शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची रात्रभर संततधार, रहिवाशांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:02 IST

पुन्हा सर्वत्र पूरस्थिती : नालासोपारा, वसई, विरार परिसरातील रस्त्यांवर पाणीच पाणी, दाद, फिर्याद मागायची तरी कुणाकडे?

नालासोपारा : गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने वसई तालुक्यात मंगळवारी रात्रीपासून ते बुधवारी सकाळपर्यंत चांगलाच जोर धरल्याने सर्वत्र पाणीच पाणी साचले होते. मंगळवारी रात्री ६ ते ७ तास पाऊस पडल्याने नालासोपारा, वसई आणि विरार परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याने त्यांना जणू नाल्याचे स्वरूप आले होते. अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे वाहतूक विस्कळीत होऊन जनजीवन विस्कळीत झाले होते. धो-धो पावसामुळे वसई-विरार शहरांना पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणी साठ्यात समाधानकारक वाढ झाली आहे.

मंगळवारी सकाळपासूनच अधूनमधून पावसाची रिमझिम सुरुच होती. तालुक्यात अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने धो-धो पावसामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. खड्ड्यांमुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वाहतुकही धिम्या गतीने सुरु होती. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. रात्रीनंतर मुसळधार पाऊस बरसला. बुधवारीही दिवसभर पावसाचा जोर असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेल्याने भातरोपे कुजण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. धो-धो पावसामुळे नद्या, तलावे, विहिरी व धरणांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नालासोपारा शहरात तर पूर्वेकडील गाला नगर, शिर्डी नगर, अलकापुरी, सेंट्रल पार्क, आचोळे रोड या परिसरात पावसाचे पाणी साचल्याने रस्त्यावरून ये-जा करतांना रहिवाशांना व वाहनांना त्रास सहन करावा लागला. तसेच वसई, विरार आणि नायगाव परिसरातील खोलगट भागात पावसाचे पाणी साचले होते. नागरिक पाण्यामधून रस्ता काढत कामावर जात होते तर विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी रस्ता शोधत होते. नालासोपारा पूर्वेकडील काही परिसरात पावसाचे पाणी साचल्याने तसेच गटारांचे घाण पाणीही रस्त्यावर आल्याने नागरिकांना आणि वाहतुकीला त्रास होत होता.

नालासोपारा पश्चिमेकडील हनुमान नगर, लक्ष्मीबेन छेडा मार्ग, एसटी डेपो रोड, समेळ पाडा, चक्र ेश्वर तलाव, सोपारा, गास, सनसिटी रस्ता, उमराळे, नाळे या परिसरात पावसाचे पाणी साचले होते.वसईतील नाल्यांची साफसफाई महानगरपालिकेने कागदावरच केल्याने हे झाले.

महानगरपालिकेची यंत्रणा कुचकामी असल्याचा आरोप....गटारे साफ केली म्हणून महानगरपालिकेने गवगवा केला होता. पण पाऊस पडला की सखल भागात पाणी साचते त्या परिसरात सक्शन पंप का लावत नाही? सक्शन पंप पण महानगरपालिकेने विकले की काय असा सवाल नागरिकांनी केला आहे. साचलेल्या पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणताही अधिकारी किंवा आपत्कालीन यंत्रणेचा अधिकारीही फिरकला नसल्याची तक्र ार नागरिकांनी केली आहे.

टॅग्स :Rainपाऊस