शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
3
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
4
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
5
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
6
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
7
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
10
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
11
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
12
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
13
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
14
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
19
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
20
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?

वसईत रेशनकार्डांचे संगणीकरण करण्याची मोहिमेमुळे रेशनिंगचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 01:35 IST

महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाकडून रेशनकार्डांचे संगणीकरण करण्याची मोहिम राबविली जात आहे.

वसई : महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाकडून रेशनकार्डांचे संगणीकरण करण्याची मोहिम राबविली जात आहे. त्या अनुषंगाने वसई तालुक्यातील रेशनकार्ड धारकांच्या शिधा पत्रिकांची (रेशनकार्ड) संगणीकृत नोंदणी केली जात आहे. मात्र वसई तालुक्यातील कित्येक ग्राहकांनी अर्ज भरुनही अद्याप त्यांची आॅनलाईन रेशनकार्डे कार्यान्वित झालेली नसल्याने त्यांना मागील तीन ते चार महिन्यांपासून धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर रुपेश जाधव यांनी नुकतीच तहसिलदारांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली. यावेळी जवळपास चारशे महिला उपस्थित होत्या. त्यांनी गोंधळाबाबत रोष व्यक्त केला.कार्डांचे संगणकीकरण करु न ती आॅनलाईन करण्याची प्रक्रीया अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याने कित्येक रेशनकार्ड धारकांची नावे अद्याप संगणकात अपडेट झालेली नाहीत. दुसरीकडे संगणक यंत्रणेवर अपडेट झालेल्या कार्डधारकांनाच धान्य वितरित केले जात असल्याने शेकडो कार्डधारक गेल्या तीन ते चार महिन्यांपासून धान्यापासून वंचित आहेत. यामुळे आर्थिक दुर्बल असलेल्या कार्डधारकांना नाईलाजास्तव चढ्या भावाने बाजारातून धान्य खरेदी करावे लागत आहे. या संदर्भात महापौर रुपेश जाधव यांनी नुकतीच वसई तहसिलदारांची भेट घेऊन त्यांच्याशी या विषयावर चर्चा केली. तसेच नागरीकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करुन हे काम जलदगतीने करावे अशी मागणी केली. यासह नालासोपारातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन आचोळे भागासाठी स्वतंत्र शिधा वाटप केंद्र सुरु करावे, काही शिधावाटपात सावळागोंधळ सुरु असून त्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली. नगरसेवक वैभव पाटील यांनीही यावेळी नागरीकांना होणारी गैरसोय दुर करण्याचे निर्देश पुरवठा विभागाला द्यावेत अशी मागणी केली. तर धान्य मिळण्याबाबत नागरीकांची गैरसोय होणार नाही असे आश्वासन तहसिलदारांनी दिले. महिला बचत गटाच्या केंद्राबाबत ग्राहकांच्या तक्रारींची, चौकशी करून कारवाई करू, असे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले. वसईत धान्याचा काळाबाजार सुरू असल्याची चर्चा आहे. काही बचत गटाच्या शिधावाटप केंद्राबाबत ग्राहकांच्या तक्रारी आहेत. ही दुकाने महिनाभर खुली राहणे आवश्यक आहे; परंतु जेव्हा धान्य येते तेंव्हा त्याची माहिती नागरिकांना मिळत नाही आणि अवघ्या दोन-तीन तासांत धान्य संपल्याचे जाहीर केले जाते. मात्र हे धान्य काळ्याबाजारात विकले जात असल्याचा व पुरवठा अधिकारी आणि दुकानदारांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. काही दुकानदारांकडे एकापेक्षा अधिक परवाने देण्यात आलेले आहे. वसईत सध्या ४५ महिला बचत गटांना रेशेनिंगचे परवाने देण्यात आले आहेत.विजेचीही चोरीवटार येथील एकाच घरात दोन परवाने दिलेले आहेत. महिला बचत गटाच्या एका महिलेच्या नावावर व पतीच्या नावावर दुसरे असे दोन परवाने घेतले.या महिला बचत गटाचे शिधावाटप केंद्र आदिवासी पाड्यात असून आकोडा टाकून चोरीची वीजवापरली जात असल्याचे समोर आले आहे. दिवाळीत ३०० किलो तूरडाळ उपलब्ध असतांनाही वेळेत तिचे वितरण या केंद्रातून करण्यात आले नसल्याचे समजते.नियमानुसार पुरवठा होत असल्याचा दावा वसईचे पुरवठा अधिकारी प्रदीप मुकणे यांनी केला आहे. जर कडधान्याचा पुरवठा होऊनही महिला बचत गटाच्या केंद्रात धान्याचे वाटप होत नसेल तर त्याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.