शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच समोर आला धक्कादायक सर्व्हे! महाआघाडीला मोठा झटका, NDA ला किती जागा मिळणार? जाणून थक्क व्हाल!
2
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
3
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
4
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
5
आता एका क्लिकवर मिळेल उमेदवारांची संपत्ती आणि गुन्हेगारी रेकॉर्ड; 'हे' ४ ॲप्स लॉन्च!
6
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...
7
सरन्यायाधीश गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न करणारा वकील कोण? कशामुळे हे घडलं?
8
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
9
'तुम्ही इतके दिवस कुठे होतात'; मुलांसह लेणीत राहणाऱ्या रशियन महिलेच्या पतीला सर्वोच्च न्यायालयाने झापले
10
ऐकावं ते नवलच! नवरदेवाने हुंडा स्वीकारण्यास दिला नकार, सासऱ्याने मोडलं लग्न; नेमकं काय घडलं?
11
रिलेशनशिपची चर्चा, यशस्वीची ती कथित गर्लफ्रेंड कोण? नात्याबाबत केला मोठा गौप्यस्फोट
12
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
13
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
14
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
15
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
16
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
17
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
18
नवा ट्रेंड! मूल नको, पण कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, देशात का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
19
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
20
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   

भांडी खरेदीही न्यायालयात

By admin | Updated: October 7, 2016 05:10 IST

आदिवासी विकासअंतर्गत अप्पर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे यांच्या अखत्यारीत जव्हार, शहापूर, डहाणू, पेण, घोडेगांव व सोलापूर ६ प्रकल्पातील एकूण १२९ आश्रमशाळांतील भांडी व सामग्री खरेदी

हुसेन मेमन / जव्हारआदिवासी विकासअंतर्गत अप्पर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे यांच्या अखत्यारीत जव्हार, शहापूर, डहाणू, पेण, घोडेगांव व सोलापूर ६ प्रकल्पातील एकूण १२९ आश्रमशाळांतील भांडी व सामग्री खरेदी आदिवासी विकासमंत्री सवरा आणि त्या खात्याचे सचिव देवरा यांच्या वादात गेली दोन वर्षे रखडल्याने त्यासाठी निविदा सादर करणारे कंत्राटदार आता या विषयी हाय कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. त्यामुळे कामाठ्यांवर फुटक्या भांड्यात स्वयंपाक करण्याची तर विद्यार्थ्यांवर फुटक्या, तुटक्या, गळक्या ताटात जेवण्याची पाळी प्रदीर्घ काळ येणार आहे. खरेदीकरिता कुठलाही निर्णय होत नसल्यामुळे आम्ही न्याय मिळण्याकरिता न्यायालयात जाणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे संबंधित पुरवठादाराने लोकमतशी बोलतांना सांगितले. किसान व कॉम्प्युनिष्टचा ५ आॅक्टोबर २०१६ रोजी झालेला सवरा यांच्या घरासमोरील ठिय्या आंदोलनात आम्ही आश्रमशाळेतील स्वयंपाकाच्या झालेली दुरवस्थाबाबत व्यथा मांडलेली असून तातडीने खरेदी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.आदिवासी विकास मंत्र्यांनी आणि विधी मंडळाच्या आदिवासी कल्याण समितीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे यांनी सचिवांना या निविदा मंजूर करण्याचा आदेश दिल्यानंतरही सचिव देवरा यांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांनी याबाबत ताताडीने कारवाई करण्याचा आदेश दिल्यानंतरही देवरा यांचा आठमुठ्ठेपणा कायम आहे. मंत्री सवरा यांच्याही आदेशाला धुडकावून लावण्याचे काम देवरा यांनी केलेच होत, आता राज्याचे मुख्यसचिव क्षत्रीय यांचेही आदेश धुडकावून लावलेले आहे. त्यामुळे आदिवासी विकास खाते हे आदिवासींना भकास करणारे खाते होत चाललेले आहे. देवरा यांच्या मुळेच रेनकोटखरेदी वादग्रस्त ठरून सरकारला ताशेरे खावे लागले होते. मुख्याध्यापकांना तीन लाखांपर्यंतचे रेनकोट खरेदीची अधिकारी त्यांनीच बहाल केले होते. एकीकडे सरकारच्या ई-निविदा धोरणाचे उल्लंघन यामुळे झाले होते.२०१३ पासून रखडल्यामुळे खरेदी २०१३ पासून ही खरेदी रखडल्यामुळे फुटकी कढई, पातेले, पराती यात स्वयंपाक करावा लागतो आहे. तर विद्यार्थ्यांवर फुटकी, गळकी, झिजकी ताट, वाट्या, तांब्या वापरून भोजन करण्याची पाळी ओढावली आहे. काही जण भांड्यांना कारपेच तर काही एमसील लावून फुटकी भांडी वापरत आहेत. त्यातून अन्न विषबाधा होण्याचा धोकाही उद्भवू शकतो.