शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वसतिगृह कर्मचारी संघटनेचा निषेध मोर्चा; प्रजासत्ताकदिनी मुंबईत धडकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2021 03:17 IST

वास्तविक पाहता वसतिगृह ही सरकारची १९६० पासूनची योजना आहे. तर आश्रमशाळा ही योजना १९७६ नंतर कार्यरत झाली.

भातसानगर : राज्यात २ हजार ३८८ अनुदानित वसतिगृहे विविध स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवली जातात. या धर्तीवर राज्यात स्वयंसेवी संस्थांमार्फत विविध आदिवासी खात्याच्या आश्रमशाळेशी जोडलेली वसतिगृहही कार्यरत आहेत. मात्र येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तुटपुंज्या मानधनावर काम करावे लागत आहे. या वा अन्य मागण्यांसाठी वसतिगृह कर्मचारी संघटनेचा मोर्चा प्रजासत्ताकदिनी मुंबईत धडकणार आहेत.

वास्तविक पाहता वसतिगृह ही सरकारची १९६० पासूनची योजना आहे. तर आश्रमशाळा ही योजना १९७६ नंतर कार्यरत झाली. अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांना सध्या अधीक्षकांना ९ हजार २०० रुपये, स्वयंपाकींना ६ हजार ९०० रुपये, मदतनीस व चौकीदार यांना ५ हजार ७५० दरमहा मानधन दिले जाते. दोन्ही ठिकाणच्या वसतिगृहातील कर्मचारी २४ तास कार्यरत असतो. परंतु अनुदानित वसतिगृहातील कर्मचाऱ्यांबाबत वैद्यकीय सेवा अशा कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत. त्यामुळे याचा विचार करून सरकारने या आंदोलनाची दखल घेत त्यासाठी योग्य तो निर्णय घेऊन या कर्मचाऱ्यांना पूर्णवेळ सरकारी नियमाप्रमाणे पगार द्यावा, अशी विनंती महाराष्ट्र राज्य अनुदानित वसतिगृह कर्मचारी संघटनेने केली आहे. या मागणीसाठी हा मोर्चा हुतात्मा चौक येथे निघाला आहे.

या मोर्चाद्वारे प्रजासत्ताक दिनास निषेध नोंदवून राज्यातील हजारो कर्मचारी स्वतःहून पोलीस आयुक्तांना स्वाधीन होणार असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकात देण्यात आली आहे. या मोर्चाचे नेतृत्व अध्यक्ष मारुती कांबळे, अशोक ठाकर, दातात्रे पाटील, पंकज पाटील, मीना पिचड हे करीत आहेत.   

टॅग्स :Labourकामगार