शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची रात्रभर संततधार, रहिवाशांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:02 IST

पुन्हा सर्वत्र पूरस्थिती : नालासोपारा, वसई, विरार परिसरातील रस्त्यांवर पाणीच पाणी, दाद, फिर्याद मागायची तरी कुणाकडे?

नालासोपारा : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने वसई तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी सकाळपर्यंत चांगलाच जोर धरल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. मंगळवारी रात्री ६ ते ७ तास पाऊस पडल्याने नालासोपारा, वसई आणि विरार परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने त्यांना जणू नाल्याचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. धो-धो पावसामुळे वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.

मंगळवारी सकाळपासूनच अधूनमधून पावसाची रिमझिम सुरुच होती. तालुक्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने धो-धो पावसामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खड्ड्यांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतुकही धिम्या गतीने सुरु होती. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रात्रीनंतर मुसळधार पाऊस बरसला. बुधवारीही दिवसभर पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने भातरोपे कुजण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. धो-धो पावसामुळे नद्या, तलावे, विहिरी व धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नालासोपारा शहरात तर पूर्वेकडील गाला नगर, शिर्डी नगर, अलकापुरी, सेंट्रल पार्क, आचोळे रोड या परिसरात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावरून ये-जा करतांना रहिवाशांना व वाहनांना त्रास सहन करावा लागला. तसेच वसई, विरार आणि नायगाव परिसरातील खोलगट भागात पावसाचे पाणी साचले होते. नागरिक पाण्यामधून रस्ता काढत कामावर जात होते तर विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी रस्ता शोधत होते. नालासोपारा पूर्वेकडील काही परिसरात पावसाचे पाणी साचल्याने तसेच गटारांचे घाण पाणीही रस्त्यावर आल्याने नागरिकांना आणि वाहतुकीला त्रास होत होता.

नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर, लक्ष्मीबेन छेडा मार्ग, एसटी डेपो रोड, समेळ पाडा, चक्र ेश्वर तलाव, सोपारा, गास, सनसिटी रस्ता, उमराळे, नाळे या परिसरात पावसाचे पाणी साचले होते.वसईतील नाल्यांची साफसफाई महानगरपालिकेने कागदावरच केल्याने हे झाले.

महानगरपालिकेची यंत्रणा कुचकामी असल्याचा आरोप....गटारे साफ केली म्हणून महानगरपालिकेने गवगवा केला होता. पण पाऊस पडला की सखल भागात पाणी साचते त्या परिसरात सक्शन पंप का लावत नाही? सक्शन पंप पण महानगरपालिकेने विकले की काय असा सवाल नागरिकांनी केला आहे. साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणताही अधिकारी किंवा आपत्कालीन यंत्रणेचा अधिकारीही फिरकला नसल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस