शहरं
Join us  
Trending Stories
1
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
2
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
3
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
4
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
5
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
6
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार
7
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
8
'पूरग्रस्तांना प्रत्येकाने शक्य ती सर्व मदत करावी', राहुल गांधींच्या सूचना, प्रत्यक्ष गेले बांधावर
9
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
10
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
11
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
12
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
13
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
14
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
15
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
16
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
17
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
18
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
19
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
20
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री

नदी जोडो विरोधात धडक मोर्चा, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 06:06 IST

जव्हार येथील वावर वांगणी येथे होत असलेल्या नदी जोडो प्रकल्पाच्या हालचाली विरोधात सोमवारी मार्क्सवाद्यांनी आपला आवाज बुलंद केला असून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

जव्हार : येथील वावर वांगणी येथे होत असलेल्या नदी जोडो प्रकल्पाच्या हालचाली विरोधात सोमवारी मार्क्सवाद्यांनी आपला आवाज बुलंद केला असून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. स्थानिक शेतकºयांचे हित पायदळी तुडवत केंद्राने ही योजना जोर जबरीने आमलात आणल्यास आंदोलन अधिक तिव्र करु असा इशारा यावेळी देण्यात आला.गुजरात राज्य आणि दादरा, नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेल्या जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे वाघ व लेंदी या दोन नद्यांवर वावर वांगणी येथील भूगद डोहवर आणि कारगिल हिल टेकडी येथे केंद्राच्या योजनेनुसार दमणगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम चालू होणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमेटी सदस्य रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पबाधित शेतकरी एकत्र आले होते.या प्रकल्पामुळे ५२ गावे, आणि १ लाखाच्या आसपास आदिवासी कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे शेतकरी मार्क्सवाद्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन गोरवाडी नाक्यावरुन या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा गोरवाडी नाका, यशवंतनगर, मोर्चा, पाचबत्ती नाका, गांधीचौक, मांगेलवाडा आणि जव्हारचे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने गेला. यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तालुक्यातील शेतकºयांनी माकपाच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्च्याच्या शिष्टमंडळाची जव्हार अप्पर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळासमोर बोलावून लेखी आश्वासन देण्यात आले. यावेळी बुधर यांच्यासह प.स. सदस्य यशवंत घाटाळ, लक्ष्मण जाधव, तसेच जिल्हा शेक्रेटरी कॉ बारक्या मांगात, तालुका शेक्रेटरी कॉ यशवंत बुधर, कॉ शिवराम बुधर, कॉ विजय शिंदे, कॉ शांतीबाई खुरकुटे, आदी मान्यवरांच्या नेतृवाखाली मोच्यार्चे आयोजन करण्यात आले.अशा आहेत मागण्यामोर्च्यादरम्यान अन्य मागण्याही करण्यात आल्या आहेत. यामध्ये मंजूर झालेल्या वनपट्टेधारकांना ७/१२ उतारा मिळाला पाहिजे, शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावा, पेशा कायद्यानुसार नोकर भर्ती करावी, तालुक्यातील गाव-पाड्यांचे रखडलेले रस्ते पूर्ण करावे, तसेच जव्हार नगरपरिषद हद्दीतील आदिवासी कुटुंबांना घरकुल, शौचलयाचा लाभ देण्यात यावा, आश्रम शाळा आणि जि.प. शाळांचे खाजगीकरण करू नये. अशा मागण्या मोर्च्यादरम्यान करण्यात आल्या.