शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

32 हजार रिक्षाचालकांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 23:37 IST

मिळणार १५०० रुपये : मदतनिधी वाढवून देण्याची मागणी

- पंकज राऊत लोकमत न्यूज नेटवर्क बोईसर : छोट्या-मोठ्या शहरांबरोबरच आता ग्रामीण भागातही गावागावांत तीन व सहा आसनी रिक्षांची सेवा उपलब्ध असून आता रिक्षांकडेही ग्रामीण भागातील दळणवळणाचे साधन म्हणून पहिले जाते. परंतु कोरोनाने या रिक्षाचालकांचे आर्थिक  गणित बिघडवले आहे. बिकट परिस्थितीमुळे त्यांचे कौटुंबिक जीवन अक्षरशः मेटाकुटीला आल्याने त्यांच्यासमोर जीवन-मरणाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना १५०० रुपयांची मदत जाहीर केल्याने जिल्ह्यातील ३२ हजार रिक्षाचालकांना दिलासा मिळाला आहे.पश्चिम रेल्वेच्या नायगाव रेल्वे स्थानकाच्या पूर्व-पश्चिमेच्या रिक्षा स्टँडपासून वसई, नालासोपारा, विरार, वैतरणा, सफाळा, केळवे, पालघर, बोईसर, वाणगाव, डहाणू व घोलवड या जिल्ह्यांतील रेल्वे स्थानकांबरोबरच जिल्ह्यातील आठही तालुक्यांतील मुख्य शहरांसह गावागावांत असे मिळून पालघर जिल्ह्यात सुमारे ३२ हजार तीन व सहा आसनी रिक्षाचालक - मालक आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षा व्यवसायाद्वारे करतात. मात्र कोरोनाच्या संकटामुळे पुन्हा एकदा अनेक कार्यालये, उद्योग व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे घराबाहेर पडणाऱ्यांचे प्रमाण कमी झाल्याने  शहरी व गावातील रिक्षा स्टँड सध्या ओस पडले आहेत. 

१०-१२ तास रिक्षा चालवूनही भागत नाहीदरम्यान, सुमारे ३२ हजार रिक्षाचालकांना लवकरच मदत देण्यात येणार आहे, परंतु गगनाला भिडलेली प्रचंड महागाई, बरोबरच नवीन रिक्षांचे वाढलेले प्रचंड भाव, प्रत्येक वर्षी  टॅक्स,  विमा व पासिंगकरिता   होणारा खर्च, स्पेअरपार्टसह देखभाल-दुरुस्तीसाठी वाढत जाणाऱ्या वारेमाप खर्चाचे ओझे, बँकेच्या कर्जाचा हप्ता, घरभाडे, मुला-बाळांच्या शिक्षणाचा, कुटुंबाचा आणि आरोग्यावर होणारा खर्च इत्यादी सर्व खर्चाची जुळवाजुळव करून दहा ते बारा  तास रिक्षा चालवूनही आज तुटपुंजी रक्कम मिळत असल्याने काही रिक्षाचालकांसमोर कुटुंबाची आर्थिक गरज भागवायची कशी, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

रिक्षाचालकांच्या प्रतिक्रियाअहोरात्र तत्परतेने सेवा देणारे रिक्षाचालक मागील वर्षापासून प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. परवानाधारक रिक्षाचालकांना मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदतीबद्दल आभारी आहोत, परंतु ती मदत किमान पाच हजारांपर्यंत द्यावी व तीही लवकरात लवकर देण्यात यावी.- संजय ज. पाटील, सरचिटणीसपालघर जिल्हा ऑटो व टॅक्सी चालक-मालक संघटनाया कठीण काळात आर्थिक दुर्बल घटकांना दिलासा देण्यासाठी आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने राज्यातील १२ लाख रिक्षाचालकांना दिलासा मिळाला आहे. मात्र देण्यात येणारे अर्थसाहाय्य कमी असून त्यामध्ये वाढ करावी. - संदीप पाटील, अध्यक्ष, जय महाराष्ट्र रिक्षा-टॅक्सी चालक मालक संघटना, बोईसर