शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

पालघरमध्ये ७५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 23:30 IST

महावितरणाकडून युद्धपातळीवर काम; ५७ वाहिन्यांमध्ये झाला होता तांत्रिक बिघाड

पालघर : मुसळधार पावसामुळे रविवारी पालघरमध्ये एकूण ५७ वाहिन्यांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अंदाजे ७५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे झाडे वाहिन्यांवर उन्मळून १४ खांब, उच्चदाबाचे सहा खांब आणि ५ रोहित्रांचे नुकसान झाले.वीजपुरवठा खंडित झालेल्या ५७ वाहिन्यांपैकी ३५ वाहिन्यांचा पुरवठा सुरळीत करण्यात आला. उर्वरित २२ वाहिन्यांवरील अंदाजे २७ हजार ग्राहकांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पाऊस आणि वाºयामुळे कामात अडचणी येत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी जातीने लक्ष घालत असून ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या मोखाडा तालुक्यातील करवळ ग्रामपंचायत अंतर्गत गावातील ४० ते ५० ग्रामस्थ खरेदीसाठी गेलेले अडकून पडले होते. या दुर्गम भागात आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत पोहचणे कठीण असल्याने दोरखंडाच्या मदतीने सुखरूप सुटका करून घेतली. पुलाला जोडणारा रस्ता वाहून पुराच्या पाण्यात वाहून गेला. अतिशय दुर्गम भाग असल्याने अशा संकटावर एकत्रित जमून मात करत असल्याचे एकनाथ झुगटे यांनी ‘लोकमत’ ला सांगितले.वसई तालुक्यातील उपकेंद्रात पाणी शिरल्याने रविवारी सकाळी साडेसहा वाजता वीजपुरवठा खंडित झाल्याने सुमारे दीड लाख ग्राहक बाधित झाले होते. त्यामुळे नवघर औद्योगिक वसाहत, सातीवली-अग्रवाल औद्योगिक वसाहत,सनसिटी परिसर बाधित झाला होता. मोखाडा उपकेंद्रातून जाणारी खोडाळा वाहिनी बंद पडल्याने खोडाळा, सडकवाडी, डोल्हारा आदी भागतील ५ हजार १०० ग्राहक बाधित झाले होते. तसेच केळवे रोड, दापचरी, डहाणू आदी भागात सतत पुरवठा खंडित होत होता. रविवारी सकाळपर्यंत सरासरी १९०.०८ मिमी पाऊस झाला. जूनपासून आतापर्यंत एकूण २ हजार २५७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.वसई तालुक्यात २१४.३३ मिमी, वाडा २५२.८१, डहाणू ७०.७०, पालघर २२२.३३, जव्हार २३१.७५, मोखाडा- २५८.५०, तलासरी ८५.६३ आणि विक्रमगड १८७.८८ मिमी. इतका पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धामणी धरणाची आजची पाणीपातळी ११७ मी. असून पाणीसाठा २५५.२२१ दशलघमी म्हणजेच 92.35% इतकी आहे. कवडास उन्नैयी बंधाºयाची पाणी पातळी ६६.९० मीटर. तर पाणीसाठा ९.९६ दशलक्षघमी असून हा बंधारा १०० टक्के भरला आहे. वांद्री मध्यम प्रकल्पाची पाणी पातळी ४४.८२ मी असून पाणीसाठा ३५.९३ दलघमी इतका आहे. हे धरण देखील 100% भरले आहे. कुर्झे धरणाची पातळी ६८.८० मी. तर पाणीसाठा ३१.१५ दलघमी म्हणजेच ७९.७७ टक्के इतका आहे.वसईकिनारी ६ मीटर उंचीच्या लाटावसई : वसईच्या विविध किनारपट्टीवर शनिवारी, रविवारी जवळपास ५.८८ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. जिल्हा प्रशासनाकडून किनारपट्टीच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा पूर्वीच देण्यात आला होता. त्यामुळे अनेकांनी घरातच राहणे पसंत केले.शनिवारी रात्री सोसाट्याचा वारा आणि त्यात मुसळधार पावसामुळे वसईतील किल्ला बंदर, पाचू बंदर, रानगाव , अर्नाळा किनारपट्टीजवळच्या घरांचे भरतीच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.वसई-विरारमध्ये शुक्र वारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वसई-विरारमधील जनजीवन विस्कळीत झाले. यामध्ये वसईतील विविध किनाºयावर खास करून अर्नाळा येथील गणपती रोड किनाºयावरील काही घरांच्या भिंतींची पडझड झाली आहे.पाचू बंदर व किल्ला रोड येथील घरांना भेगा पडल्या, तर काहींच्या भिंती कोसळल्या आहेत. खाडीचा पाड्यात राहणाºया आदिवासींची ३५ ते ४० घरे पाण्याखाली गेली आहेत. या ठिकाणी साधारणपणे १५० लोकांची वस्ती असून शुक्र वार व शनिवारची संपूर्ण रात्र त्यांनी उंचवट्यावर बसून काढली. रविवारी दुपारी त्यांच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था तहसीलदारांतर्फे अर्नाळा जिल्हा परिषद शाळेत करण्यात आली.वसईतील नवघर माणिकपूर शहरात तर बहुतेक सोसायटीत व दुकानात पाणी साचले आहे. तर नवघर डेपो, १०० फूट रोड व वसईतील सनसिटी रस्ता ,मिठागरे वसाहत आणि पूर्वेस महामार्ग, शिरसाड तसेच तानसा नदीवरील पांढरतारा पूल पाण्याखाली गेला आहे.चौघांना सुखरूप बाहेर काढलेमनोर : मनोरजवळील करळगाव येथे तलाव राखणारे चार जण पुराच्या पाण्यात अडकले होते. त्यांना रविवारी सायंकळी येथील ग्रामस्थांनी आपला जीव मुठीत घेऊन सुखरूप बाहेर काढले. नांदगाव येथील नंदनवनमध्ये अडकलेल्या कुटुंबियांना सुरक्षितस्थळी हलवले.करळगाव येथे असलेल्या तलावातील मासे राखण्या साठी शैलेश सरोज, संतोष सरोज, मोहरम अली वय व दिलीप सरोज असे एकूण चार जण होते. शनिवारी रात्री अचानक पाणी त्यांच्या घराच्या चारही बाजूने शिरल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही.रविवारी संध्याकाळी ग्रामस्थांनी टायर टूपचा वापर करून सुखरूप बाहेर काढले. नांदगाव नंदनवन येथे बाबू भाई यांच्या कुटुंबियांना सुखरूप एका इमारतीच्या गच्चीवर हलवण्यात आले आहे. उपविभागीय अधिकारी गजरे, तहसीलदार महेश सागर यांनी घटनास्थळी भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली.

टॅग्स :Rainपाऊस