शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

नदी जोडो विरोधात धडक मोर्चा, अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 06:06 IST

जव्हार येथील वावर वांगणी येथे होत असलेल्या नदी जोडो प्रकल्पाच्या हालचाली विरोधात सोमवारी मार्क्सवाद्यांनी आपला आवाज बुलंद केला असून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

जव्हार : येथील वावर वांगणी येथे होत असलेल्या नदी जोडो प्रकल्पाच्या हालचाली विरोधात सोमवारी मार्क्सवाद्यांनी आपला आवाज बुलंद केला असून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. स्थानिक शेतकºयांचे हित पायदळी तुडवत केंद्राने ही योजना जोर जबरीने आमलात आणल्यास आंदोलन अधिक तिव्र करु असा इशारा यावेळी देण्यात आला.गुजरात राज्य आणि दादरा, नगरहवेली या केंद्रशासित प्रदेशाला लागून असलेल्या जव्हार तालुक्यातील वावर वांगणी येथे वाघ व लेंदी या दोन नद्यांवर वावर वांगणी येथील भूगद डोहवर आणि कारगिल हिल टेकडी येथे केंद्राच्या योजनेनुसार दमणगंगा नदीजोड प्रकल्पाचे काम चालू होणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कमेटी सदस्य रतन बुधर यांच्या नेतृत्वाखाली प्रकल्पबाधित शेतकरी एकत्र आले होते.या प्रकल्पामुळे ५२ गावे, आणि १ लाखाच्या आसपास आदिवासी कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे शेतकरी मार्क्सवाद्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन गोरवाडी नाक्यावरुन या मोर्चाला सुरुवात झाली. हा मोर्चा गोरवाडी नाका, यशवंतनगर, मोर्चा, पाचबत्ती नाका, गांधीचौक, मांगेलवाडा आणि जव्हारचे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय या मार्गाने गेला. यावेळी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तालुक्यातील शेतकºयांनी माकपाच्या नेतृत्वाखाली काढलेल्या मोर्च्याच्या शिष्टमंडळाची जव्हार अप्पर जिल्हाधिकारी श्रीधर डुबे पाटील यांनी भेट घेतली. त्यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना मोर्चेकºयांच्या शिष्टमंडळासमोर बोलावून लेखी आश्वासन देण्यात आले. यावेळी बुधर यांच्यासह प.स. सदस्य यशवंत घाटाळ, लक्ष्मण जाधव, तसेच जिल्हा शेक्रेटरी कॉ बारक्या मांगात, तालुका शेक्रेटरी कॉ यशवंत बुधर, कॉ शिवराम बुधर, कॉ विजय शिंदे, कॉ शांतीबाई खुरकुटे, आदी मान्यवरांच्या नेतृवाखाली मोच्यार्चे आयोजन करण्यात आले.अशा आहेत मागण्यामोर्च्यादरम्यान अन्य मागण्याही करण्यात आल्या आहेत. यामध्ये मंजूर झालेल्या वनपट्टेधारकांना ७/१२ उतारा मिळाला पाहिजे, शासनाने रोजगार उपलब्ध करून द्यावा, पेशा कायद्यानुसार नोकर भर्ती करावी, तालुक्यातील गाव-पाड्यांचे रखडलेले रस्ते पूर्ण करावे, तसेच जव्हार नगरपरिषद हद्दीतील आदिवासी कुटुंबांना घरकुल, शौचलयाचा लाभ देण्यात यावा, आश्रम शाळा आणि जि.प. शाळांचे खाजगीकरण करू नये. अशा मागण्या मोर्च्यादरम्यान करण्यात आल्या.