शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

रेल्वे प्रशासन शेतमाल वाहतुकीस अनुकूल, दुसऱ्यांदा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 01:35 IST

Dahanu News : डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात डहाणू रोड रेल्वे स्थानकातील या विभागाच्या कार्यालयात याबाबत बैठक झाली. काेरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतीमालाची उत्तरेकडील राज्यांच्या बाजारपेठत वाहतूक करता यावी म्हणून कृषी विभागाने भारतीय रेल्वेकडे पाठपुरावा केला होता.

 बोर्डी : पश्चिम रेल्वे प्रशासनाने डहाणू तालुक्यातील चिकूसह फळपिके आणि भाजीपाल्याच्या वाहतुकीसाठी विशेष सवलतीचा दुसऱ्यांदा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या पुढ्यात ठेवला आहे. याबाबतची बैठक नुकतीच डहाणू रोड रेल्वे स्थानक कार्यालयात पार पडली. या वेळी डहाणू रोड रेल्वे स्थानक अधीक्षक राकेश शर्मा, रेल्वे कमर्शियल इन्स्पेक्टर संदेश चिपळूणकर, महाराष्ट्र राज्य चिकू उत्पादन संघाचे अध्यक्ष व पदाधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात डहाणू रोड रेल्वे स्थानकातील या विभागाच्या कार्यालयात याबाबत बैठक झाली. काेरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतीमालाची उत्तरेकडील राज्यांच्या बाजारपेठत वाहतूक करता यावी म्हणून कृषी विभागाने भारतीय रेल्वेकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार १७ एप्रिलपासून पालघर रेल्वे स्थानक आणि तालुक्यातील वाणगाव, डहाणू रोड व घोलवड या तीन स्थानकांमध्ये मालगाडीला थांबा देण्याची तयारी रेल्वेने दाखवली होती. त्याचा फायदा पालघर तालुक्यातील व्यापाऱ्यांनी घेतला होता, मात्र डहाणूतील व्यापाऱ्यांनी त्याकडे पाठ फिरवली होती. दरम्यान, एप्रिल ते मे हा मिरची आणि अन्य भाजीपाल्याचा जिल्ह्यातील अखेरचा हंगाम होता. त्यामुळे भाजीपाला व्यापारीही उत्सुक नव्हते. आता प्रारंभीचा हंगाम असल्याने  प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे. 

किलाेमागे चार रुपयांच्या वाहतूक खर्चाची बचतडहाणू तालुक्यातून प्रतिदिन दिल्ली फळबाजारात ३० ते ३५ ट्रक चिकू फळाची तर मिरचीसह अन्य भाजीपाल्याची सुमारे ५० ट्रक निर्यात केली जाते. रस्तेवाहतुकीच्या तुलनेत रेल्वेवाहतुकीमुळे प्रत्येक किलोमागे किमान चार रुपयांची बचत होते. मात्र, चिकू व्यापाऱ्यांनी चिकू संकलन केंद्रातला माल वाहनाद्वारे तालुक्यातील रेल्वे स्थानकात पोहाेचवून उतरविणे, रेल्वेच्या डब्यात भरणे तसेच तेथील स्थानकात तो पोहाेचल्यावरही हीच प्रक्रिया पुन्हा करावी लागते. यासाठी हमाली, वाहतूक खर्च, मालाची नासाडी आणि वेळेचे व्यवस्थापन करावे लागते. त्यामुळे रस्तेवाहतुकीचा खर्च दुप्पट असला तरी कमी त्रासाचा असल्याचे मत कृषी विभागाकडे नोंदविले होते.

टॅग्स :western railwayपश्चिम रेल्वेagricultureशेती