शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

पावसाची रात्रभर संततधार, रहिवाशांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:02 IST

पुन्हा सर्वत्र पूरस्थिती : नालासोपारा, वसई, विरार परिसरातील रस्त्यांवर पाणीच पाणी, दाद, फिर्याद मागायची तरी कुणाकडे?

नालासोपारा : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने वसई तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी सकाळपर्यंत चांगलाच जोर धरल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. मंगळवारी रात्री ६ ते ७ तास पाऊस पडल्याने नालासोपारा, वसई आणि विरार परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने त्यांना जणू नाल्याचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. धो-धो पावसामुळे वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.

मंगळवारी सकाळपासूनच अधूनमधून पावसाची रिमझिम सुरुच होती. तालुक्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने धो-धो पावसामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खड्ड्यांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतुकही धिम्या गतीने सुरु होती. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रात्रीनंतर मुसळधार पाऊस बरसला. बुधवारीही दिवसभर पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने भातरोपे कुजण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. धो-धो पावसामुळे नद्या, तलावे, विहिरी व धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नालासोपारा शहरात तर पूर्वेकडील गाला नगर, शिर्डी नगर, अलकापुरी, सेंट्रल पार्क, आचोळे रोड या परिसरात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावरून ये-जा करतांना रहिवाशांना व वाहनांना त्रास सहन करावा लागला. तसेच वसई, विरार आणि नायगाव परिसरातील खोलगट भागात पावसाचे पाणी साचले होते. नागरिक पाण्यामधून रस्ता काढत कामावर जात होते तर विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी रस्ता शोधत होते. नालासोपारा पूर्वेकडील काही परिसरात पावसाचे पाणी साचल्याने तसेच गटारांचे घाण पाणीही रस्त्यावर आल्याने नागरिकांना आणि वाहतुकीला त्रास होत होता.

नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर, लक्ष्मीबेन छेडा मार्ग, एसटी डेपो रोड, समेळ पाडा, चक्र ेश्वर तलाव, सोपारा, गास, सनसिटी रस्ता, उमराळे, नाळे या परिसरात पावसाचे पाणी साचले होते.वसईतील नाल्यांची साफसफाई महानगरपालिकेने कागदावरच केल्याने हे झाले.

महानगरपालिकेची यंत्रणा कुचकामी असल्याचा आरोप....गटारे साफ केली म्हणून महानगरपालिकेने गवगवा केला होता. पण पाऊस पडला की सखल भागात पाणी साचते त्या परिसरात सक्शन पंप का लावत नाही? सक्शन पंप पण महानगरपालिकेने विकले की काय असा सवाल नागरिकांनी केला आहे. साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणताही अधिकारी किंवा आपत्कालीन यंत्रणेचा अधिकारीही फिरकला नसल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस