शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

राजवली खाडी स्वच्छता एप्रिलअखेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:51 IST

पुराच्या आठवणीचा धसका; तीन पोकलन मशिन व एका तराफ्याचा वापर

वसई : जुलै महिन्यातील मुसळधार पावसात शहरातील पाणी वाहून न जाण्याचे मुख्य कारण राजवली खाडीतील मातीचा भराव व लोखंडी पूल ही कारणे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने तो अडथळा त्यावेळी दूर केला होता. मात्र चालू वर्षात जुलै २०१८ सारखी पूरपरिस्थीती पुन्हा उद्भवू नये म्हणून आतापासूनच राजवली खाडीतील गाळ काढण्यास व रूंदिकरणास पालिकेने सुरूवात केली आहे.या कामासाठी तीन पोकलन मशिन व एका तराफ्याचा वापर करण्यात येत आहे. पुढील दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. राजावली खाडीवरील अनिधकृत भरावं व बांधलेला पुलं व त्यामूळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन औद्योगिक वसाहतीचे झालेले १५० कोटीचे नुकसान, १२०० एकर मिठागरात पुराचा पाणी गेल्यामुळे झालेली करोडो रु पयांची हानी, राजावली खाडीत रसायनिमश्रित पाणी सोडले जात असल्याने होत असलेले प्रदूषण अशी अनेक कारणांमूळे राजावली खाडी प्रकाशझोतात आली होती.वसई विरार शहर महानगरपालिका शहर स्वच्छता विभागामार्फत विविध योजना प्रभावी पणे राबविल्या जात आहेत.पाण्याचा निचरा होऊन रस्त्यावर पाणी तुंबू नये याकरीता तसेच नाले सफाई करीता सन २०१९-२० मध्ये १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.वसई-विरारमधील नाल्यांची एकूण संख्या १५० असून त्यांची लांबी १८७ किमी. आहे. या नालेसफाईसाठी खर्च गतवर्षी साडेचार कोटी रुपये होता.छोट्या गटारांची सफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली असून नालेसफाईही पूर्ण झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी सांगितले होते.तरीही जुलै महिन्यातील पावसामूळे शहरातील नाल्यांतून पाण्याचा निचरा होऊ शकला नाही व शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली.यावर्षी तशी परिस्थितीपुन्हा उद्भवू नये म्हणून पालिका नालेसफाईवर लक्ष ठेऊन आहे.तिवरांच्या झाडांना धक्का न लावता नालेसफाईया अगोदर शहरांतर्गत नालेसफाईवर भर दिला जात होता. त्यावर पाच ते साडेपाच कोटी खर्च होत होता. मात्र, आता ज्या नाल्यांतून शहरातील पाणी खाडीला जाऊन मिळते त्या नाल्यांतील गाळ काढणे व खाडीचे रूंदिकरण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्याचा अतिरिक्त खर्च चार कोटी रूपयांच्या आसपास आहे. खाड्यांतील गाळ काढण्यासाठी पोकलन मशीन व तराफ्यांचा वापर करण्यात येत असून एप्रिल अखेरपर्यंत नालेसफाई केली जाणार आहे. वसई पूर्व येथील खाडी नायगांव पर्यंत साफ करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी तिवरांची झाडे आहेत त्यांना धक्का न लावता नालेसफाई केली जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली.