शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
3
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
4
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
5
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
6
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
7
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
8
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
9
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
10
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
11
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
12
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
13
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
14
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
15
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
16
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
17
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
18
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
19
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
20
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप

राजवली खाडी स्वच्छता एप्रिलअखेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:51 IST

पुराच्या आठवणीचा धसका; तीन पोकलन मशिन व एका तराफ्याचा वापर

वसई : जुलै महिन्यातील मुसळधार पावसात शहरातील पाणी वाहून न जाण्याचे मुख्य कारण राजवली खाडीतील मातीचा भराव व लोखंडी पूल ही कारणे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने तो अडथळा त्यावेळी दूर केला होता. मात्र चालू वर्षात जुलै २०१८ सारखी पूरपरिस्थीती पुन्हा उद्भवू नये म्हणून आतापासूनच राजवली खाडीतील गाळ काढण्यास व रूंदिकरणास पालिकेने सुरूवात केली आहे.या कामासाठी तीन पोकलन मशिन व एका तराफ्याचा वापर करण्यात येत आहे. पुढील दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. राजावली खाडीवरील अनिधकृत भरावं व बांधलेला पुलं व त्यामूळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन औद्योगिक वसाहतीचे झालेले १५० कोटीचे नुकसान, १२०० एकर मिठागरात पुराचा पाणी गेल्यामुळे झालेली करोडो रु पयांची हानी, राजावली खाडीत रसायनिमश्रित पाणी सोडले जात असल्याने होत असलेले प्रदूषण अशी अनेक कारणांमूळे राजावली खाडी प्रकाशझोतात आली होती.वसई विरार शहर महानगरपालिका शहर स्वच्छता विभागामार्फत विविध योजना प्रभावी पणे राबविल्या जात आहेत.पाण्याचा निचरा होऊन रस्त्यावर पाणी तुंबू नये याकरीता तसेच नाले सफाई करीता सन २०१९-२० मध्ये १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.वसई-विरारमधील नाल्यांची एकूण संख्या १५० असून त्यांची लांबी १८७ किमी. आहे. या नालेसफाईसाठी खर्च गतवर्षी साडेचार कोटी रुपये होता.छोट्या गटारांची सफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली असून नालेसफाईही पूर्ण झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी सांगितले होते.तरीही जुलै महिन्यातील पावसामूळे शहरातील नाल्यांतून पाण्याचा निचरा होऊ शकला नाही व शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली.यावर्षी तशी परिस्थितीपुन्हा उद्भवू नये म्हणून पालिका नालेसफाईवर लक्ष ठेऊन आहे.तिवरांच्या झाडांना धक्का न लावता नालेसफाईया अगोदर शहरांतर्गत नालेसफाईवर भर दिला जात होता. त्यावर पाच ते साडेपाच कोटी खर्च होत होता. मात्र, आता ज्या नाल्यांतून शहरातील पाणी खाडीला जाऊन मिळते त्या नाल्यांतील गाळ काढणे व खाडीचे रूंदिकरण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्याचा अतिरिक्त खर्च चार कोटी रूपयांच्या आसपास आहे. खाड्यांतील गाळ काढण्यासाठी पोकलन मशीन व तराफ्यांचा वापर करण्यात येत असून एप्रिल अखेरपर्यंत नालेसफाई केली जाणार आहे. वसई पूर्व येथील खाडी नायगांव पर्यंत साफ करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी तिवरांची झाडे आहेत त्यांना धक्का न लावता नालेसफाई केली जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली.