शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

बुलेट ट्रेनसंदर्भातील जनसुनावणी गुंडाळली; पर्यावरण संस्था संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 06:25 IST

प्रकल्प रद्द करण्याची मागणी

वसई : बहुचर्चित मुंंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठी ज्यांच्या जमिनी अधिग्रहित होऊन ज्यांना नोटीस देण्यात आली आहे, त्यांच्यासाठी मंगळवार, १९ नोव्हेंबर रोजी जनसुनावणी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पर्यावरण संवर्धन समिती, भूमिपुत्र बचाव संघटना आदी संस्थांना त्याची काहीच कल्पना नसल्याने त्यांनी याला प्रचंड विरोध करत ही सुनावणी गुंडाळली.पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी संदीप पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन’ संदर्भातील जनसुनावणी मंगळवारी सकाळी ११ वाजता वसई पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. याची माहिती पर्यावरण संवर्धन समिती, भूमिपुत्र बचाव संघटना आणि इतर नागरिकांना मिळताच तेही तेथे हजर झाले. कार्यकर्त्यांच्या विरोधामुळे ती पुन्हा एकदा गुंडाळण्यात आली.जनसुनावणीची कोणतीही माहिती आम्हाला न देता शासन आमची सपशेल दिशाभूल करीत असल्याची संतप्त प्रतिक्रि या संवर्धन समितीचे समीर वर्तक यांनी ‘लोकमत’ला दिली. या जनसुनावणीस सामोरे जाताना पर्यावरण संवर्धन समिती समन्वयक समीर वर्तक यांनी बुलेट ट्रेन आमच्या हिताची नसल्याचे सांगितले. तसेच कुणालाही न सांगता जनसुनावणी ठेवलीच कशी? बुलेट ट्रेनसाठी जमिनी देणार नसल्याची ठाम भूमिका याआधीही आम्ही घेतली असताना आता पुन्हा अशा सुनावण्या घेऊन सरकारला काय साध्य करायचे आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. म्हणूनच ही जनसुनावणी रद्द करण्याचे आवाहनही केले.उपस्थित आदिवासी एकता परिषद पालघर जिल्ह्याचे उपाध्यक्ष दत्ता सांबरे यांनी आदिवासी समाजाला त्रास देऊ नका असे सांगत बुलेट ट्रेनला विरोध केला. तसेच उपस्थित बाधित शेतकऱ्यांनीही जमीन देण्यास विरोध केल्याने उपजिल्हाधिकाºयांनी सर्वांचा बुलेट ट्रेनला विरोध आहे, असे नमूद करून शेवटी ही जनसुनावणी संपविली. जनसुनावणी नंतर भूमिपुत्र बचाव आंदोलन, पर्यावरण संवर्धन समिती आणि आदिवासी एकता परिषदेतर्फे बुलेट ट्रेन रद्द करा या मागणीची पत्रेही उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.या जनसुनावणीसाठी वसई प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे, वसई तहसीलदार किरण सुरवसे तसेच पर्यावरण संवर्धन समितीतर्फे फारूक मुल्ला, विक्रांत चौधरी, अभिजित घाग, दर्शन राऊत, आदिवासी एकता परिषदेच्या वसई तालुका उपाध्यक्ष वंदना जाधव व पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कुलदीप वर्तक, स्वाभिमानी वसईकरचे रॉजर परेरा आणि विविध गावांतील शेतकरी उपस्थित होते.वसई पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेली बुलेट ट्रेन संदर्भातील जनसुनावणी ही नियम १६ क नुसार ज्यांच्या जमिनी जात आहेत आणि ज्या धारकांना तशा नोटिसी देण्यात आल्या आहेत, त्यांच्यासाठी होती. तर संवर्धन समिती आणि भूमिपुत्र संघटना यांनी म्हटले की, आम्हाला बुलेट ट्रेन नको. वास्तविक, हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे, तरीही आम्ही सुनावणीवेळी समिती आणि संघटना प्रतिनिधीचे म्हणणे ऐकून घेतले. त्यामुळे सभा उधळून लावली असे म्हणणे संयुक्तिक नाही.- स्वप्नील तांगडे, वसई उपविभागीय अधिकारी

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन