शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर राज्यसभा निवडणुकीचे निकाल जाहीर; नॅशनल कॉन्फरन्स 3, तर भाजपचा 1 जागेवर विजय
2
चीनचं धक्कादायक कारस्थान उघड, पँगाँग सरोवराजवळ उभारतोय एअर डिफेन्स कॉम्प्लेक्स
3
मोबाईल चार्जरमध्ये लपवलं १५० ग्रॅम सोनं, तेच ठरलं जीवघेणे; युवकाच्या हत्येचा अखेर उलगडा
4
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
5
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
6
IND vs AUS: कोहलीनं फॉर्म परत मिळवण्यासाठी काय करावं? मोहम्मद कैफचा मोलाचा सल्ला! म्हणाला...
7
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
8
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
9
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
10
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
11
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
12
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
13
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
14
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!
15
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
16
भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर
17
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
18
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
19
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
20
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...

मनोरुग्णांना बसला कोरोनाचा फटका, गुजरात-मुंबईकडे घ्यावी लागते धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 00:47 IST

Vasai Virar News : कोरोनाकाळात अन्य आजारांच्या रुग्णांचे खूपच मोठ्या प्रमाणात हाल झाले, त्यात मनोरुग्णांना कोरोनाचा मोठा फटका बसला.

- हितेन नाईकपालघर : कोरोनाकाळात अन्य आजारांच्या रुग्णांचे खूपच मोठ्या प्रमाणात हाल झाले, त्यात मनोरुग्णांना कोरोनाचा मोठा फटका बसला. गेल्या काही महिन्यांत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात जाता न आल्याने त्यांच्या समस्यांत वाढ झाली आहे. दरम्यान, जिल्हा निर्मितीला सहा वर्षांचा कालावधी उलटून गेल्यानंतर अजूनही जिल्ह्यावासीयांना जिल्हा रुग्णालयाची उणीव भासत आहे. जिल्हा रुग्णालयासाठी आणि जवळच मेडिकल कॉलेजसाठी २५ एकर जमिनीची मागणी लालफितीत अडकून पडल्याने तुटपुंज्या आरोग्य व्यवस्थेचा मोठा फटका इथल्या गरीब रुग्णांना बसत आहे.पालघर जिल्ह्यात ३ जिल्हा उपकेंद्रे, ४६ प्राथमिक आरोग्य केंद्रे तर ४३६ उपकेंद्रांवर जिल्ह्याच्या आरोग्याचा भार उचलला जात आहे. मात्र जिल्ह्यातील अतिजोखमीच्या आजारावरील उपचारासाठी रुग्णांना एक तर मुंबई अथवा गुजरात आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या सिल्वासा येथील रुग्णालयांवर अवलंबून राहावे लागत आहे. शासनाने जिल्ह्यातील एकूण १ हजार ३२० एकर जमीन सिडकोला दिली आहे. त्या बदल्यात काही शासकीय कार्यालये उभारण्याबरोबरच उरलेल्या शेकडो एकर जमिनीवर सिडको स्वतः काही प्रकल्प बांधून अब्जावधी रुपयांची माया गोळा करणार आहे. असे असताना जिल्ह्यातील गरीब रुग्णांवर विविध शस्त्रक्रियांसह महत्त्वपूर्ण आरोग्य सेवेसाठी जिल्हा आरोग्य रुग्णालय उभारण्याची जनतेची मागणी आहे. जिल्हा रुग्णालयाजवळच मेडिकल कॉलेज उभारल्यास त्यात शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षित डॉक्टर, नर्सेस यांची सेवा मिळविण्याच्या दृष्टीने दोन्ही गोष्टी महत्त्वपूर्ण असताना आजही जिल्हा रुग्णालय व मेडिकल कॉलेजसाठी २५ एकर जमिनीसाठी इथल्या लोकप्रतिनिधींना मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. उपचारासाठी जावे लागते ठाणे येथेजिल्ह्यात मनोरुग्णांची संख्या मोठी आहे, मात्र जिल्ह्यात असे रुग्णालय नसल्याने त्यांना उपचारासाठी ठाणे येथे जाऊन उपचार घ्यावे लागतात. तसेच इतर आजारांसाठीही गरीब रुग्णांना मुंबई येथील जे.जे., के.ई.एम., नायर आदी रुग्णालयांत जावे लागते. जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय नसल्याने इथल्या गरीब रुग्णांना मुंबई, गुजरातशिवाय पर्यायच नसल्याने अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकप्रतिनिधींचे वजन पडतेय कमीहजारो एकर जमीन सिडकोला उदार हाताने वाटप करणाऱ्या सरकारला जिल्हावासीयांच्या आरोग्यासाठी २५ एकर जमीन मागणीनंतर त्यातील फक्त १० एकर जमीन देण्यासाठी ४ वर्षांचा कालावधी लागत असल्याने शासन जिल्ह्यातील गरीब रुग्णांच्या आरोग्याविषयी किती संवेदनशील आहे हे दिसून येत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे वजन ही कमी पडत असल्याने त्यांनी जिल्ह्याच्या विकासात्मक बाबीसाठी पक्षभेद विसरून एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्हा रुग्णालयासाठी १० एकर जमीन मंजूर झाली असून पर्यावरण विभागाची मंजुरी मिळाल्यावर ताबडतोब भूमिपूजनाच्या कार्यक्रम आटपून कामाला सुरुवात केली जाणार आहे.- डॉ. अनिल थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक 

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयVasai Virarवसई विरार