शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तीन उद्योग बंद तर 21वर दंडात्मक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2019 00:56 IST

तारापूर एमआयडीसीमधील दोन मोठे कापड तसेच एका रासायनिक उद्योगावर बंदची तर सुमारे २१ उद्योगांवर दंडात्मक रक्कमेची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आली आहे.

पंकज राऊत बोईसर : तारापूर एमआयडीसीमधील दोन मोठे कापड तसेच एका रासायनिक उद्योगावर बंदची तर सुमारे २१ उद्योगांवर दंडात्मक रक्कमेची कारवाई प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात आली आहे. काही प्रमाणात झालेल्या आणि सध्या सुरु असलेल्या विशेष पथकाचा पाहणी तसेच तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अनेक उद्योगांवर कारवाई होण्याची टांगती तलवार असल्याने बहुसंख्य उद्योगांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, १३ आणि १४ नोव्हेंबरला राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशान्वये पाच जणांच्या विशेष समितीनेही तारापूरच्या प्रदूषणासंदर्भात पाहणी दौरा केला आहे. तारापूर औद्योगिक क्षेत्रातील ग्लोबल या रासायनिक कारखान्यावर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ तर मंधना डार्इंग व पाल फॅशन लि. या कपडा उद्योगावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे बंदची कारवाई करण्यात आली आहे. तर अन्य २१ उद्योगांवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे मापदंड न पाळल्याने दंडात्मक कारवाई का करण्यात येऊ नये, अशा नोटिसा राष्ट्रीय हरित लवादाच्या आदेशाच्या अनुषंगाने म.प्र.नियंत्रण मंडळाने बजावलेल्या आहेत.या कारखान्यांमधून सांडपाणी सोडणे गरजेचे होते, ते न सोडल्याने प्रदूषणाची हानी झाली. पर्यायाने पर्यावरणाचा ºहास केला म्हणून या नोटिसा बजावल्या आहेत. यात मोठ्या उद्योगांना एक कोटी, मध्यम ५० लाख तर लघु उद्योगांना २५ लाख रुपये रकमेच्या दंडाचा समावेश आहे. दरम्यान राष्ट्रीय हरित लवादाच्या (एन.जी.टी.) आदेशान्वये आय.आय.टी. (मुंबई) आय.आय.एम (अहमदाबाद) व निरी अशा उच्च दर्जाच्या (टेक्निकल टीम) समितीच्या सदस्यांनी केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बुधवार आणि गुरुवार (दि.१३ व १४) अशी सलग दोन दिवस तारापूर औद्योगिक क्षेत्रातील २५ एम.एल.डी. क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रि या केंद्र (सी.ई.टी.पी.) नवापूर, दांडी, उच्छेळी येथील खाडी किनारा तसेच परिसरातील कूपनलिका (बोअरवेल) नाले इत्यादींची पाहणी केली.एन.जी.टी.च्या आदेशान्वये ही समिती प्रथमच तारापूरला आली होती. या टीमने स्वतंत्रपणे पाहणी करावी, असे निर्देश असल्याने त्या समितीने अखिल भारतीय मांगेला समाज या याचिकाकर्त्यांनाही बरोबर घेतले नाही. मात्र पुढील पाहणी दौºयाच्यावेळी अ.भा.मांगेला समाजाच्या प्रतिनिधींना बरोबर घेण्यात यावे, अशी अपेक्षा याचिकाकर्ते व माजी सरचिटणीस नरेंद्र नाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. तारापूर औद्योगिक क्षेत्रातून प्रक्रिया न करता मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषित सांडपाणी सरळ नवापूरच्या समुद्रात सोडण्यात येत असल्याने त्याचा किनारपट्टी, शेतजमीन आणि नागरिकांवर गंभीर परिणाम होतो.>दिवाळीनंतर दुसºया टप्प्यातील तपासणीअखिल भारतीय मांगेला परिषदेने राष्ट्रीय हरित लवादाकडे चार वर्षांपूर्वी याचिका दाखल केल्यानंतर अनेक सुनावण्यांदरम्यान लवादाने दिलेले विविध आदेश व सप्टेंबरमध्ये दिलेल्या निर्णयानंतर विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विशेष पथकाने तारापूर औद्योगिक क्षेत्रामधील लाल व नारिंगी अशा सुमारे ६०० उद्योगांमधील रासायनिक सांडपाणी व हवा प्रदूषणासंदर्भात विशेष तपासणी मोहिमेचा (सर्वेक्षण) >पहिला टप्पा९ सप्टेंबरपासून सुरु केला होता.पहिल्या टप्प्यात सुमारे २०० उद्योगांमध्ये तपासणी मोहीम राबविली तर उर्वरीत तपासणी दुसºया टप्प्यात दिवाळीनंतर सुरु केली असून त्यामध्ये आठ टीम कार्यरत असून या दोन्ही टप्प्यांचा तपासणी अहवाल अजून प्रलंबित आहे, तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील योग्य ती करवाई करण्यात येणार आहे.