शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
3
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
4
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
5
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
6
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
7
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
8
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
9
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
10
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
11
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
12
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
13
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
14
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
15
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
16
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
17
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
18
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
19
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
20
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

उत्पादन घटले, गणेशोत्सवकाळात श्रीफळ झाले महाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 03:36 IST

उत्पादनात कमालीची घट झाल्याने व ऐन गणेशोत्सवात मागणी वाढल्याने नारळाचे दर भडकले आहेत. त्याचा फायदा व्यापारीवर्गाला झाला आहे. तर नारळ उत्पादक कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला असून उत्सवकाळातही शेतक-यांची झोळी रीतीच आहे.

अनिरु द्ध पाटील ।बोर्डी : उत्पादनात कमालीची घट झाल्याने व ऐन गणेशोत्सवात मागणी वाढल्याने नारळाचे दर भडकले आहेत. त्याचा फायदा व्यापारीवर्गाला झाला आहे. तर नारळ उत्पादक कर्जाच्या ओझ्याखाली दबला गेला असून उत्सवकाळातही शेतकºयांची झोळी रीतीच आहे.पावसाचा अनियमतिपणा, उन्हाळ्यात वीज भारनियमनामुळे झालेला अपुरा पाणी पुरवठा यामुळे नारळाची प्रतिमाड उत्पादन क्षमता कमालीची घटली आहे. एका दशकापासून एरियोफाइल्ड माईट (अष्टपाद कोळी) या कीडीचा फळावर झालेला प्रादुर्भाव रोखण्यात आलेले अपयश यामुळे फळांची वाढ खुंटते तर आवरण डागाळते. त्यामुळे वर्गवारी करतांना अशा फळांना व्यापºयांकडून प्रतिनग पाच रूपयांचा दर दिला जातो. मजूर तसेच खतांचे दर वाढल्याने उत्पादन खर्च वाढून बागायतदारांना तोटा होतो. मात्र गणेशोत्सवात बाजारातील नारळाच्या किमती २० ते ३० रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत. धार्मिक कार्यात नारळला अनन्यसाधारण महत्व असल्याने मोठी मागणी आहे. त्यामुळे आर्थिक झळ सहन करून नागरिक खरेदी करीत आहेत.दरम्यान शासनाने नारळाला हमी भाव देणे आवश्यक आहे. शिवाय नारळ खरेदी-विक्र ी केंद्र सुरू केल्यास किमती आवाक्यात राहून नागरिकांची पिळवणूक थांबेल. पाणीवाले आणि पक्व नारळाचे दर वेगळे आहेत. फळं उतरविण्याचे प्रतिमाड २५ रु पये घेतले जातात. शिवाय १५ फळानंतर प्रत्येक नगामागे अतिरिक्त २ रुपये घेतले जातात. दिवसेंदिवस या कुशल मजुरांमध्ये घट झाल्याने मक्तेदारी वाढली आहे. अन्य पर्याय नसल्याने बागायती टिकविण्यासाठी हा खर्चिक व्यवहार स्वीकारावा लागतो. सणा व्यतिरिक्त नारळाला मोठी मागणी नाही. त्यामुळे व्यापाºयांवर अवलंबून राहावे लागते. शासनाकडून नारळ उत्पादकांना कोणतीच मदत केली जात नाही अशी व्यथा बोर्डी येथील नारळ उत्पादक प्रकाश राऊत यांनी लोकमतकडे मांडली.नारळ बोर्डाकडून शेतकºयांचे गट तयार करून जिल्हास्तरावर नारळ उत्पादन संघाची निर्मिती केली. त्यानंतर सोसायटीच्या माध्यमातून दोन वर्षांकरिता लागणारी खते, कीटकनाशक नारळ उत्पादकांना वाटप केल्याने फायदा झाला होता. मात्र ही योजना औटघटकेची ठरली आहे.- यज्ञेश सावे, कृषीभूषण