्रणेवर अपडेट झालेल्या कार्डधारकांनाच धान्य वितरित केले जात असल्याने शेकडो कार्डधारक गेल्या तीन ते चार महिन्यांपासून धान्यापासून वंचित आहेत. यामुळे आर्थिक दुर्बल असलेल्या कार्डधारकांना नाईलाजास्तव चढ्या भावाने बाजारातून धान्य खरेदी करावे लागत आहे. या संदर्भात महापौर रुपेश जाधव यांनी नुकतीच वसई तहसिलदारांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. तसेच नागरीकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करुन हे काम जलदगतीने करावे अशी मागणी केली. यासह नालासोपारातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आचोळे भागासाठी स्वतंत्र शिधा वाटप केंद्र सुरु करावे, काही शिधावाटपात सावळागोंधळ सुरु असून त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली. नगरसेवक वैभव पाटील यांनीही यावेळी नागरीकांना होणारी गैरसोय दुर करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला द्यावेत अशी मागणी केली. तर धान्य मिळण्याबाबत नागरीकांची गैरसोय होणार नाही असे आश्वासन तहसिलदारांनी दिले. महिला बचत गटाच्या केंद्राबाबत ग्राहकांच्या तक्रारींची, चौकशी करून कारवाई करू, असे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. वसईत धान्याचा काळाबाजार सुरू असल्याची चर्चा आहे. काही बचत गटाच्या शिधावाटप केंद्राबाबत ग्राहकांच्या तक्रारी आहेत. ही दुकाने महिनाभर खुली राहणे आवश्यक आहे; परंतु जेव्हा धान्य येते तेंव्हा त्याची माहिती नागरिकांना मिळत नाही आणि अवघ्या दोन-तीन तासांत धान्य संपल्याचे जाहीर केले जाते. मात्र हे धान्य काळ्याबाजारात विकले जात असल्याचा व पुरवठा अधिकारी आणि दुकानदारांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. काही दुकानदारांकडे एकापेक्षा अधिक परवाने देण्यात आलेले आहे. वसईत सध्या ४५ महिला बचत गटांना रेशेनिंगचे परवाने देण्यात आले आहेत.विजेचीही चोरीवटार येथील एकाच घरात दोन परवाने दिलेले आहेत. महिला बचत गटाच्या एका महिलेच्या नावावर व पतीच्या नावावर दुसरे असे दोन परवाने घेतले.या महिला बचत गटाचे शिधावाटप केंद्र आदिवासी पाड्यात असून आकोडा टाकून चोरीची वीजवापरली जात असल्याचे समोर आले आहे. दिवाळीत ३०० किलो तूरडाळ उपलब्ध असतांनाही वेळेत तिचे वितरण या केंद्रातून करण्यात आले नसल्याचे समजते.नियमानुसार पुरवठा होत असल्याचा दावा वसईचे पुरवठा अधिकारी प्रदीप मुकणे यांनी केला आहे. जर कडधान्याचा पुरवठा होऊनही महिला बचत गटाच्या केंद्रात धान्याचे वाटप होत नसेल तर त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.