शहरं
Join us  
Trending Stories
1
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
2
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
3
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
4
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
5
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
6
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
7
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
8
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
9
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
10
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
11
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
12
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
13
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
14
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
15
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
16
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
17
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
18
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
19
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
20
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता

जिल्ह्यातील प्रश्न : प्रचारात कळीचे मुद्दे

By admin | Updated: February 5, 2016 02:34 IST

दहा दिवसावर येऊन ठेपलेल्या पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी शिवसेना व विरोधक काँग्रेस आणि सत्ताधारी पक्षाच्या सहकारी पक्ष बहुजन विकास आघाडी

हितेन नाईक, पालघरदहा दिवसावर येऊन ठेपलेल्या पालघर विधानसभा पोटनिवडणुकीत सत्ताधारी शिवसेना व विरोधक काँग्रेस आणि सत्ताधारी पक्षाच्या सहकारी पक्ष बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत रंगणार आहे. या लढतीत केंद्र व राज्यातील सेना-भाजपा सरकारच्या कारकिर्दीबद्दल विरोधक रान उठविण्याचा प्रयत्न करीत आहेत. तर सत्ताधारी आपल्या कामगिरीचे तुणतुणे वाजवून मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहेत.केंद्र व राज्यशासनाशी निगडीत काही महत्वाचे प्रश्न या निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहतील किंबहुना निवडणुकीच्या प्रचारातील खूप मोठी जागा या मुद्यानीच व्यापली जाईल. यातील प्रमुख मुद्दा असेल तो वाढवण बंदराचा हा प्रश्न वाढवण व परिसरातील स्थानिक शेतकरी, बागायतदार, डायमेकर्स यांच्याशी तर निगडीत आहेच परंतु केळवा ते धाकटी डहाणू अशा समुद्रकिनाऱ्यावरील तमाम मच्छीमारांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. तत्कालीन युती शासनाच्या काळात होऊ घातलेला हा प्रकल्प शिवसेनाप्रमुखांच्या हस्तक्षेपामुळे रद्द झाला. परंतु याच युती शासनाच्या काळात या वाढवण बंदराने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. सेनेचा सहकारी पक्ष भाजपा दररोज एप्रिल मध्ये निविदा काढणार, परवानग्या बहाल लवकरच कामाला सुरूवात होणार इ. घोषणा करून सेनेची डोकेदुखी वाढवीत आहेत. तर आम्ही जनतेच्या पाठीशी आहोत असे सांगून सेना जनतेला आपल्या बाजूने ठेवण्याचा केवीलवाणा प्रयत्न करीत आहे. मात्र या प्रकरणात सेना आपले सर्वस्वपणाला लावणार आहे का? असा येथील मतदारांचा सवाल आहे. कोणत्याही परिस्थितीत सेना हा प्रकल्प हाणून पाडणार असा विश्वास मतदारांमध्ये निर्माण करण्यात अपयशी ठरल्यास त्याचा मोठा भुर्दंड सेना उमेदवाराला भोगावा लागू शकतो कारण जैतापूर प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही अशी घोषणा करणारी सेना आता सत्तेत आल्यानंतर मात्र जैतापूरचे काम पुन्हा सुरू झाले आहे. तीच गत वाढवण बंदराचे काम सुरू झाल्यानंतर आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे काही एकत नाही अशी सोयीस्कर भुमिका सेनेचे सत्ताधारी घेतील अशी पक्की धारणा किनारपट्टीवरील मतदारांमध्ये वाढीस लागल्याने याचा मोठा फटका सेना उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. याचा लाभ उठविण्यासाठी काँग्रेस व बहुजन विकास आघाडी दोघेही उत्सुक आहेत. यावेळी गावितासह निमकर यांनी या प्रश्नाबाबत आपण जनतेच्या पाठीशी आहोत असे जाहीर केले आहे.आदिवासी भागातील कुपोषण आणि आश्रमशाळांच्या दुरावस्थेचा प्रश्न देखील या निवडणुकीत ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. आश्रमशाळा सुरू होऊन अनेक महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतरही गणवेश, शैक्षणिक साहित्य, इ. उपलब्ध करून देण्यात न आल्याने तसेच विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नावर अलिकडेच मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची आंदोलने झाली तसेच कुपोषणाचा प्रश्नही तसाच गाजत आहे. श्रमजीवी संघटनेनेतर कुपोषणाविरोधात गेल्या ५-६ महिन्यात जंगच छेडल्याचे चित्र दिसले आहे.