शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वसईत रेशनकार्डांचे संगणीकरण करण्याची मोहिमेमुळे रेशनिंगचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 01:35 IST

महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाकडून रेशनकार्डांचे संगणीकरण करण्याची मोहिम राबविली जात आहे.

वसई : महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाकडून रेशनकार्डांचे संगणीकरण करण्याची मोहिम राबविली जात आहे. त्या अनुषंगाने वसई तालुक्यातील रेशनकार्ड धारकांच्या शिधा पत्रिकांची (रेशनकार्ड) संगणीकृत नोंदणी केली जात आहे. मात्र वसई तालुक्यातील कित्येक ग्राहकांनी अर्ज भरुनही अद्याप त्यांची आॅनलाईन रेशनकार्डे कार्यान्वित झालेली नसल्याने त्यांना मागील तीन ते चार महिन्यांपासून धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर रुपेश जाधव यांनी नुकतीच तहसिलदारांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली. यावेळी जवळपास चारशे महिला उपस्थित होत्या. त्यांनी गोंधळाबाबत रोष व्यक्त केला.कार्डांचे संगणकीकरण करु न ती आॅनलाईन करण्याची प्रक्रीया अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने कित्येक रेशनकार्ड धारकांची नावे अद्याप संगणकात अपडेट झालेली नाहीत. दुसरीकडे संगणक यंत्रणेवर अपडेट झालेल्या कार्डधारकांनाच धान्य वितरित केले जात असल्याने शेकडो कार्डधारक गेल्या तीन ते चार महिन्यांपासून धान्यापासून वंचित आहेत. यामुळे आर्थिक दुर्बल असलेल्या कार्डधारकांना नाईलाजास्तव चढ्या भावाने बाजारातून धान्य खरेदी करावे लागत आहे. या संदर्भात महापौर रुपेश जाधव यांनी नुकतीच वसई तहसिलदारांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. तसेच नागरीकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करुन हे काम जलदगतीने करावे अशी मागणी केली. यासह नालासोपारातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आचोळे भागासाठी स्वतंत्र शिधा वाटप केंद्र सुरु करावे, काही शिधावाटपात सावळागोंधळ सुरु असून त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली. नगरसेवक वैभव पाटील यांनीही यावेळी नागरीकांना होणारी गैरसोय दुर करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला द्यावेत अशी मागणी केली. तर धान्य मिळण्याबाबत नागरीकांची गैरसोय होणार नाही असे आश्वासन तहसिलदारांनी दिले. महिला बचत गटाच्या केंद्राबाबत ग्राहकांच्या तक्रारींची, चौकशी करून कारवाई करू, असे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. वसईत धान्याचा काळाबाजार सुरू असल्याची चर्चा आहे. काही बचत गटाच्या शिधावाटप केंद्राबाबत ग्राहकांच्या तक्रारी आहेत. ही दुकाने महिनाभर खुली राहणे आवश्यक आहे; परंतु जेव्हा धान्य येते तेंव्हा त्याची माहिती नागरिकांना मिळत नाही आणि अवघ्या दोन-तीन तासांत धान्य संपल्याचे जाहीर केले जाते. मात्र हे धान्य काळ्याबाजारात विकले जात असल्याचा व पुरवठा अधिकारी आणि दुकानदारांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. काही दुकानदारांकडे एकापेक्षा अधिक परवाने देण्यात आलेले आहे. वसईत सध्या ४५ महिला बचत गटांना रेशेनिंगचे परवाने देण्यात आले आहेत.विजेचीही चोरीवटार येथील एकाच घरात दोन परवाने दिलेले आहेत. महिला बचत गटाच्या एका महिलेच्या नावावर व पतीच्या नावावर दुसरे असे दोन परवाने घेतले.या महिला बचत गटाचे शिधावाटप केंद्र आदिवासी पाड्यात असून आकोडा टाकून चोरीची वीजवापरली जात असल्याचे समोर आले आहे. दिवाळीत ३०० किलो तूरडाळ उपलब्ध असतांनाही वेळेत तिचे वितरण या केंद्रातून करण्यात आले नसल्याचे समजते.नियमानुसार पुरवठा होत असल्याचा दावा वसईचे पुरवठा अधिकारी प्रदीप मुकणे यांनी केला आहे. जर कडधान्याचा पुरवठा होऊनही महिला बचत गटाच्या केंद्रात धान्याचे वाटप होत नसेल तर त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.