शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

राजवली खाडी स्वच्छता एप्रिलअखेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 22:51 IST

पुराच्या आठवणीचा धसका; तीन पोकलन मशिन व एका तराफ्याचा वापर

वसई : जुलै महिन्यातील मुसळधार पावसात शहरातील पाणी वाहून न जाण्याचे मुख्य कारण राजवली खाडीतील मातीचा भराव व लोखंडी पूल ही कारणे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालिकेने तो अडथळा त्यावेळी दूर केला होता. मात्र चालू वर्षात जुलै २०१८ सारखी पूरपरिस्थीती पुन्हा उद्भवू नये म्हणून आतापासूनच राजवली खाडीतील गाळ काढण्यास व रूंदिकरणास पालिकेने सुरूवात केली आहे.या कामासाठी तीन पोकलन मशिन व एका तराफ्याचा वापर करण्यात येत आहे. पुढील दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे. राजावली खाडीवरील अनिधकृत भरावं व बांधलेला पुलं व त्यामूळे पूरपरिस्थिती निर्माण होऊन औद्योगिक वसाहतीचे झालेले १५० कोटीचे नुकसान, १२०० एकर मिठागरात पुराचा पाणी गेल्यामुळे झालेली करोडो रु पयांची हानी, राजावली खाडीत रसायनिमश्रित पाणी सोडले जात असल्याने होत असलेले प्रदूषण अशी अनेक कारणांमूळे राजावली खाडी प्रकाशझोतात आली होती.वसई विरार शहर महानगरपालिका शहर स्वच्छता विभागामार्फत विविध योजना प्रभावी पणे राबविल्या जात आहेत.पाण्याचा निचरा होऊन रस्त्यावर पाणी तुंबू नये याकरीता तसेच नाले सफाई करीता सन २०१९-२० मध्ये १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.वसई-विरारमधील नाल्यांची एकूण संख्या १५० असून त्यांची लांबी १८७ किमी. आहे. या नालेसफाईसाठी खर्च गतवर्षी साडेचार कोटी रुपये होता.छोट्या गटारांची सफाई पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाली असून नालेसफाईही पूर्ण झाल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी पावसाळ्यापूर्वी सांगितले होते.तरीही जुलै महिन्यातील पावसामूळे शहरातील नाल्यांतून पाण्याचा निचरा होऊ शकला नाही व शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली.यावर्षी तशी परिस्थितीपुन्हा उद्भवू नये म्हणून पालिका नालेसफाईवर लक्ष ठेऊन आहे.तिवरांच्या झाडांना धक्का न लावता नालेसफाईया अगोदर शहरांतर्गत नालेसफाईवर भर दिला जात होता. त्यावर पाच ते साडेपाच कोटी खर्च होत होता. मात्र, आता ज्या नाल्यांतून शहरातील पाणी खाडीला जाऊन मिळते त्या नाल्यांतील गाळ काढणे व खाडीचे रूंदिकरण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे. त्याचा अतिरिक्त खर्च चार कोटी रूपयांच्या आसपास आहे. खाड्यांतील गाळ काढण्यासाठी पोकलन मशीन व तराफ्यांचा वापर करण्यात येत असून एप्रिल अखेरपर्यंत नालेसफाई केली जाणार आहे. वसई पूर्व येथील खाडी नायगांव पर्यंत साफ करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी तिवरांची झाडे आहेत त्यांना धक्का न लावता नालेसफाई केली जाणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता राजेंद्र लाड यांनी दिली.