शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

पक्ष बदलून राजेंद्र गावितांनी काढले उट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:56 IST

दामू शिंगडा यानी २०१४ निवडणूकीत जी नामुष्की भोगायला लावली होती. तिचे उट्टे राजेंद्र गावित यांनी या पोटनिवडणुकीत १०० टक्के काढले.

पालघर : दामू शिंगडा यानी २०१४ निवडणूकीत जी नामुष्की भोगायला लावली होती. तिचे उट्टे राजेंद्र गावित यांनी या पोटनिवडणुकीत १०० टक्के काढले.२०१४ निवडणुकीत काँग्रेसने राजेंद्र गावित यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यांच्या नावाचे बॅनरही संपूर्ण मतदारसंघात झळकले होते. त्यांनी निवडणूक लढविण्याची जोरदार तयारीही केली होती. परंतु या मतदारसंघात काँग्रेसने मलाच उमेदवारी दिली पाहिजे. नाहीतर मी बंडखोर म्हणून अर्ज दाखल करेल अशी धमकी शिंगडा यांनी काँग्रेसश्रेष्ठींना दिली. त्यामुळे गावितांची उमेदवारी काँग्रेसने रद्द केली.रातोरात गावितांची सगळी होर्डींग्ज, बॅनर उतरवून घेतली गेली. राहुल गांधी यांनी सोनाळे येथे जी प्रचार सभा घेतली. त्यावेळीही त्यांनी यावर भाष्य केले नव्हते. या सगळ्या झामझाममध्ये पालघर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारच उभा राहिला नाही. परंतु प्रचार मात्र असा झाला की, बविआच्या उमेदवारासाठी काँग्रेसने हेतूत: उमेदवार उभा केला नाही.पालघर विधानसभा मतदार संघातही त्यांना दोनवेळा पराभव झाला. या सगळ्या प्रकरणात गावितांची जी मानहानी झाली तिचा वचपा काढण्याची संधी ते पाहत होते. ती त्यांना भाजपने आपल्यात घेऊन व पोटनिवडणूकीची उमेदवारी बहाल करून आणि ती जिंकून गावितांनी साधली. एवढेच नव्हे तर आता वनगा नसल्यामुळे २०१९ च्या पालघर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीची उमेदवारीही भाजपा त्यांनाच देईल. म्हणजे एकापरीने गावित हे डबल वचपा काढतील. कारण शिंगडा यांचे म्हणजेच काँग्रेसचे डिपॉझिट या पोटनिवडणुकीत जप्त झाले आहे. तसेच त्यांना पुढच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याचीही शक्यता त्यामुळे पूर्णपणे संपुष्टात आली आहे. म्हणूनच गावित सध्या अत्यंत खूष आहेत.