शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

पक्ष बदलून राजेंद्र गावितांनी काढले उट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:56 IST

दामू शिंगडा यानी २०१४ निवडणूकीत जी नामुष्की भोगायला लावली होती. तिचे उट्टे राजेंद्र गावित यांनी या पोटनिवडणुकीत १०० टक्के काढले.

पालघर : दामू शिंगडा यानी २०१४ निवडणूकीत जी नामुष्की भोगायला लावली होती. तिचे उट्टे राजेंद्र गावित यांनी या पोटनिवडणुकीत १०० टक्के काढले.२०१४ निवडणुकीत काँग्रेसने राजेंद्र गावित यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. त्यांच्या नावाचे बॅनरही संपूर्ण मतदारसंघात झळकले होते. त्यांनी निवडणूक लढविण्याची जोरदार तयारीही केली होती. परंतु या मतदारसंघात काँग्रेसने मलाच उमेदवारी दिली पाहिजे. नाहीतर मी बंडखोर म्हणून अर्ज दाखल करेल अशी धमकी शिंगडा यांनी काँग्रेसश्रेष्ठींना दिली. त्यामुळे गावितांची उमेदवारी काँग्रेसने रद्द केली.रातोरात गावितांची सगळी होर्डींग्ज, बॅनर उतरवून घेतली गेली. राहुल गांधी यांनी सोनाळे येथे जी प्रचार सभा घेतली. त्यावेळीही त्यांनी यावर भाष्य केले नव्हते. या सगळ्या झामझाममध्ये पालघर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवारच उभा राहिला नाही. परंतु प्रचार मात्र असा झाला की, बविआच्या उमेदवारासाठी काँग्रेसने हेतूत: उमेदवार उभा केला नाही.पालघर विधानसभा मतदार संघातही त्यांना दोनवेळा पराभव झाला. या सगळ्या प्रकरणात गावितांची जी मानहानी झाली तिचा वचपा काढण्याची संधी ते पाहत होते. ती त्यांना भाजपने आपल्यात घेऊन व पोटनिवडणूकीची उमेदवारी बहाल करून आणि ती जिंकून गावितांनी साधली. एवढेच नव्हे तर आता वनगा नसल्यामुळे २०१९ च्या पालघर लोकसभा मतदारसंघात होणाऱ्या निवडणुकीची उमेदवारीही भाजपा त्यांनाच देईल. म्हणजे एकापरीने गावित हे डबल वचपा काढतील. कारण शिंगडा यांचे म्हणजेच काँग्रेसचे डिपॉझिट या पोटनिवडणुकीत जप्त झाले आहे. तसेच त्यांना पुढच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळण्याचीही शक्यता त्यामुळे पूर्णपणे संपुष्टात आली आहे. म्हणूनच गावित सध्या अत्यंत खूष आहेत.